शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्य सरकारकडून बिल वेळेत मिळालं नाही; कंत्राटदाराने उचललं टोकाचं पाऊल; विरोधकांचा हल्लाबोल
2
ब्रिटिशांचे एफ-35बी लढाऊ विमान केरळमध्ये अडकलेले; भारतावरही २१ वर्षांपूर्वी अशीच वेळ आलेली...
3
चीनच्या 'मच्छर'नंतर आता 'झुरळ' बनणार युद्धभूमीतलं नवं शस्त्र; 'या' देशानं बनवला खतरनाक प्लॅन
4
भारत-पाक युद्ध थांबविणारे ट्रम्प कोण? दाल में कुछ तो काला है : राहुल गांधी
5
आजचे राशीभविष्य २४ जुलै २०२५: धनलाभ होऊन प्राप्तीत वाढ होईल, विचारात एकदम बदल होतील
6
शिक्षिकेसोबत मुलाचे शारीरिक संबंध आहेत हे आई-वडिलांना माहिती होतं; लेडी टीचरला मिळाला जामीन
7
बनावट दूतावास उघडले, ४ खोटे देशही बनविले; गाझियाबादमध्ये कारवाई; ४४ लाख रुपये, शिक्के जप्त
8
पाच वर्षांनंतर भारताचा मोठा निर्णय; चिनी पर्यटकांना पुन्हा व्हिसा, चीनकडूनही स्वागत
9
‘ग्रीन इंडिया’मध्ये महाराष्ट्राला सहा वर्षांपासून निधीच नाही; देशभरात एकूण ७४५ कोटी रुपये निधी उपलब्ध
10
कौटुंबिक हिंसाचाराच्या तक्रारीनंतर दोन महिने अटक करता येणार नाही; कायद्याचा गैरवापर टाळण्यासाठी कोर्टाचा उपाय
11
मृत्यूच्या दारातून प्रेमाच्या बंधनात! ज्यानं प्राण वाचवले, त्याच ड्रायव्हरशी केलं लग्न
12
उंच गणेशमूर्तींच्या विसर्जनासाठी कृत्रिम तलाव बांधणे शक्य आहे का? हायकोर्टाने सरकारकडे मागितली माहिती
13
पाकिस्तान दहशतवादात बुडालेला कट्टरपंथी देश; भारताने सुरक्षा परिषदेच्या बैठकीत सुनावले खडे बोल
14
६० टक्के महामंडळांचे वाटप ठरले, ‘मलईदार’ मंडळांबाबत रस्सीखेंच
15
संपादकीय : विरोधकांशी बोलणार कोण? विरोधकांच्या प्रश्नांवर सरकारची चुप्पी आणि संसदीय कोंडी
16
जशी नोटाबंदी, टाळेबंदी.. तशीच नवी ‘व्होटबंदी’! निवडणूक आयोगाच्या नव्या मतदार यादी मोहिमेचे विच्छेदन
17
खासगी विनाअनुदानित वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये आता १०% ईडब्लूएस कोटा; ‘एमबीबीएस’च्या प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर
18
उपराष्ट्रपतिपदाची निवडणूक घेण्यासाठी पूर्वतयारी सुरू; निवडणूक आयोग लवकरच जाहीर करणार वेळापत्रक
19
चीन अन् पाकिस्तानमुळे शेतकरी संकटात;  कांद्याची आखातातील निर्यात ४०% घसरली
20
IND vs ENG 4th Test Day 1 Stumps : साईच्या 'फिफ्टी'सह मोठा तिढा सुटला, पण...

बार्टीकडून बक्षीस योजनेचे २५ .९० लाख रुपये गायब

By admin | Updated: July 16, 2017 00:58 IST

कार्यशाळेच्या नावाखाली बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेने (बार्टी) सोलापूर जिल्ह्यात दोन लाखांचा घोटाळा केल्याची बाब समोर आली आहे.

- बाळासाहेब बोचरे । लोकमत न्यूज नेटवर्कसोलापूर : कार्यशाळेच्या नावाखाली बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेने (बार्टी) सोलापूर जिल्ह्यात दोन लाखांचा घोटाळा केल्याची बाब समोर आली आहे. त्याचवेळी बार्टीने २००६ साली आयोजित केलेल्या विविध स्पर्धेतील खर्ची टाकलेल्या २५ लाख ९० हजार रुपयांच्या बक्षिसाची रक्कम १० वर्षे उलटली तरी अद्याप विजेत्यांना मिळाली नसल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. बार्टीने शासनाला दोन लाखांचा गंडा घातल्याचे वृत्त लोकमतमध्ये ११ जुलैच्या अंकात प्रसिद्ध होताच सोलापुरातील सागर उबाळे यांनी ‘लोकमत’शी संपर्क साधून बार्र्टीने २५ लाख ९० हजार रुपये कसे हडप केले याचे माहिती अधिकारात गोळा केलेले पुरावे सादर केले. बार्टीच्या वतीने एप्रिल २००६ मध्ये फुले, शाहू, आंबेडकर या विषयावर निबंध, पाठांतर, प्रश्नावली, वादविवाद, वक्तृत्व आणि चित्रकला स्पर्धा आयोजित केल्या होत्या. राज्यातील १६४ केंद्रांवर या स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. त्यासाठी एकूण २५ लाख ९० हजार ६०० रुपयांची एकूण बक्षिसे ठेवण्यात आली होती. यासाठी राज्याच्या समाजकल्याण विभागामार्फत २६ लाखांचा निधी दिला असताना ही रक्कम अद्याप एकाही बक्षीस विजेत्यास मिळालेली नाही. या स्पर्धेनंतर बार्टीकडून सर्व विजेत्यांना केवळ कोरी प्रमाणपत्रे संबंधित जिल्ह्यांना पाठवण्यात आली. रकमेबाबत विजेते पाठपुरावा करत राहिले पण बार्टीकडून टोलवाटोलवी झाली. त्यानंतर उबाळे यांनी माहिती अधिकारात विचारणा केली असता १८ मार्च २००६ म्हणजे स्पर्धा घेण्यापूर्वीच यशदाकडे स्पर्धेची रक्कम धनादेशाद्वारे सुपुर्द केल्याचे २५ जून २००७ रोजी एका पत्राद्वारे कळवण्यात आले. तथापि अद्याप यशदाकडून अशी रक्कम वाटण्यात आली नाही. त्यानंतर यशदाकडे माहिती मागितली असता यशदाने प्रथम केवळ २९ रुपये मागणी केली. अर्जदाराने २९ रुपयांची मनिआॅर्डर यशदाच्या नावे केली असता लवकरच माहिती पाठवली जाईल असे २८ आॅगस्ट २००७ रोजी पत्राद्वारे कळवण्यात आले. तथापि अद्याप अर्जदाराला माहिती देण्यात आलेली नाही किंवा बक्षिसाची रक्कम देण्यात आलेली नाही. आपण शासकीय कर्मचारी असल्यान त्रास देण्यास सुरुवात केली असून याबाबत मुख्यमंत्री, समाजकल्याणमंत्री व पुणे विभागीय आयुक्त यांंना निवेदन देऊन चौकशीची मागणी केल्याचे उबाळे यांनी सांगितले.२९ रुपयांची मनिआॅर्डर यशदाच्या नावे केली असता लवकरच माहिती पाठवली जाईल, असे २००७ मध्ये सांगण्यात आल़े अद्याप अर्जदाराला बक्षीस मिळाले नाही़