शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू काश्मीरमध्ये सैन्याच्या गणवेशात दिसले काही संशयित; महिलेची पोलिसांत धाव, शोधमोहीम सुरू
2
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली
3
काका-पुतणे पुन्हा एकत्र येणार? शरद पवार पक्षाच्या बैठकीत कशाबद्दल चर्चा? वाचा
4
तुर्कस्तानचा पाकला पाठिंबा, JNUचा मोठा निर्णय; तुर्की विद्यापीठाबरोबचा करार केला रद्द
5
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
6
आधी चिनी एअर डिफेन्स सिस्टिमला केलं झटक्यात जॅम, नंतर भारताने पाकिस्तानचा केला करेक्ट कार्यक्रम   
7
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
8
आधी ग्राहकांना फोटो दाखवायची, नंतर त्यांच्यासोबत लॉजमध्ये पाठवायची; पालघरमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
9
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
10
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
11
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
12
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
13
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
14
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
15
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
16
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
17
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
18
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
19
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
20
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत

शेतकऱ्यांच्या भरपाईसाठी २७०.१४ कोटींचा निधी

By admin | Updated: October 19, 2016 03:39 IST

अवकाळी पाऊस व गारपीट यामुळे अनेक ठिकाणी घरांची पडझड व मालमत्तेचे नुकसान होऊन वित्तहानी झाली होती.

हितेन नाईक,

पालघर- पालघर जिल्ह्यासह अन्य चार जिल्ह्यात फेब्रुवारी व मार्च २०१५ मध्ये झालेल्या अवकाळी पाऊस व गारपीट यामुळे अनेक ठिकाणी घरांची पडझड व मालमत्तेचे नुकसान होऊन वित्तहानी झाली होती. तसेच भातिपकांचे विशेषत: बागायती शेतीचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले होते. अशा शेतकऱ्यांना नुकसान भरपाई म्हणून ४२४८.८९ कोटींचा निधी उपलब्ध करून देण्यात आला असून त्यापैकी २७०.१४ कोटींचा निधी पालघर जिल्ह्यासाठी राज्य शासनाने उपलब्ध करून दिला आहे. या वेळी मच्छीमारांच्या तोंडाला मात्र शासनाने पाने पुसल्याने मच्छीमारा मध्ये नाराजी पसरली आहे.जिल्ह्यात आंबा, काजू, चिकू यांसह अन्य शेती उत्पादनांचं नुकसान लक्षणीय होतं. या गारपीटीमध्ये नुकसान झालेल्या राज्यभरातील शेतकरी व अन्य आपदग्रस्तांना विशेष बाब म्हणून शासनाने नुकसान भरपाई जाहीर केली असून पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री विष्णू सवरा यांच्या विशेष प्रयत्नांतून पालघर जिल्ह्यातील नुकसानग्रस्तांसाठी २७०.१४ कोटींचा विशेष निधी उपलब्ध करण्यात आला आहे.फेब्रुवारी व मार्च २०१५ मध्ये झालेला अवकाळी पाऊस व गारपीट यामुळे राज्यातील रत्नागिरी जिल्ह्याला ३६२४.५१ कोटी पालघर जिल्ह्याला २७०.१४, नागपूर जिल्ह्याला ३२८.७८, भंडारा जिल्ह्याला २५.११ व चंद्रपूर जिल्ह्याला ०.३५ लाख असा एकूण ४२४८.८९ कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या जिल्हयात शेती उत्पादनांचे मोठे नुकसान झाले होते तर काही ठिकाणी जिवीतहानी-वित्तहानीही झाली होती. कोकणातील रत्नागिरी व पालघर जिल्ह्यातील आंबा, चिकू व अन्य बागायती फळ पिकांचं मोठ्याप्रमाणात नुकसान झालं होतं.