शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर अन् युद्धविराम...राहुल गांधींची PM मोदींना पत्राद्वारे मोठी मागणी
2
'1971 आणि 2025 ची परिस्थिती वेगळी', युद्धविराम अन् इंदिरा गांधींबाबत शशी थरुर स्पष्टच बोलले
3
Chandrapur Tiger Attack: चंद्रपुरात वाघाच्या हल्ल्यात ३ महिलांचा मृत्यू, गावकऱ्यांमध्ये घबराट
4
Murali Naik : "शहीद झालो तर पार्थिव तिरंग्यात..."; मुरली नाईक यांच्या वडिलांनी सांगितली लेकाची शेवटची इच्छा
5
भारतानं पाकिस्तानात घुसून मारलं, लष्कराचा दरारा रावळपिंडीपर्यंत पोहोचला; ऑपरेशन सिंदूरवर राजनाथ सिंह स्पष्टच बोलले 
6
SIP मध्ये गुंतवणूक करताना बहुतेक गुंतवणूकदार 'या' चुका करतात; थेट परताव्यावर होतो परिणाम
7
Yogi Adityanath : "पाकिस्तानला विचारा 'ब्रह्मोस' क्षेपणास्त्राची ताकद काय आहे?"; योगी आदित्यनाथ कडाडले
8
नाशिकला अवकाळी पावसाने झोडपले; शहरात तासभर गडगडाट अन् कडकडाट
9
"मी मोठी झाल्यावर सैन्यात भरती होईन आणि बदला घेईन"; शहीद जवानाच्या लेकीचा निर्धार
10
भारत-पाकिस्तान संघर्षाचा BCCI ला मोठा फटका; आठवड्यात ४२० कोटी रुपये पाण्यात जाणार?
11
Ceasefire Violation: भारतासोबत शस्त्रसंधीची चर्चा करणारे पाकिस्तानी लष्कराचे डीजीएमओ कोण आहेत?
12
Bhagwant Mann : "देशाच्या हितासाठी पंजाब रक्त..."; भगवंत मान यांची राजस्थानला अतिरिक्त पाणी देण्याची मोठी घोषणा
13
युद्धविराम पंतप्रधान मोदींनी घेतली उच्चस्तरीय बैठक, तिन्ही लष्करप्रमुखांसह अजित डोवाल, राजनाथ सिंहांची उपस्थिती
14
लक्ष्य साध्य झाले पण 'ऑपरेशन सिंदूर' अजूनही सुरुच; हवाई दलाने दिली मोठी अपडेट...
15
मेळघाटातील ‘त्या’ आरएफओंची राज्य महिला आयोगाकडे धाव, ‘त्या’ अधिकाऱ्याला अभय
16
फक्त एक मिस्ड कॉल किंवा SMS द्वारे PF बॅलन्स तपासा; कुठेही लॉगइन करण्याची गरज नाही
17
'युद्धविरामचे पालन करू, पण काश्मीर अन् सिंधू करार...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे मोठे विधान
18
फक्त ४० रुपयांमध्ये पोटभर जेवण! 'या' बॉलिवूड कलाकाराने उघडलंय हॉटेल, चाहत्यांकडून कौतुक
19
पैशांसाठी कुणावरही अवलंबून राहू नये असं वाटतं? मग आजपासून 'या' १० टीप्स फोलो करा
20
पाकिस्तानकडून युद्धविरामचे उल्लंघन; भारतीय क्रिकेटपटूंनी पाकची केली कुत्र्याची तुलना, म्हणाले...

तीन आठवड्यांत तीन हजार कोटींचे प्रस्ताव

By admin | Updated: January 4, 2017 05:48 IST

महापालिकेच्या निवडणुकीची आचारसंहिता लवकरच जाहीर होण्याची चिन्हे असल्याने सत्ताधाऱ्यांची धावपळ उडाली आहे. शेवटच्या क्षणी विकासकामांचे प्रस्ताव आणण्यासाठी प्रशासनाला

मुंबई : महापालिकेच्या निवडणुकीची आचारसंहिता लवकरच जाहीर होण्याची चिन्हे असल्याने सत्ताधाऱ्यांची धावपळ उडाली आहे. शेवटच्या क्षणी विकासकामांचे प्रस्ताव आणण्यासाठी प्रशासनाला जबाबदार ठरवणाऱ्या शिवसेनेने तीन आठवड्यांत तब्बल तीन हजारांहून अधिक कोटींचे प्रस्ताव मंजूर केले आहेत. हे प्रस्ताव निवडणुकीच्या धामधुमीत रखडले तरी याचे श्रेय घेण्यासाठी सत्ताधाऱ्यांचा मार्ग मात्र त्यामुळे मोकळा झाला आहे. नालेसफाई आणि रस्ते घोटाळ्यामुळे गेले वर्षभर पालिकेचा कारभार जवळपास ठप्पच राहिला. त्यामुळे अर्थसंकल्पातील एकूण तरतुदीपैकी केवळ २७ टक्के रक्कम नोव्हेंबर अखेरपर्यंत पालिकेने खर्च केली आहे. याचे भांडवल विरोधकांनी केल्यामुळे शिवसेनेची झोप उडाली आहे. सागरी मार्ग, गोरेगाव-मुलुंड जोड रस्ता अशा मोठ्या प्रकल्पांबरोबर विभागांत रखडलेल्या लहानमोठ्या प्रकल्पांना गती देण्यासाठी शिवसेनेचे शिलेदार कामाला लागले आहेत. विकासकामांचे बार उडवण्यासाठी झटपट बैठकांचा सपाटा लावण्यात आला आहे. मित्रपक्ष भाजपा वेगळी चूल मांडण्याच्या तयारीत असल्याने शिवसेनाही ताकद वाढविण्याच्या प्रयत्नात आहे. गेले वर्षभर रखडलेल्या शेकडो प्रस्तावांना स्थायी समितीच्या गेल्या दोन बैठकांत मंजुरी दिली आहे. पहिल्या बैठकीत १३०० कोटींचे ७४ प्रस्ताव आणल्याने शिवसेनेवर टीका झाली. मात्र, विलंबासाठी शिवसेनेने प्रशासनालाच जबाबदार धरले. गेल्या आठवड्यातील बैठकीत आणखी ११०० कोटींचे प्रस्ताव मंजूर झाले. यात आज आणखी ६०० कोटी रुपयांच्या प्रस्तावांची भर पडली. (प्रतिनिधी)दिरंगाईसाठी प्रशासनावरच खापर फोडले- स्थायी समितीच्या गेल्या तीन बैठकांत एकूण तीन हजार कोटींचे प्रस्ताव मंजूर. मार्च ते आॅगस्टदरम्यान निविदा प्रक्रिया पूर्ण झालेले प्रस्ताव प्रशासनाने आता समितीच्या पटलावर आणले आहेत. यासाठी शिवसेनेने प्रशासनाला जबाबदार ठरवत आपला बचाव केला होता. स्थायी समितीच्या आजच्या बैठकीत तब्बल ६०० कोटींचे प्रस्ताव मंजूर करण्यात आले.