शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
4
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
5
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
6
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
7
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
8
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
9
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
10
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

४४ साखर कारखान्यांकडे ३२८ कोटींची थकबाकी

By admin | Updated: January 7, 2016 02:39 IST

मागील वर्षी गाळप केलेल्या उसापोटी एफआरपीचे ३२८ कोटी रुपये थकविणाऱ्या राज्यातील ४४ साखर कारखान्यांवर केवळ कारवाईची भाषा सुरू असली तरी प्रत्यक्षात कारवाईही नाही

अरुण बारसकर,  सोलापूरमागील वर्षी गाळप केलेल्या उसापोटी एफआरपीचे ३२८ कोटी रुपये थकविणाऱ्या राज्यातील ४४ साखर कारखान्यांवर केवळ कारवाईची भाषा सुरू असली तरी प्रत्यक्षात कारवाईही नाही अन् शेतकऱ्यांचे पैसेही दिले जात नाहीत. मागील वर्षी राज्यातील १७८ साखर कारखान्यांनी गाळप हंगाम घेतला होता. त्यापैकी १३४ साखर कारखान्यांनी ३१ डिसेंबर अखेर एफआरपीप्रमाणे शेतकऱ्यांचे पैसे दिले आहेत. उर्वरित ४४ साखर कारखान्यांनी अद्याप एफआरपीनुसार शेतकऱ्यांना पैसे दिले नसल्याचे साखर आयुक्त कार्यालयाकडून सांगण्यात आले. ४४ पैकी १२ ते १४ साखर कारखाने या वर्षी सुरूच झाले नाहीत. त्यामुळे या साखर कारखान्यांकडे असलेली जवळपास १२५ कोटींची थकबाकी कशी वसूल करणार याकडे लक्ष लागले आहे. साखर आयुक्तांनी मागील आठवड्यात एफआरपीनुसार पैसे न देणाऱ्या ५१ साखर कारखान्यांना गाळप परवाना रद्द करण्याची नोटीस बजावली होती. मागील वर्षी (२०१४-१५) गाळप केलेल्या उसाचे पैसे शेतकऱ्यांना ३१ डिसेंबरपर्यंत न दिल्यास गाळप परवाना रद्द केला जाईल व आतापर्यंत केलेले गाळप विनापरवाना केले म्हणून कारवाई केली जाईल, असे आयुक्तांनी म्हटले होते. या नोटिसीनंतर जवळपास २१ साखर कारखान्यांनी पावणेदोनशे कोटी रुपये दिले.मागील वर्षाचे पैसे न देणाऱ्या व या वर्षी गाळप हंगाम सुरू असलेल्या जवळपास ३० साखर कारखान्यांकडे २०० कोटींची रक्कम थकीत आहे. याशिवाय मागील वर्षी गाळप हंगाम घेतलेल्या व या वर्षी बंद असलेल्या १४ साखर कारखान्यांकडे १२५ कोटी थकले आहेत. ही सर्व रक्कम वसुलीसाठी कारखान्यांवर कारवाई करण्याची भाषा सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली असली तरी सध्या साखर आयुक्त कार्यालयात कारवाईच्या कसल्याच हालचाली सुरू नाहीत. साखर आयुक्त बिपीन शर्मा मागील आठवड्यापासून रजेवर गेले आहेत. त्या पदाचा तात्पुरता पदभार अतिरिक्त आयुक्त किशोर तोष्णीवाल यांच्याकडे असून, ते मंगळवारी रजेवर होते.साखरेच्या दरात विक्रमी वाढप्रकाश पाटील, कोल्हापूरगेल्या दीड वर्षात प्रथमच साखरेचे प्रतिक्विंटल दर ३,१५० रुपयांपर्यंत पोहोचले असून अडचणीतील कारखान्यांना त्यामुळे आर्थिक दिलासा मिळाला आहे. यंदा साखरेच्या उत्पादनात घट व निर्यातीला प्राधान्य दिल्याने दरवाढ अपेक्षित आहे. आॅगस्ट २०१५मध्ये साखर १,९०० रुपयांवर घसरलेल्या साखरेत आता प्रतिक्विंटलमागे १,३०० रुपये वाढ झाली आहे. त्यामुळे कारखानदारांसमोरचे एफआरपीचे संकट टळणार आहे. मागील दोन हंगामात साखर उत्पादनात मोठी वाढ झाली होती. मात्र त्या प्रमाणात स्थानिक बाजारपेठेत मागणी घटल्याने भावात घसरण सुरू होती. २०१४-१५च्या हंगामच्या सुरुवातीला आॅक्टोबर २०१४ मध्ये साखरेचे दर २,१०० ते ३,२५० प्रतिक्विंटल एक्स फॅक्टरी होते. मात्र, २०१४-१५चा हंगाम सुरू होताच साखरेच्या दरात मोठी घसरण सुरू झाली. डिसेंबर २०१४ मध्ये दर ३०० ते ३५० रुपयांपर्यंत घसरल्याने व उसाच्या एफआरपीमध्ये प्रतिटन वाढ झाल्याने उत्पादन खर्च व साखरेचा दर यांचा ताळमेळ बसत नव्हता. मार्च २०१५ मध्ये साखरेचा दर क्विंटलमागे २,५०० होते. हंगाम संपता-संपता दर २,३०० ते २,४०० झाल्याने साखर कारखाने शॉर्टमार्जिनमध्ये गेले. जुलै व आॅगस्टमध्ये तर साखरेच्या दराने गेल्या तीन वर्षांतील नीचांक गाठला होता. डिसेंबर २०१५ मध्ये दर २,६०० ते २६५० रुपयांपर्यंत पोहोचले. जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात हाच दर एम. ग्रेडच्या साखरेला ३,१५०, तर एस. ग्रेडच्या साखरेला ३,०५० एक्स फॅक्टरी दर मिळाल्याने साखर कारखानदारांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.