शहरं
Join us  
Trending Stories
1
HSC Exam Result 2025 : कोकण पुन्हा नंबर 'वन'! बारावीचा निकाल जाहीर; मुलींचीच बाजी, जाणून घ्या निकाल
2
पहलगाम नरसंहाराला देशाचे गृहमंत्री अमित शाह जबाबदार; संजय राऊतांचा हल्लाबोल
3
Crime News: पंखा दाखवा म्हणाले अन् दुकानदारावर गोळी झाडून निघून गेले; घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
4
"मी पाकिस्तानात राहणाऱ्या मामे बहिणीशी लग्न केलं कारण..."; जवानाने उघड केलं मोठं रहस्य
5
"हिला पण गोळी मारायला हवी"; मुस्लिमांच्या विरोधात जाऊ नका म्हणणाऱ्या सैनिकाच्या पत्नीला केलं ट्रोल
6
भारत-पाकिस्तान तणावावर आज संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेची बैठक; बंद खोलीत चर्चेची मागणी
7
"पाकिस्तानवाल्यांनो मी तुमच्या सोबत, जय पाकिस्तान!" राखी सावंतचा व्हिडीओ पाहून संतापले नेटकरी
8
मोठी बातमी! पहलगाम नंतर पूंछ होते निशाण्यावर, दहशतवाद्यांचा मोठा कट फसला; ५ आयईडी जप्त
9
उदय कोटक यांचा रियल इस्टेट क्षेत्रात धमाका, केली देशातील सर्वात महागडी ४०० कोटींची प्रॉपर्टी डील
10
VIDEO: दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या तरुणाने पोलिसांपासून वाचण्यासाठी नदीत उडी मारली; इम्तियाजचा मृतदेह सापडल्याने खळबळ
11
लोकप्रिय 'पंचायत' सीरिजला सचिवजी देणार होते नकार? जितेंद्र कुमार म्हणाला, "मला वाटलं..."
12
"बॉलिवूड चोर आहे!" नवाजुद्दीन सिद्दीकीचं मोठं विधान, म्हणाला- "लोक या गोष्टींना कंटाळतात..."
13
Samsung ला ४४००००००००० रुपयांचा टॅक्स भरण्याचे आदेश; कंपनीने लावला Reliance Jio वर आरोप, प्रकरण काय?
14
Mumbai Fire: मुंबईत कपड्याच्या शोरुममध्ये अग्नितांडव! पाच मजली इमारतीत अडकलेले लहान मुलांसह १९ लोक
15
पाकिस्तान सुधारत नाही! सलग ११ व्या दिवशी युद्धबंदीचे उल्लंघन; भारतीय सैनिकांनी धडा शिकवला
16
Stock Market Today: १६० अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला, TATA Motors चा शेअर सुस्साट; ऑटो-आयटी क्षेत्रात तेजी
17
Pahalgam Attack Update: जम्मू काश्मिरातील तुरुंगावर दहशतवादी हल्ल्याचा अलर्ट, दहशतवादी आणि ओजीडब्ल्यू आहेत बंद
18
Video: चिनी फॅक्टरीत रोबोट अचानक झाला हिंसक; कर्मचाऱ्यांवर केला जीवघेणा हल्ला, मग...
19
FD द्वारे रक्कम होऊ शकते तिप्पट, अनेकांना माहितही नाही; ₹५ लाख जमा करा, ₹१५ लाखांपेक्षा जास्त मिळतील
20
मिचमिच डोळे, रडारचे कान...! एमजी अ‍ॅस्टरमधून पुण्यात आणि गावखेड्यात भटकंती, कशी वाटली एसयुव्ही...

मातीच्या धरणात ३0 टक्केच पाणी

By admin | Updated: January 16, 2017 01:04 IST

वाफगाव (ता. खेड) येथील मातीच्या धरणात अवघा ३० टक्के पाणीसाठा उरला आहे.

दावडी : वाफगाव (ता. खेड) येथील मातीच्या धरणात अवघा ३० टक्के पाणीसाठा उरला आहे. एक महिनाभर पुरेल एवढाच पाणीसाठा धरणात शिल्लक असून उन्हाळ्याचे अजून चार महिने बाकी असल्याने शेतकरी चिंताग्रत झाला आहे.वाफगाव येथे वेळ नदीवर लघु पाटबंधारे विभागाचे मातीचे धरण आहे. वाफगाव, वरुडे, पारगाव, गुळाणी या परिसराला धरणातील पाणी वरदान ठरले आहे. रब्बी हंगामात येथील शेतकरी कांदा, बटाटा व इतर तरकारी पिके घेतात. आॅगस्ट महिन्यात धरण पूर्ण क्षमतेने भरुन सांडव्यावरुन पाणी वाहात होते. वरुडे व वाफगाव येथील शेतकऱ्यांच्या मागणीनुसार वेळोवेळी धरणाच्या चारीवाटे पाणी सोडण्यात आले. तसेच धरणातून मोठ्या प्रमाणात शेतीसाठी पाण्याचा उपसा होत असल्यामुळे जानेवारी महिन्यातच धरणात ३० टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. असाच पाणी उपसा सुरु राहिल्यास महिन्याभरात या धरणात पाण्याचा थेंबही राहणार नाही. त्यामुळे ऐन उन्हाळ्यात वाफगाव परिसरात पिण्याच्या पाण्यचा प्रश्न गंभीर होणार आहे. तसेच जनावरांना पाण्यासाठी भटकावे लागणार आहे. (वार्ताहर)>गेल्या पाच वर्षांत प्रथमच जानेवारी महिन्यातच धरण कोरडे पडले आहे. त्यामुळे येथील शेतकऱ्यांना उन्हाळी पिके घेता येणार नाहीत. पाण्यावाचून नागरिकांचे हाल होणार आहेत उन्हाळ्याचे चार महिने कसे काढायचे ही चिंता शेतकऱ्यांना सतावत आहे. मासेमारी करणारा आदिवासी नागरिक हतबल झाला आहे.