शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
3
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
4
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
5
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
6
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
7
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
8
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
9
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
10
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
11
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
12
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
13
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
14
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
15
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
16
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
17
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
18
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
19
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
20
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

द्विवर्षपूर्तीनिमित्त भाजपाचे २६ मे ते १५ जूनपर्यंत विकासपर्व

By admin | Updated: May 25, 2016 17:22 IST

भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारच्या द्विवर्षपूर्तीनिमित्त देशभरातील दोनशे विशेष केंद्रातून सरकारच्या विकास कामांची यशोगाथा लोकांपर्यंत पोहोचविली जाणार आहे

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारच्या द्विवर्षपूर्तीनिमित्त देशभरातील दोनशे विशेष केंद्रातून सरकारच्या विकास कामांची यशोगाथा लोकांपर्यंत पोहोचविली जाणार आहे. यासाठी भाजपच्या वतीने २६ मे ते १५ जूनपर्यंत ‘विकास पर्व’ आयोजित केले जाणार आहे. एक केंद्रीय मंत्री, एक राज्यमंत्र, राष्ट्रीय आणि राज्यपातळीवरील नेत्यांचा समावेश असलेली ३३ पथके या विशेष केंद्रांना भेट देऊन मोदी सरकारची कामगिरीचा लेखाजोखा मांडणार आहेत.
 
विरोधकांनी महत्त्वपूर्ण विधेयकांचा मार्ग रोखत विकासाच्या मार्गात कशापद्धतीने आडकाठी घालण्याचा प्रयत्न केला. तसेच यावर मात करून दोन वर्षाच्या अल्पावधीत सरकारने लोककल्याणासोबत विकासाची काय-काय कामे केली, याचीही जनतेला माहिती दिली जाणार आहे, असे सर्व मंत्री आणि विभाग प्रमुखांंना पाठविण्यात आलेल्या अंतर्गत चिठ्ठीत म्हटले आहे.
 
२६ मे रोजी पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्ववाखाली सरकारला दोन वर्षे पूर्ण होत आहे. या दोन वर्षातील सरकारची कामगिरी मीडियाच्या माध्यमातून लोकांपर्यत पोहोचविण्यात येणार आहे. त्यानुसार सरकारच्या विविध योजनांच्या फायद्याबाबत माहिती देणे, उद्योग क्षेत्राचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या संघटना, संस्थासोबत तसेच बिगरराजकीय बैठकी घेणे, शेतकरी, महिला संघटना, वकील, डॉक्टरांशीही संवाद साधणे, आदी कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार आहे. याशिवाय पत्रकार परिषद घेणे, मुलाखतीच्या माध्यमातूनही सरकारची कामगिरी लोकांपर्यंत पोहोचविण्यात येणार आहे. रालोआ खासदारांना कमीत कमी दोन दिवस आणि एक सायंकाळ आपापल्या मतदार संघात जाऊन लोकांची गाऱ्हाणी ऐकून त्यावर काढण्यास सांगण्यात आले आहे.
 
खासदार आणि पथकातील सदस्यांना सोशल मीडियाचा प्रभावीपणे वापर करण्यास सांगण्यात आले आहे. तसेच भाजपचे आठ मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दोन दिवस योजनांचा प्रचार करतील.