शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची मोठी घोषणा...! 'या' देशांना दिली जाणार टॅरिफ सूट, नवा कार्यकारी आदेश जारी
2
पाकिस्तानात क्रिकेट सामन्यादरम्यानच मैदानात बॉम्बस्फोट; एकाचा मृत्यू, अनेक जखमी
3
भारत-रशिया-चीन एकत्र बघून NATOचं टेन्शन वाढलं? युक्रेन युद्धासंदर्भात 'या' नेत्याचं मोठं विधान!
4
आता रशिया-युक्रेन युद्ध थांबणार? पंतप्रधान मोदींची फ्रान्सच्या अध्यक्षांसोबत चर्चा; मॅक्रॉन म्हणाले...!
5
ओबीसींचा महामोर्चा काढणार, दोन पातळ्यांवर लढणार; काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा निर्धार
6
...अन् हिटमॅन रोहित शर्मानं चाहत्यांना हात जोडून केली विनंती; नेमकं काय घडलं? व्हिडिओ व्हायरल
7
विसर्जनासाठी गेलेला 'गणेश' गिरणा पात्रात वाहून गेला, आई-वडिलांच्या डोळ्यासमोरच तरुण मुलगा बुडाला... 
8
गुजरातमधील पंचमहल यथे मोठा अपघात; पावागडमध्ये रोपवे कोसळला, 6 जणांचा मृत्यू
9
भाईंदरमध्ये गणेश मंडळाच्या कार्यकर्त्याचा शॉक लागून मृत्यू 
10
“PM मोदींच्या नेतृत्वाखालील सक्षम, नवीन भारत आपले परराष्ट्र धोरण स्वतः ठरवतो”: CM फडणवीस
11
एकनाथ शिंदे यांनी घेतली शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांची भेट; म्हणाले, “अभिमानास्पद...”
12
गोपाळ शेट्टींसह मेहता, गुप्ता, मिश्रा अन् शर्मा यांच्यावर मुंबई भाजपानं दिली मोठी जबाबदारी
13
फक्त ३ वर्षांत दिला ५३२% परतावा, आता कंपनीला मिळाली ₹३,००,००,००० ची ऑरडर; ₹१०० पेक्षाही स्वस्त आहे शेअर!
14
Asia Cup Record : सचिन तेंडुलकर भारताचा 'नंबर वन ऑलराउंडर'; जयसूर्याची तर गोष्टच न्यारी
15
अमेरिका निघाली होती रशियाला पंगू बनवायला, आता स्वतःवरच आली अंडी खरेदीची वेळ! ३२ वर्षांत पहिल्यांदाच...
16
CM फडणवीसांकडून ग्रीन सिग्नल मिळताच अजित पवार गटाला बसणार झटका?; भाजपा आमदार लागले कामाला
17
राज ठाकरेंना मिळणार खास मान...यंदाचा शिवसेनेचा 'दसरा मेळावा' ठाकरे बंधू गाजवणार?
18
जीएसटी कमी झाल्यानंतर, किती रुपयांवर येईल Maruti Baleno? किती रुपयांचा होईल फायदा? जाणून घ्या
19
जगातील सगळ्यात महागडी शाळा; वर्षाची फी तब्बल १,१३,७३,७८० रुपये! आहे तरी कुठे नक्की?
20
चंद्रग्रहण २०२५: तुमच्या राशीनुसार करा ‘हे’ दान, धनवान बनाल; कल्याण होईल, सुख-सुबत्ता लाभेल

३ लाख शेतकऱ्यांनी उतरविला पीकविमा

By admin | Updated: August 16, 2016 18:35 IST

बुलढाणा जिल्ह्यातील बिगर कर्जदार २ लक्ष ७९ हजार ८४३ शेतकऱ्यांनी खरीपाचा पीकविमा उतरविला

ऑनलाइन लोकमत

खामगाव, दि. 16 - बुलढाणा जिल्ह्यातील बिगर कर्जदार २ लक्ष ७९ हजार ८४३ शेतकऱ्यांनी खरीपाचा पीकविमा उतरविला आहे. त्यामुळे पिकांना विमा संरक्षण देण्याचे महत्व शेतकऱ्यांना चांगलेच पटले आहे. हे यावरून स्पष्ट होत आहे.महाराष्ट्र शासनाने पंतप्रधान पीकविमा योजना यावर्षी नव्याने सुरू केली आहे. नैसर्गिक आपत्ती, कीड आणि रोगांमुळे पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना विमा संरक्षण देण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या या योजनेत बरेच बदल करण्यात आले आहेत. पंतप्रधान पीक विमा योजना पीक कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांना बंधनकारक करण्यात आली असून, बिगर कर्जदार शेतकऱ्यांना ही योजना ऐच्छिक ठेवण्यात आली आहे. खरिपाच्या हंगामासाठी सुरुवातीला ३१ जुलैपर्यंत पीकविमा काढण्याची मुदत देण्यात आली होती. त्यानंतर २ आॅगस्टपर्यंत या योजनेला मुदतवाढ देण्यात आली. शेतकऱ्यांच्या मागणीवरून तिसऱ्यांदा १० आॅगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यात आली. बिगर कर्जदार असलेल्या जिल्ह्यातील जवळपास ३ लाख शेतकऱ्यांनी खरीपाच्या विविध पिकांसाठी पीकविमा उतरविला आहे. तर विविध बँकांमधून पीक कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांचा पीक विमा बँकाकडूनच उतरविण्यात आला आहे. त्यामुळे खरिपाच्या विविध पिकांचा विमा उतरविणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या ५ लाखांच्या जवळ राहण्याची शक्यता आहे.आधुनिक तंत्रज्ञानाचा होणार वापरपिकांच्या उत्पन्नाचे अंदाज अचूक व्हावेत, यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर या योजनेच्या माध्यमातून केल्या जाणार आहे. पिक कापणी प्रयोगांव्दारे मिळणारे उत्पन्नाचे अंदाज हे अचूक व दिलेल्या कालमर्यादेमध्ये प्राप्त होणे आवश्यक आहे. त्यासाठी उपग्रहाव्दारे प्राप्त फोटोच्या साह्याने पिक कापणी प्रयोग आयोजीत करण्यात येणार असून उत्पन्नाच्या अंदाजासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे.गतवर्षीचा आकडा जुळता जुळेनापीक विमा न काढलेल्या सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकऱ्यांना मदत देण्याची योजना शासनाने फेब्रुवारी २०१६ मध्ये जाहीर केली. त्यानुसार मागच्या वर्षी खरिपाचा पीकविमा न काढलेल्या शेतकऱ्यांची माहिती संकलित करण्याचे काम महसूल व कृषी विभागाकडून करण्यात येत आहे. गेल्या ६ महिन्यापासून अशा शेतकऱ्यांची माहिती मिळविण्यात येत आहे. मात्र अद्यापपर्यंत कृषी विभाग किंवा महसूल विभागाकडे पीक विमा न काढले्ल्या शेतकऱ्यांचा आकडा नाही. मंजूर झालेल्या पीक विम्याच्या निम्मे रक्कम या योजनेद्वारे आता शेतकऱ्यांना मिळणार आहे. मात्र शेतकऱ्यांची माहितीच जुळत नसल्याने जिल्ह्यातील हजारो शेतकरी या मदतीपासून वंचित आहेत.