शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

३ लाख शेतकऱ्यांनी उतरविला पीकविमा

By admin | Updated: August 16, 2016 18:35 IST

बुलढाणा जिल्ह्यातील बिगर कर्जदार २ लक्ष ७९ हजार ८४३ शेतकऱ्यांनी खरीपाचा पीकविमा उतरविला

ऑनलाइन लोकमत

खामगाव, दि. 16 - बुलढाणा जिल्ह्यातील बिगर कर्जदार २ लक्ष ७९ हजार ८४३ शेतकऱ्यांनी खरीपाचा पीकविमा उतरविला आहे. त्यामुळे पिकांना विमा संरक्षण देण्याचे महत्व शेतकऱ्यांना चांगलेच पटले आहे. हे यावरून स्पष्ट होत आहे.महाराष्ट्र शासनाने पंतप्रधान पीकविमा योजना यावर्षी नव्याने सुरू केली आहे. नैसर्गिक आपत्ती, कीड आणि रोगांमुळे पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना विमा संरक्षण देण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या या योजनेत बरेच बदल करण्यात आले आहेत. पंतप्रधान पीक विमा योजना पीक कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांना बंधनकारक करण्यात आली असून, बिगर कर्जदार शेतकऱ्यांना ही योजना ऐच्छिक ठेवण्यात आली आहे. खरिपाच्या हंगामासाठी सुरुवातीला ३१ जुलैपर्यंत पीकविमा काढण्याची मुदत देण्यात आली होती. त्यानंतर २ आॅगस्टपर्यंत या योजनेला मुदतवाढ देण्यात आली. शेतकऱ्यांच्या मागणीवरून तिसऱ्यांदा १० आॅगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यात आली. बिगर कर्जदार असलेल्या जिल्ह्यातील जवळपास ३ लाख शेतकऱ्यांनी खरीपाच्या विविध पिकांसाठी पीकविमा उतरविला आहे. तर विविध बँकांमधून पीक कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांचा पीक विमा बँकाकडूनच उतरविण्यात आला आहे. त्यामुळे खरिपाच्या विविध पिकांचा विमा उतरविणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या ५ लाखांच्या जवळ राहण्याची शक्यता आहे.आधुनिक तंत्रज्ञानाचा होणार वापरपिकांच्या उत्पन्नाचे अंदाज अचूक व्हावेत, यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर या योजनेच्या माध्यमातून केल्या जाणार आहे. पिक कापणी प्रयोगांव्दारे मिळणारे उत्पन्नाचे अंदाज हे अचूक व दिलेल्या कालमर्यादेमध्ये प्राप्त होणे आवश्यक आहे. त्यासाठी उपग्रहाव्दारे प्राप्त फोटोच्या साह्याने पिक कापणी प्रयोग आयोजीत करण्यात येणार असून उत्पन्नाच्या अंदाजासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे.गतवर्षीचा आकडा जुळता जुळेनापीक विमा न काढलेल्या सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकऱ्यांना मदत देण्याची योजना शासनाने फेब्रुवारी २०१६ मध्ये जाहीर केली. त्यानुसार मागच्या वर्षी खरिपाचा पीकविमा न काढलेल्या शेतकऱ्यांची माहिती संकलित करण्याचे काम महसूल व कृषी विभागाकडून करण्यात येत आहे. गेल्या ६ महिन्यापासून अशा शेतकऱ्यांची माहिती मिळविण्यात येत आहे. मात्र अद्यापपर्यंत कृषी विभाग किंवा महसूल विभागाकडे पीक विमा न काढले्ल्या शेतकऱ्यांचा आकडा नाही. मंजूर झालेल्या पीक विम्याच्या निम्मे रक्कम या योजनेद्वारे आता शेतकऱ्यांना मिळणार आहे. मात्र शेतकऱ्यांची माहितीच जुळत नसल्याने जिल्ह्यातील हजारो शेतकरी या मदतीपासून वंचित आहेत.