शहरं
Join us  
Trending Stories
1
HSC Exam Result 2025 : कोकण पुन्हा नंबर 'वन'! बारावीचा निकाल जाहीर; मुलींचीच बाजी, जाणून घ्या निकाल
2
पहलगाम नरसंहाराला देशाचे गृहमंत्री अमित शाह जबाबदार; संजय राऊतांचा हल्लाबोल
3
Crime News: पंखा दाखवा म्हणाले अन् दुकानदारावर गोळी झाडून निघून गेले; घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
4
"मी पाकिस्तानात राहणाऱ्या मामे बहिणीशी लग्न केलं कारण..."; जवानाने उघड केलं मोठं रहस्य
5
"हिला पण गोळी मारायला हवी"; मुस्लिमांच्या विरोधात जाऊ नका म्हणणाऱ्या सैनिकाच्या पत्नीला केलं ट्रोल
6
भारत-पाकिस्तान तणावावर आज संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेची बैठक; बंद खोलीत चर्चेची मागणी
7
"पाकिस्तानवाल्यांनो मी तुमच्या सोबत, जय पाकिस्तान!" राखी सावंतचा व्हिडीओ पाहून संतापले नेटकरी
8
मोठी बातमी! पहलगाम नंतर पूंछ होते निशाण्यावर, दहशतवाद्यांचा मोठा कट फसला; ५ आयईडी जप्त
9
उदय कोटक यांचा रियल इस्टेट क्षेत्रात धमाका, केली देशातील सर्वात महागडी ४०० कोटींची प्रॉपर्टी डील
10
VIDEO: दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या तरुणाने पोलिसांपासून वाचण्यासाठी नदीत उडी मारली; इम्तियाजचा मृतदेह सापडल्याने खळबळ
11
लोकप्रिय 'पंचायत' सीरिजला सचिवजी देणार होते नकार? जितेंद्र कुमार म्हणाला, "मला वाटलं..."
12
"बॉलिवूड चोर आहे!" नवाजुद्दीन सिद्दीकीचं मोठं विधान, म्हणाला- "लोक या गोष्टींना कंटाळतात..."
13
Samsung ला ४४००००००००० रुपयांचा टॅक्स भरण्याचे आदेश; कंपनीने लावला Reliance Jio वर आरोप, प्रकरण काय?
14
Mumbai Fire: मुंबईत कपड्याच्या शोरुममध्ये अग्नितांडव! पाच मजली इमारतीत अडकलेले लहान मुलांसह १९ लोक
15
पाकिस्तान सुधारत नाही! सलग ११ व्या दिवशी युद्धबंदीचे उल्लंघन; भारतीय सैनिकांनी धडा शिकवला
16
Stock Market Today: १६० अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला, TATA Motors चा शेअर सुस्साट; ऑटो-आयटी क्षेत्रात तेजी
17
Pahalgam Attack Update: जम्मू काश्मिरातील तुरुंगावर दहशतवादी हल्ल्याचा अलर्ट, दहशतवादी आणि ओजीडब्ल्यू आहेत बंद
18
Video: चिनी फॅक्टरीत रोबोट अचानक झाला हिंसक; कर्मचाऱ्यांवर केला जीवघेणा हल्ला, मग...
19
FD द्वारे रक्कम होऊ शकते तिप्पट, अनेकांना माहितही नाही; ₹५ लाख जमा करा, ₹१५ लाखांपेक्षा जास्त मिळतील
20
मिचमिच डोळे, रडारचे कान...! एमजी अ‍ॅस्टरमधून पुण्यात आणि गावखेड्यात भटकंती, कशी वाटली एसयुव्ही...

सरकारी नोकऱ्यांमध्ये ३० टक्के कपात

By admin | Updated: September 20, 2016 06:24 IST

माहिती तंत्रज्ञानाचा (आयटी) वाढता वापर करून गतिमानता आणायची आणि सरकारी नोकऱ्यांमध्ये ३० टक्के कपात करायची असे नवे धोरण राज्य सरकार राबविणार आहे.

यदु जोशी,

मुंबई- माहिती तंत्रज्ञानाचा (आयटी) वाढता वापर करून गतिमानता आणायची आणि सरकारी नोकऱ्यांमध्ये ३० टक्के कपात करायची असे नवे धोरण राज्य सरकार राबविणार आहे. सातवा वेतन आयोग तोंडावर असतानाच राज्य सरकारने नोकरभरतीवर गदा आणल्याने बेरोजगारांच्या आशेवर पाणी फेरले आहे.राज्याचे मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय यांनी एक परिपत्रक काढून या कपातीचे स्पष्ट सूतोवाच केले आहे. प्रत्येक विभागाला आयटी सोल्यूशन्सच्या माध्यमातून एकूण मानव संसाधनांची मागणी ३० टक्क्यांपर्यंत खाली आणणे गरजेचे आहे. त्यासाठी विभागप्रमुखांनी स्वत: लक्ष घालणे आवश्यक आहे. आयटी सल्लागार तसेच टीम त्यासाठी तयार करावी. तसे करणाऱ्या विभागांना इन्सेंटीव्ह देण्यात येईल, असे या परिपत्रकात म्हटले आहे. दीर्घकालीन वित्तीय स्थैर्यासाठी वेतनवाढीचा सरासरी दर हा महसूल वाढीच्या सरासरी दरापेक्षा अधिक असता कामा नये हे सर्वसाधारण तत्त्व पाळणे आवश्यक आहे. सातव्या वेतन आयोगामुळे आगामी काळात वेतनावरील खर्चात होणारी संभाव्य वाढ, त्याचबरोबर १९८० ते १९९० या दशकात मोठ्या प्रमाणात झालेल्या नियुक्त्यांमुळे येत्या काही वर्षांत निवृत्तिवेतन देण्यासाठी मोठा आर्थिक भार पडणार असल्याच्या पार्श्वभूमीवर, मुख्य सचिवांनी नवीन भरतीची मागणी खाली आणण्यास सांगितले आहे. राज्य सरकारी कर्मचारी आणि अधिकाऱ्यांची २५ टक्के पदे रिक्त आहेत. ही पदे भरण्याची मागणी विविध संघटना करीत असताना आता सरकारने आहे त्या नोकऱ्यांमध्ये भविष्यात ३० टक्के कपात करण्याची भूमिका घेतली असल्याचे या परिपत्रकावरून स्पष्ट होते. सध्या सरकारी कर्मचारी आणि अधिकाऱ्यांची संख्या १७ लाखांच्या घरात असून, सेवानिवृत्तांची संख्या ६ लाख इतकी आहे. >वेतन आयोगाचा भारसातव्या वेतन आयोगामुळे राज्याच्या तिजोरीवर वर्षाकाठी अंदाजे १५ हजार कोटींचा अतिरिक्त भार पडणार आहे. सध्या अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या पगारावर वर्षाकाठी 80 हजार कोटी रुपये खर्च होतात. निवृत्तिवेतनावर 20 हजार कोटी रुपये असे मिळून एकूण खर्च एक लाख कोटी रुपये इतका आहे.