शहरं
Join us  
Trending Stories
1
SSC Result 2025: दहावीचा निकाल उद्या जाहीर होणार! विद्यार्थ्यांना कधी आणि कुठे पाहता येणार? जाणून घ्या
2
Video: 'आय लव्ह यू यार... प्लीज उठ जा...'; हुतात्मा सुरेंद्र कुमार यांच्या पत्नीचा मन हेलावून टाकणारा आक्रोश
3
Virat Kohli Test Retirement: 'किंग कोहली'ची कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती; १४ वर्षांचा 'विराट' प्रवास थांबवला!
4
पाकिस्तानवरील कारवाईदरम्यान बंद केलेली ३२ विमानतळं, आता सरकारनं घेतला महत्त्वाचा निर्णय; जाणून घ्या
5
'या' मॉडेलला आता आयुष्यभर जेलमध्ये राहावं लागणार; ग्लॅमरस ते खुनी 'असा' होता प्रवास
6
पाकला पाठिंबा देणाऱ्या चीनला भारताने शिकवला धडा; ड्रॅगनला ५ वर्षे सहन करावा लागणार तोटा
7
Bank of Baroda मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹३२,०४४ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
8
ना कोणी आले, ना गेले! केरळच्या श्री पद्मनाभस्वामी मंदिरात 'चमत्कार'; गायब झालेला सोन्याचा रॉड सापडला
9
किंमत २३९ कोटी रुपये, जगात फक्त ३ लोकांकडे आहे ही कार; कोणती आहे ही गाडी? पाहा डिटेल्स
10
पाकिस्तानच्या प्रत्येक हालचालींवर भारताच्या 'या' 10 डोळ्यांची करडी नजर, ISRO प्रमुखांची माहिती
11
भारताचा 'तो' घाव बरोब्बर वर्मी बसला, पाकिस्तान हडबडला! नूर खान एअरपोर्टवर दडलंय युद्धविरामाचं रहस्य
12
मैत्रिणीच्या मेहंदीला गेला अन्..; प्रसिद्ध अभिनेत्याचं ३४ व्या वर्षी निधन, मनोरंजनविश्वावर शोककळा
13
९०च्या स्पीडने येत होती वंदे भारत, अचानक जोडप्याने घेतली ट्रॅकवर उडी अन्...    
14
India Pakistan War :'तुम्ही पाकिस्तानला संपवा, आम्ही त्यांच्यावर मागून हल्ला करतो'; बलुचिस्तानमधून भारताला संदेश
15
बापरे! गुरुग्राममध्ये एटीएम न फोडता १० लाख रुपये काढले; बँक अन् पोलिसांनाही कळेना
16
अमेरिका आणि चीनमधील टॅरिफ वॉर शमणार? व्हाईट हाऊसने दिली महत्त्वाची माहिती, कुणी घेतली माघार?
17
IPL खेळायला भारतात परतले तर ठीक, नाहीतर...; 'त्या' खेळाडूंविरोधात BCCI घेणार कठोर निर्णय
18
दहशतवाद्यांच्या अंत्ययात्रेत सामील झाले पाकिस्तानचे लष्करी अधिकारी, भारताने नावेच जाहीर केली!
19
सारा तेंडुलकरचा नवा व्हिडिओ व्हायरल; चाहत्यांचं लाजीरवाणं कृत्य, उडवली फिटनेसची खिल्ली
20
Ritual: महत्त्वाच्या कामाला निघताना एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? शास्त्र सांगते...

‘रेशन’मध्ये वर्षाला ३000 कोटींची गळती

By admin | Updated: May 23, 2015 00:22 IST

गिरीष बापट यांची माहिती : बायोमेट्रिकद्वारे काळाबाजार थांबविणार : दारिद्र्यरेषेवरील लोकांनाही धान्य देणार

