शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्य सरकारकडून बिल वेळेत मिळालं नाही; कंत्राटदाराने उचललं टोकाचं पाऊल; विरोधकांचा हल्लाबोल
2
ब्रिटिशांसारखीच भारतावरही २१ वर्षांपूर्वी वेळ आलेली...; जेव्हा मिराज-२००० मॉरीशसमध्ये अडकलेले...
3
"मंदिरातून साईबाबांची मूर्ती हटवा अन्...." हिंदू सेनेच्या तलवार बाबाचे संतापजनक विधान
4
FD, SIP सर्व विसरुन जाल... Post Office कडे आहेत जबरदस्त सेव्हिंग स्कीम्स; एकदा गुंतवणूक, दरवर्षी मिळतील २.४६ लाख
5
भारत-पाक युद्ध थांबविणारे ट्रम्प कोण? दाल में कुछ तो काला है : राहुल गांधी
6
चीनच्या 'मच्छर'नंतर आता 'झुरळ' बनणार युद्धभूमीतलं नवं शस्त्र; 'या' देशानं बनवला खतरनाक प्लॅन
7
श्रीराम-भरत मिलाप! रामायणातील महत्वाची घटना; सिनेमाबद्दल आदिनाथ कोठारे म्हणतो...
8
आजचे राशीभविष्य २४ जुलै २०२५: धनलाभ होऊन प्राप्तीत वाढ होईल, विचारात एकदम बदल होतील
9
विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदावर काँग्रेसचा दावा; उद्धवसेनेकडून पाठिंबा मिळण्याची शक्यता
10
शिक्षिकेसोबत मुलाचे शारीरिक संबंध आहेत हे आई-वडिलांना माहिती होतं; लेडी टीचरला मिळाला जामीन
11
बनावट दूतावास उघडले, ४ खोटे देशही बनविले; गाझियाबादमध्ये कारवाई; ४४ लाख रुपये, शिक्के जप्त
12
पाच वर्षांनंतर भारताचा मोठा निर्णय; चिनी पर्यटकांना पुन्हा व्हिसा, चीनकडूनही स्वागत
13
‘ग्रीन इंडिया’मध्ये महाराष्ट्राला सहा वर्षांपासून निधीच नाही; देशभरात एकूण ७४५ कोटी रुपये निधी उपलब्ध
14
कौटुंबिक हिंसाचाराच्या तक्रारीनंतर दोन महिने अटक करता येणार नाही; कायद्याचा गैरवापर टाळण्यासाठी कोर्टाचा उपाय
15
मृत्यूच्या दारातून प्रेमाच्या बंधनात! ज्यानं प्राण वाचवले, त्याच ड्रायव्हरशी केलं लग्न
16
उंच गणेशमूर्तींच्या विसर्जनासाठी कृत्रिम तलाव बांधणे शक्य आहे का? हायकोर्टाने सरकारकडे मागितली माहिती
17
एटीएसमुळे आयुष्य उद्ध्वस्त झाले, शेख यांची खंत; ना वडिलांच्या दफनविधीला, ना मुलीच्या लग्नाला आलाे !
18
पाकिस्तान दहशतवादात बुडालेला कट्टरपंथी देश; भारताने सुरक्षा परिषदेच्या बैठकीत सुनावले खडे बोल
19
६० टक्के महामंडळांचे वाटप ठरले, ‘मलईदार’ मंडळांबाबत रस्सीखेंच
20
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या ७ तलावांपैकी एक; तानसा तलाव भरून वाहू लागला!

शेतकऱ्यांच्या भरपाईसाठी २७०.१४ कोटींचा निधी

By admin | Updated: October 19, 2016 03:39 IST

अवकाळी पाऊस व गारपीट यामुळे अनेक ठिकाणी घरांची पडझड व मालमत्तेचे नुकसान होऊन वित्तहानी झाली होती.

हितेन नाईक,

पालघर- पालघर जिल्ह्यासह अन्य चार जिल्ह्यात फेब्रुवारी व मार्च २०१५ मध्ये झालेल्या अवकाळी पाऊस व गारपीट यामुळे अनेक ठिकाणी घरांची पडझड व मालमत्तेचे नुकसान होऊन वित्तहानी झाली होती. तसेच भातिपकांचे विशेषत: बागायती शेतीचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले होते. अशा शेतकऱ्यांना नुकसान भरपाई म्हणून ४२४८.८९ कोटींचा निधी उपलब्ध करून देण्यात आला असून त्यापैकी २७०.१४ कोटींचा निधी पालघर जिल्ह्यासाठी राज्य शासनाने उपलब्ध करून दिला आहे. या वेळी मच्छीमारांच्या तोंडाला मात्र शासनाने पाने पुसल्याने मच्छीमारा मध्ये नाराजी पसरली आहे.जिल्ह्यात आंबा, काजू, चिकू यांसह अन्य शेती उत्पादनांचं नुकसान लक्षणीय होतं. या गारपीटीमध्ये नुकसान झालेल्या राज्यभरातील शेतकरी व अन्य आपदग्रस्तांना विशेष बाब म्हणून शासनाने नुकसान भरपाई जाहीर केली असून पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री विष्णू सवरा यांच्या विशेष प्रयत्नांतून पालघर जिल्ह्यातील नुकसानग्रस्तांसाठी २७०.१४ कोटींचा विशेष निधी उपलब्ध करण्यात आला आहे.फेब्रुवारी व मार्च २०१५ मध्ये झालेला अवकाळी पाऊस व गारपीट यामुळे राज्यातील रत्नागिरी जिल्ह्याला ३६२४.५१ कोटी पालघर जिल्ह्याला २७०.१४, नागपूर जिल्ह्याला ३२८.७८, भंडारा जिल्ह्याला २५.११ व चंद्रपूर जिल्ह्याला ०.३५ लाख असा एकूण ४२४८.८९ कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या जिल्हयात शेती उत्पादनांचे मोठे नुकसान झाले होते तर काही ठिकाणी जिवीतहानी-वित्तहानीही झाली होती. कोकणातील रत्नागिरी व पालघर जिल्ह्यातील आंबा, चिकू व अन्य बागायती फळ पिकांचं मोठ्याप्रमाणात नुकसान झालं होतं.