शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
3
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
4
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
5
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
6
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
7
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
8
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
9
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
10
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
11
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
12
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
13
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
14
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
15
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
16
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
17
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
18
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
19
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
20
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक

सुवर्णमहोत्सवी शिष्यवृत्तीपासून २५ हजार विद्यार्थी वंचित!

By admin | Updated: September 5, 2016 04:38 IST

वार्षिक शैक्षणिक खर्चासह किरकोळ खर्च भागवण्यासाठी आदिवासी विद्यार्थ्यांना २०१०-११ पासून सुवर्णमहोत्सवी शिष्यवृत्ती योजना लागू

ठाणे : वार्षिक शैक्षणिक खर्चासह किरकोळ खर्च भागवण्यासाठी आदिवासी विद्यार्थ्यांना २०१०-११ पासून सुवर्णमहोत्सवी शिष्यवृत्ती योजना लागू झाली; पण ठाणे जिल्ह्यातील सुमारे २५ हजारांपेक्षा जास्त विद्यार्थी मागील दीड वर्षापासून या शिष्यवृत्तीपासून वंचित असल्याचे श्रमिक मुक्ती संघटनेच्या अहवालावरून उघड झाले आहे.पहिली ते दहावीमध्ये शिक्षण घेत असलेल्या आदिवासी विद्यार्थ्यांसाठी ही शिष्यवृत्ती लागू करण्यात आलेली आहे. पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांना प्रत्येकी एक हजार रुपये, तर पाचवी ते सातवीसाठी एक हजार ५०० रुपये आणि आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना दोन हजार रुपये शिष्यवृत्ती मंजूर झालेली आहे. मात्र, मागील सुमारे दीड वर्षापासून २५ हजारांपेक्षा जास्त विद्यार्थी या शिष्यवृत्तीपासून वंचित असल्याचे उघड झाले आहे.जिल्ह्यातील एकाही विद्यार्थ्यास या शिष्यवृत्तीचा लाभ मिळालेला नाही. यामध्ये मुरबाड तालुक्यात पाच हजार ६३० विद्यार्थ्यांसह शहापूर तालुक्यात नऊ हजार विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळाली नसल्याचे सर्वेक्षणाअंती उघड झाल्याचे श्रमिक मुक्ती संघटनेच्या कायदेशीर सल्लागार अ‍ॅड. इंदवी तुळपुळे यांनी सांगितले. कल्याण, अंबरनाथ, भिवंडी या तालुक्यांतील विद्यार्थ्यांचेदेखील लवकरच सर्वेक्षण केले जाणार आहे. दररोज नवीननवीन आश्वासने, योजना जाहीर करत आदिवासींचा पुळका असल्याचे सरकार जाहिरातींद्वारे करीत असल्याचा आरोपही तुळपुळे यांनी केला असून आदिवासी विकास विभागाच्या सचिवांना लेखी निवेदन देऊन आदिवासींच्या विविध योजनांकडे त्यांचे लक्ष वेधले आहे. आरोग्य, पोषण, शिक्षण याबाबतच्या सर्व योजना अंमलबजावणीअभावी कागदावर शोभेच्या बनून राहिल्या आहेत, असा खेद व्यक्त करून याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची अपेक्षा सचिवांकडून केली आहे. (प्रतिनिधी)