शहरं
Join us  
Trending Stories
1
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
2
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
3
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
4
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
7
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
8
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
9
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
10
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
11
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
12
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
13
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
14
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
15
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
16
IPL 2026: कोलकाताच्या तोंडातून विजयी घास हिसकावला; मुकुल चौधरीची फलंदाजी पाहून ऋषभ पंत गेला भारावून!
17
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
18
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
19
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
20
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
Daily Top 2Weekly Top 5

3 लाख शेतकरी मदतीपासून वंचित

By admin | Updated: November 1, 2016 18:56 IST

गेल्या वर्षी पीक विमा न काढलेल्या सोयाबिन उत्पादक शेतक-यांची माहिती संकलीत करण्यासाठी कृषी आणि महसूल विभागाकडून करण्यात आलेली

ऑनलाइन लोकमत/ गणेश मापारी 
खामगाव, (जि.बुलडाणा), दि. 01 - गेल्या  वर्षी पीक विमा न काढलेल्या सोयाबिन उत्पादक शेतक-यांची माहिती संकलीत करण्यासाठी कृषी आणि महसूल विभागाकडून करण्यात आलेली टोलवा टोलवी शेतक-यांच्या मुळावर आली आहे. विमा न काढलेल्या सोयाबिन उत्पादक शेतकºयांची माहिती शासनाकडे उशीरा पोहचल्याने जिल्ह्यातील तीन लाख सोयाबिन उत्पादक शेतकरी अद्यापही मदतीपासून वंचित असल्याची माहिती उजेडात आली आहे. 
गत तीन-चार वर्षांपासून शेतक-यांना दुष्काळाचा सामना करावा लागत आहे. असे असतांनाही दुष्काळग्रस्त शेतकºयांना शासनाकडून ठोस अशी काहीही मदत मिळालेली नाही. दरम्यान खरिप आणि रब्बी हंगामातील विविध पिकांचा विमा उतरविलेल्या शेतकºयांना पीक विमा योजनेने काहीसा दिलासा दिला आहे. मात्र पीक विमा न काढलेल्या शेतकºयांकडे यावर्षी पेरणीची सुध्दा सोय नव्हती. ही बाब हेरुन शासनाने औरंगाबाद, नाशिक, नागपूर व अमरावती या चार विभागातील कापूस, सोयाबीन आणि धान उत्पादक शेतक-यांना मदत करण्याचा निर्णय फेब्रुवारी २०१६ मध्ये घेतला. औरंगाबाद आणि नाशिक विभागातील कापूस उत्पादक शेतक-यांसाठी तर अमरावती व नागपूर विभागातील सोयाबीन आणि धान उत्पादक शेतकºयांना मदत देण्याची योजना शासनाने आखली. पीक विमा न काढलेल्या शेतक-यांना पीक विम्याच्या निम्मे रक्कम मदत म्हणून देण्यासाठी या चारही विभागातील कापूस, सोयाबीन व धान उत्पादक शेतक-यांची माहिती मागविण्यात आली. 
बुलडाणा जिल्ह्यात सोयाबीन उत्पादक व पीक विमा न काढलेल्या शेतक-यांना ही मदत मिळणार आहे. त्यामुळे प्रशासनाने पीक विमा न काढलेल्या सोयाबीन उत्पादक शेतकºयांची माहिती मार्च-एप्रिल २०१६ मध्ये शासनाला देणे अपेक्षित होते. मात्र सोयाबिन उत्पादक शेतकºयांची माहिती संकलीत करण्यासाठी कृषी विभागाने महसूल विभागाकडे बोट दाखविले. तर महसूल विभागाने सुध्दा सदर माहिती कृषी विभागानेच संकलीत करावी, अशी भुमीका घेतली. 
दोन शाासकीय विभागांच्या या धारेणामुळे जिल्ह्यातील सोयाबिन उत्पादक शेतकºयांची माहिती शासनाकडे वेळेवर पोहचली नाही. जिल्ह्यातील सोयाबिन उत्पादक शेतक-यांची माहिती आॅक्टोबर महिन्यामध्ये शासनाला सादर करण्यात आली असून मदतीचा प्रस्ताव पाठविण्यात आला आहे.  त्यामुळे जिल्ह्यातील तीन लाख सोयाबिन उत्पादक शेतकरी अद्याप पर्यंत शासकीय मदतीपासून वंचित आहेत. 
 
जिल्हाधिकाºयांनी दिली होती २५ आॅगस्टची ‘डेड’लाईन
४सोयाबीन उत्पादक शेतक-यांची माहिती जुळविण्यासाठी कृषी व महसूल विभागाच्या अनेक बैठका घेण्यात आल्या आहेत. मात्र आॅगस्ट महिन्याच्या दुस-या आठवड्या पर्यंत एकाही तालुक्याची माहिती संकलीत झाली नव्हती. त्यामुळे सदर माहिती  सादर करण्यासाठी जिल्हाधिका-यांनी तहसिलदार आणि कृषी अधिकाºयांना २५ आॅगस्टची ‘डेड’लाईन दिली होती. या तारखेपर्यंत सुध्दा माहिती संकलीत झाली नाही.
दोन्ही विभागातील जिल्ह्यांमधील माहिती संकलन उशीरा
४अमरावती -नागपूर या दोन्ही विभागातील सर्वच जिल्ह्यामधील सोयाबिन व धान उत्पादक शेतकºयांची माहिती शासनाकडे उशीरा सादर करण्यात आली आहे. त्यामुळे जिल्हाधिकाºयांकडून सादर करण्यात आलेल्या मदतीच्या प्रस्तावावर शासनाने अद्याप निर्णय घेतला नसून शेतकºयांच्या खात्यात मदतीची रक्कमही पोहचलेली नाही. 
 
 
विमा न काढलेले २०१५ मधील सोयाबिन उत्पादक शेतकरी
बुलडाणा -24506,  चिखली-  36406,  दे.राजा- 10178,  सि.राजा- 21728, मलकापूर - 23952, नांदुरा - 26420, संग्रामपूर - 13069, जळगाव जामोद - 26047, शेगाव - 15939, खामगाव - 34511, लोणार- 18110, मेहकर - 37733, मोताळा- 10680