शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारताकडे केवळ २ पर्याय आहेत..."; शाहांच्या विधानानंतर पाकिस्तानचा थयथयाट, थेट युद्धाची धमकी
2
"अमेरिका भूतकाळातून काही शिकली नाही, बळाद्वारे शांतता प्रस्थापित होत नाही’’, इराणवरील हल्ल्यावरून रशिया,चीनचा टोला
3
Shiv Sena UBT: मराठवाड्यात उद्धव ठाकरेंना मोठा झटका, मोठ्या नेत्याने सोडली साथ!
4
महागाईचा काळ... बँक FD चे कमी व्याजदर! 'या' ५ सरकारी योजना तुमचं नशीब बदलतील, वाचा संपूर्ण माहिती
5
रॅलीमध्ये कारखाली चिरडून एकाचा मृत्यू; जगन मोहन रेड्डींविरोधात गुन्हा दाखल
6
परीक्षेत कमी गुण मिळाले, जाब विचारताच उलट बोलली, वडिलांकडून मुलीला बेदम मारहाण, तडफडून मृत्यू, सांगलीतील धक्कादायक घटना 
7
Video: चालत्या ट्रेनमध्ये मारहाण अन् चोरीचा प्रयत्न; अभिनेत्रीसोबत घडली धक्कादायक घटना
8
इराण जे सांगतोय ते भारत आणि चीन होऊच देणार नाहीत, दोघंही मोठे व्यापारी; अमेरिकेचं गणित समजून घ्या?
9
इराणवर हल्ला करण्यासाठी अमेरिकेने भारतीय हवाई क्षेत्राचा वापर केला? सरकारने स्पष्टीकरण दिले
10
Post Office ची सुपरहिट स्कीम; महिन्याला ₹३००० ची गुंतवणूक, ₹२.१४ लाखांचा रिटर्न निश्चित
11
"ते बोलण्यात व्यस्त, आम्ही कामात मग्न" उद्धव ठाकरेंना टोमणा, शहरात लावले पोस्टर!
12
Stock Market Today: इराण-इस्रायल युद्धाची भीती; ५३४ अंकांनी घसरुन शेअर बाजाराची सुरुवाती, IT-रियल्टीमध्ये मोठी विक्री
13
फिल्म सिटीमध्ये भीषण आग, 'अनुपमा' मालिकेचा सेट जळून खाक
14
केंद्र सरकार सीमा व्यवस्थापन प्राधिकरण स्थापन करणार; महाराष्ट्रातील खासदाराने केली होती मागणी
15
इस्त्रायल-इराण युद्धाचा भारताला फटका बसणार! फक्त १६ दिवस पुरेल एवढाच LPG गॅसचा साठा
16
Maharashtra Rain: लहरी पावसाने शेतकऱ्यांना रखडविले, केवळ २२ लाख हेक्टरवर पेरण्या पूर्ण  
17
ई-बाइक टॅक्सी सेवा नको! राज्य परिवहन विभागास नागरिकांच्या सूचना
18
Todays Horoscope: 'या' राशींच्या लोकांचं नशीब फळफळणार! कसा असेल तुमचा आजचा दिवस? जाणून घ्या
19
...तर नाराजी घ्यायची ताकद ठेवावी लागते; शरद पवारांनी मांडली स्पष्ट भूमिका
20
धारावीत उभारणार मल्टी ट्रान्सपोर्ट हब; एमएमआरडीए लवकरच तयार करणार आराखडा

मुंबईतून 26 पाकिस्तानी नागरिक अचानक बेपत्ता, सुरक्षा यंत्रणेची धावाधाव

By admin | Updated: May 13, 2017 14:22 IST

मुंबईतील जुहू परिसरात गेल्या 10 वर्षांपासून वास्तव्यास असलेले 26 पाकिस्तानी नागरिक अचानक बेपत्ता झाल्याने प्रशासनाचा गोंधळ उडाला आहे

 ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. 13 - जुहू परिसरात गेल्या 10 वर्षांपासून वास्तव्यास असलेले 26 पाकिस्तानी नागरिक अचानक बेपत्ता झाल्याने प्रशासनाचा गोंधळ उडाला आहे. विविध तपास यंत्रणांकडून  या 26 पाकिस्तानी नागरिकांचा रात्रंदिवस शोध सुरू आहे. गुप्तचर विभागाशी संबंधित सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जुहू परिसरात वास्तव्यास असलेले हे पाकिस्तानी नागरिक गेल्या दोन दिवसांपासून अचानक बेपत्ता झाले. यानंतर त्यांचा शोध घेण्यासाठी प्रशासनाची धावाधाव सुरू आहे. 
 
जुहूसहीत अन्य परिसरातील वेगवेगळ्या हॉटेल, रेस्टॉरंट आणि संशयित ठिकाणांची तपासणी करुन पोलीस या पाकिस्तानी नागरिकांचा शोध घेण्याचा प्रयत्न करत आहे. दरम्यान, या घटनेनंतर आता मुंबई पोलिसांतील एकही अधिकारी प्रसिद्धी माध्यमांसोबत उघडपणे बोलण्यास तयार नाही. मात्र सूत्रांच्या माहितीनुसार, महाराष्ट्र एटीएसकडे या बेपत्ता 26 पाकिस्तानी नागरिकांचा शोध लावण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. 
 
मिळालेल्या माहितीनुसार, सी फॉर्म भरल्यानंतर यातील एकाही व्यक्तीनं कोठे वास्तव्य करणार आहेत? कोणाशी संपर्क साधणार आहेत?, याची माहिती दिली नव्हती. भारतात येणा-या सर्व पाकिस्तानी नागरिकांना सी फॉर्म भरणं आवश्यक असते. 
सी फॉर्मच्या आधारे या पाकिस्तानी नागरिकांचा पत्ता मिळवण्यात अपयश आल्यानंतर तपास यंत्रणांनी आपल्या शोधमोहीमेची गती वाढवली. कोणत्या हॉटेलमध्ये राहणार आहोत, कोणत्या ठिकाणी जाणार आहोत, याबाबतीच स्पष्ट माहिती सीफॉर्मद्वारे देणे प्रत्येक पाकिस्तानी नागरिकाला बंधनकारक आहे. याव्यतिरिक्त त्यांचा भारतातील वास्तव्याचा कालावधी, पासपोर्टची प्रत, व्हिसा यांसारखी महत्त्वाची पाकिस्तानी नागरिकांना द्यावी लागते.
 
दरम्यान, महाराष्ट्र एटीएसनं मुंबईतील सर्व हॉटेल आणि रेस्टॉरंटमध्ये तपासणी करण्यासाठी आपली पथकं रवाना केली आहेत. काही दिवसांपूर्वी इंडियन मुजाहिद्दीनच्या दहशतवाद्यांनी मुंबईमध्ये दाखल होऊन येथील विविध भागांची टेहळणी केल्याची माहिती समोर आल्यानं सुरक्षा यंत्रणा अधिक सतर्क झाल्या आहेत.