शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
2
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
3
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
4
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
5
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
6
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
7
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
8
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
9
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
10
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
11
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
12
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
13
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
14
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
15
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
16
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
17
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
18
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
19
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
20
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?

सुवर्णमहोत्सवी शिष्यवृत्तीपासून २५ हजार विद्यार्थी वंचित!

By admin | Updated: September 5, 2016 04:38 IST

वार्षिक शैक्षणिक खर्चासह किरकोळ खर्च भागवण्यासाठी आदिवासी विद्यार्थ्यांना २०१०-११ पासून सुवर्णमहोत्सवी शिष्यवृत्ती योजना लागू

ठाणे : वार्षिक शैक्षणिक खर्चासह किरकोळ खर्च भागवण्यासाठी आदिवासी विद्यार्थ्यांना २०१०-११ पासून सुवर्णमहोत्सवी शिष्यवृत्ती योजना लागू झाली; पण ठाणे जिल्ह्यातील सुमारे २५ हजारांपेक्षा जास्त विद्यार्थी मागील दीड वर्षापासून या शिष्यवृत्तीपासून वंचित असल्याचे श्रमिक मुक्ती संघटनेच्या अहवालावरून उघड झाले आहे.पहिली ते दहावीमध्ये शिक्षण घेत असलेल्या आदिवासी विद्यार्थ्यांसाठी ही शिष्यवृत्ती लागू करण्यात आलेली आहे. पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांना प्रत्येकी एक हजार रुपये, तर पाचवी ते सातवीसाठी एक हजार ५०० रुपये आणि आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना दोन हजार रुपये शिष्यवृत्ती मंजूर झालेली आहे. मात्र, मागील सुमारे दीड वर्षापासून २५ हजारांपेक्षा जास्त विद्यार्थी या शिष्यवृत्तीपासून वंचित असल्याचे उघड झाले आहे.जिल्ह्यातील एकाही विद्यार्थ्यास या शिष्यवृत्तीचा लाभ मिळालेला नाही. यामध्ये मुरबाड तालुक्यात पाच हजार ६३० विद्यार्थ्यांसह शहापूर तालुक्यात नऊ हजार विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळाली नसल्याचे सर्वेक्षणाअंती उघड झाल्याचे श्रमिक मुक्ती संघटनेच्या कायदेशीर सल्लागार अ‍ॅड. इंदवी तुळपुळे यांनी सांगितले. कल्याण, अंबरनाथ, भिवंडी या तालुक्यांतील विद्यार्थ्यांचेदेखील लवकरच सर्वेक्षण केले जाणार आहे. दररोज नवीननवीन आश्वासने, योजना जाहीर करत आदिवासींचा पुळका असल्याचे सरकार जाहिरातींद्वारे करीत असल्याचा आरोपही तुळपुळे यांनी केला असून आदिवासी विकास विभागाच्या सचिवांना लेखी निवेदन देऊन आदिवासींच्या विविध योजनांकडे त्यांचे लक्ष वेधले आहे. आरोग्य, पोषण, शिक्षण याबाबतच्या सर्व योजना अंमलबजावणीअभावी कागदावर शोभेच्या बनून राहिल्या आहेत, असा खेद व्यक्त करून याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची अपेक्षा सचिवांकडून केली आहे. (प्रतिनिधी)