शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

चार वर्षात देशभरात ३00 रेल्वे अपघात!

By admin | Updated: August 11, 2015 01:23 IST

गेल्या चार वर्षांमध्ये देशभरात सुमारे ३00 रेल्वे अपघात घडले आहेत. विविध कारणांमुळे घडलेल्या या अपघातांमध्ये मालमत्तेचे झालेले नुकसान आणि अपघातातील मृत व जखमींना द्यावी

अकोला : गेल्या चार वर्षांमध्ये देशभरात सुमारे ३00 रेल्वे अपघात घडले आहेत. विविध कारणांमुळे घडलेल्या या अपघातांमध्ये मालमत्तेचे झालेले नुकसान आणि अपघातातील मृत व जखमींना द्यावी लागलेली नुकसानभरपाई, यामुळे भारतीय रेल्वेला या कालावधित ९४५.५३ कोटी रुपयांचा आर्थिक फटका सहन करावा लागला.सन २0११-१२ ते २0१४-१४ या चार वर्षांमध्ये देशभरात घडलेल्या रेल्वे अपघातांची माहिती रेल्वे प्रशासनाने संकलित केली आहे. रेल्वे रुळावरून घसरल्याने झालेले अपघात, निकृष्ट स्लिपर्स आणि रुळांची निकृष्ट बांधणी (वेल्डिंग) या रेल्वे सुरक्षेला आव्हान देणाऱ्या तीन प्रमुख कारणांमुळे घडलेल्या अपघातांची दखल या अहवालामध्ये घेण्यात आली आहे. याशिवाय नैसर्गिक कारणे आणि मानवी त्रुटी तसेच निकृष्ट झालेले रेल्वे पूल व रेल्वे उड्डाणपुलांमुळे घडलेल्या अपघातांचा यात प्रामुख्याने विचार करण्यात आला आहे. मानवरहित रेल्वे फाटकांवर आणि रेल्वे रूळ ओलांडताना घडलेल्या गंभीर अपघातांची नोंदही या सर्वेक्षणात घेण्यात आली आहे.सन २0११-१२ मध्ये ७७ गंभीर स्वरूपाचे रेल्वे अपघात घडले. त्यात ११५ जण मृत्युमुखी पडले, तर ५७४ जण गंभीर जखमी झाले. प्रशासनाला नुकसानभरपाईपोटी १४५.९४ कोटी मोजावे लागले, तर मालमत्तेच्या झालेल्या नुकसानापोटी १७४ कोटींचा आर्थिक फटका सहन करावा लागला.सन २0१२-१३मध्ये ६९ गंभीर अपघात घडले. यामध्ये मृत्युमुखी पडलेल्या ८१ जणांच्या कुटुंबियांना व ३00 जण गंभीर जखमींना रेल्वेला १७0.३५ कोटी नुकसानभरपाई द्यावी लागली. मालमत्तेच्या नुकसानीपोटी रेल्वेला १२९.१७ कोटींचा आर्थिक फटका सहन करावा लागला. सन २0१३-१४मध्ये देशभरात ७१ रेल्वे अपघात घडले. त्यात मृत्युमुखी पडलेल्या ५४ जणांच्या कुटुंबियांना व ११९ गंभीर जखमींना ११.९३ कोटी रुपये नुकसानभरपाई द्यावी लागली, तर ७४.४१ कोटींचा आर्थिक फटका मालमत्तेच्या नुकसानीपोटी रेल्वे प्रशासनाला सहन करावा लागला. सन २0१४-१५मध्ये देशात ८0 गंभीर रेल्वे अपघात घडले. त्यात १२३ जण मृत्युमुखी पडले, तर ३३५ जण गंभीर जखमी झाले. या वर्षात रेल्वेला मृत आणि जखमींच्या नुकसानभरपाईपोटी १२३.११ कोटी मोजावे लागले. तर या अपघातांमध्ये झालेल्या मालमत्तेच्या झालेल्या नुकसानापोटी रेल्वेला ८१.९७ कोटी रुपयांचा आर्थिक फटका सहन करावा लागला.