शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांच्या भरपाईसाठी २७०.१४ कोटींचा निधी

By admin | Updated: October 19, 2016 03:39 IST

अवकाळी पाऊस व गारपीट यामुळे अनेक ठिकाणी घरांची पडझड व मालमत्तेचे नुकसान होऊन वित्तहानी झाली होती.

हितेन नाईक,

पालघर- पालघर जिल्ह्यासह अन्य चार जिल्ह्यात फेब्रुवारी व मार्च २०१५ मध्ये झालेल्या अवकाळी पाऊस व गारपीट यामुळे अनेक ठिकाणी घरांची पडझड व मालमत्तेचे नुकसान होऊन वित्तहानी झाली होती. तसेच भातिपकांचे विशेषत: बागायती शेतीचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले होते. अशा शेतकऱ्यांना नुकसान भरपाई म्हणून ४२४८.८९ कोटींचा निधी उपलब्ध करून देण्यात आला असून त्यापैकी २७०.१४ कोटींचा निधी पालघर जिल्ह्यासाठी राज्य शासनाने उपलब्ध करून दिला आहे. या वेळी मच्छीमारांच्या तोंडाला मात्र शासनाने पाने पुसल्याने मच्छीमारा मध्ये नाराजी पसरली आहे.जिल्ह्यात आंबा, काजू, चिकू यांसह अन्य शेती उत्पादनांचं नुकसान लक्षणीय होतं. या गारपीटीमध्ये नुकसान झालेल्या राज्यभरातील शेतकरी व अन्य आपदग्रस्तांना विशेष बाब म्हणून शासनाने नुकसान भरपाई जाहीर केली असून पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री विष्णू सवरा यांच्या विशेष प्रयत्नांतून पालघर जिल्ह्यातील नुकसानग्रस्तांसाठी २७०.१४ कोटींचा विशेष निधी उपलब्ध करण्यात आला आहे.फेब्रुवारी व मार्च २०१५ मध्ये झालेला अवकाळी पाऊस व गारपीट यामुळे राज्यातील रत्नागिरी जिल्ह्याला ३६२४.५१ कोटी पालघर जिल्ह्याला २७०.१४, नागपूर जिल्ह्याला ३२८.७८, भंडारा जिल्ह्याला २५.११ व चंद्रपूर जिल्ह्याला ०.३५ लाख असा एकूण ४२४८.८९ कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या जिल्हयात शेती उत्पादनांचे मोठे नुकसान झाले होते तर काही ठिकाणी जिवीतहानी-वित्तहानीही झाली होती. कोकणातील रत्नागिरी व पालघर जिल्ह्यातील आंबा, चिकू व अन्य बागायती फळ पिकांचं मोठ्याप्रमाणात नुकसान झालं होतं.