कोल्हापूर : रेशन धान्य वितरण व्यवस्थेतून वर्षाला ११००० कोटी रुपयांची उलाढाल होते. त्यामधील तीन हजार कोटी रुपयांचे धान्य कोठे जाते, कोण घेऊन जाते याचा शोध लागलेला नाही. इतक्या मोठ्या प्रमाणात गळती आहे. ती शोधून काढण्याचे काम सुरू आहे. या गळतीसाठी स्थानिक वाहतूकदार, ठेकेदार, दुकानदार, खात्यातील अधिकारी, कर्मचारी यांमधील कोण दोषी आहे, त्याची चौकशी केली जात असल्याची माहिती अन्न व नागरी पुरवठामंत्री गिरीश बापट यांनी शुक्रवारी येथे पत्रकार परिषदेत दिली.अन्नसुरक्षा कायद्यामुळे राज्यातील दारिद्र्यरेषेवरील (एपीएल) १ कोटी ७७ लाख शिधापत्रिकाधारकांचे दरमहाचे धान्य बंद केले आहे. मात्र, वितरण व्यवस्थेत वर्षाला होणाऱ्या तीन हजार कोटींच्या धान्याची गळती थांबल्यानंतर गरजू ‘एपीएल’धारकांनाही रेशनचे धान्य दिले जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. ते म्हणाले, अन्नसुरक्षा कायद्यानुसार केवळ दारिद्र्यरेषेखालील (बीपीएल) कुटुंबांनाच रेशनचे धान्य देण्याची तरतूद आहे. मात्र, गेल्या शासनाने निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून १५०० कोटी रुपयांचे धान्य दारिद्र्यरेषेवरील (एपीएल) धारकांना वाटप केले. अलीकडे ते बंद करण्यात आले आहे. परिणामी राज्यातील १ कोटी ७७ लाख एपीएल शिधापत्रिकाधारकांना धान्यापासून वंचित राहावे लागले. धान्य वितरणात पारदर्शकता आणण्यावर लक्ष केंद्रित केले आहे. प्रत्येक शिधापत्रिकेला आधारकार्ड लिंक केले जात आहे. त्यामुळे बोगस शिधापत्रिका सापडणार आहेत. काही दिवसांत राज्यात सर्वत्र बायोमेट्रिक प्रणाली कार्यान्वित होणार आहे. सांगली जिल्ह्यातील बाराटक्के रेशन दुकानांत बायोमेट्रिक यंत्रणा सुरू केल्यामुळे महिन्याला एक हजार टन धान्य शिल्लक राहिल्याचे समोर आले आहे. त्यामुळे राज्यात सर्व दुकानांत ही यंत्रणा बसविल्यास धान्य किती शिल्लक राहते, हे नेमकेपणाने कळणार आहे. रेशन दुकानदारांना कमिशनही वाढवून दिले जाणार आहे. धान्य सुरक्षित राहावे, यासाठी राज्यात २५० नवीन शासकीय गोदामे बांधण्याचे काम सुरू आहे. प्रत्येक रॉकेल वाहतूक करणाऱ्या टँकरला ‘जीपीआरएस’ यंत्रणा बसविण्यात येणार आहे. प्रत्येक औषध दुकानात फार्मासिस्ट, फ्रिज, मुदत संपलेल्या औषधांची विल्हेवाट कशी लावली जाते, याकडे अधिक लक्ष दिले जात आहे. गुटखाबंदीसाठी कायद्यात बदल करण्याचा विचार सुरू आहे.काळाबाजारवाल्यांना ‘मोक्का’गरीब, आदिवासी यांच्यासाठीच्या रेशनच्या धान्याचा काळाबाजार करणाऱ्यांना ‘मोक्का’ लावणार आहे. शासकीय कर्मचारी व समाजातील जाणत्या लोकांनीही काळाबाजार करणाऱ्यांना पाठीशी घालू नये, असे आवाहन मंत्री बापट यांनी केले. धान्य वितरणात काटेकोरपणा येण्यासाठी जिल्हा, तालुका, गाव अशा टप्प्यांत तंत्रज्ञानाच्या वापरातून ‘द्वारपोहोच’ प्रणाली राबविण्यात येर्ईल, असेही त्यांनी सांगितले. मंत्रिपद गेले तर बेहत्तर...नाशिक जिल्ह्यात रेशनचे ३२ हजार क्विंटल धान्य काळाबाजारात विक्री होताना उघडकीस आले. त्यातील चार दोषी कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे. निलंबित केल्याने महसूल विभागातील काही संघटनांनी कामावर बहिष्कार, तसेच संप करण्याचा इशारा दिला आहे. कर्मचाऱ्यांनी असे काहीही करू नये. मंत्रिपद गेले तरी चालेल; मात्र भ्रष्टाचाराबाबत तडजोड करणार नाही, अस बापट यांनी सांगितले.