शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय शिष्टमंडळातील समावेशामुळे काँग्रेस नाराज, आता शशी थरूर स्पष्टच बोलले, म्हणाले...  
2
Mumbai Water Storage: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये फक्त १८ टक्के पाणीसाठा शिल्लक
3
IPL 2025 Playoffs Race : आता MI सह ६ संघ शर्यतीत; कुणाचा पेपर सोपा कुणाला आहे सर्वाधिक धोका?
4
"आम्ही अणुबॉम्बच्या धमकीला भीक घालत नाही, पाकिस्तानला १०० किमी आत घुसून मारलं’’, अमित शाहांचा टोला
5
IPL 2025 : गत चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्स OUT! 'विराट' शक्ती प्रदर्शनासह RCB टॉपला; पण...
6
"पुतीन यांच्याशी थेट बोलणार, रशिया आणि युक्रेनमधील भीषण युद्ध थांबवणार’’, ट्रम्प यांचं मोठं विधान
7
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
8
Pune: पुण्यात १५ वर्षीय मुलीला सर्पदंश, वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू
9
तू स्वप्नातही...! राहुल द्रविडचा हिटमॅन रोहितसाठी खास मेसेज; मुंबई इंडियन्सनं शेअर केला व्हिडिओ
10
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
11
IPL 2025 : मोहीम फत्ते! 'दर्दी' चाहत्यांनी विराटसाठी व्हाइट जर्सीत केली गर्दी
12
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम
13
ज्योती मल्होत्रा ​​कोण आहे? पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली झाली अटक
14
दर्यापूरचे सराफा दुकान फोडणारी आंतरराज्यीय टोळी अटकेत
15
पाच बायका, शाहबाज शरीफ यांची लव्ह स्टोरी ऐका, चुलत बहिणीशी केलं पहिलं लग्न, त्यानंतर...
16
नातेवाईकावर अंत्यसंस्कार करून आंघोळीसाठी नदीत उरतले, बाप-लेकासह तिघांचा बुडून मृत्यू
17
अलिशान स्पोर्ट्स कारवरील स्क्रॅच बघून संतापला रोहित शर्मा; भावावर असा काढला राग (VIDEO)
18
INDvENG: श्रेयस अय्यरला टीम इंडियात न घेण्याचं BCCIने दिलं 'टुकार' कारण, ऐकून तुम्हालाही येईल राग
19
अनाथ मुलीला दत्तक घेऊन वाढवलं, तिनेच आईला संपवलं; इन्स्टाग्रामने उलगडलं हत्येचं गूढ
20
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा

सुवर्णमहोत्सवी शिष्यवृत्तीपासून २५ हजार विद्यार्थी वंचित!

By admin | Updated: September 5, 2016 04:38 IST

वार्षिक शैक्षणिक खर्चासह किरकोळ खर्च भागवण्यासाठी आदिवासी विद्यार्थ्यांना २०१०-११ पासून सुवर्णमहोत्सवी शिष्यवृत्ती योजना लागू

ठाणे : वार्षिक शैक्षणिक खर्चासह किरकोळ खर्च भागवण्यासाठी आदिवासी विद्यार्थ्यांना २०१०-११ पासून सुवर्णमहोत्सवी शिष्यवृत्ती योजना लागू झाली; पण ठाणे जिल्ह्यातील सुमारे २५ हजारांपेक्षा जास्त विद्यार्थी मागील दीड वर्षापासून या शिष्यवृत्तीपासून वंचित असल्याचे श्रमिक मुक्ती संघटनेच्या अहवालावरून उघड झाले आहे.पहिली ते दहावीमध्ये शिक्षण घेत असलेल्या आदिवासी विद्यार्थ्यांसाठी ही शिष्यवृत्ती लागू करण्यात आलेली आहे. पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांना प्रत्येकी एक हजार रुपये, तर पाचवी ते सातवीसाठी एक हजार ५०० रुपये आणि आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना दोन हजार रुपये शिष्यवृत्ती मंजूर झालेली आहे. मात्र, मागील सुमारे दीड वर्षापासून २५ हजारांपेक्षा जास्त विद्यार्थी या शिष्यवृत्तीपासून वंचित असल्याचे उघड झाले आहे.जिल्ह्यातील एकाही विद्यार्थ्यास या शिष्यवृत्तीचा लाभ मिळालेला नाही. यामध्ये मुरबाड तालुक्यात पाच हजार ६३० विद्यार्थ्यांसह शहापूर तालुक्यात नऊ हजार विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळाली नसल्याचे सर्वेक्षणाअंती उघड झाल्याचे श्रमिक मुक्ती संघटनेच्या कायदेशीर सल्लागार अ‍ॅड. इंदवी तुळपुळे यांनी सांगितले. कल्याण, अंबरनाथ, भिवंडी या तालुक्यांतील विद्यार्थ्यांचेदेखील लवकरच सर्वेक्षण केले जाणार आहे. दररोज नवीननवीन आश्वासने, योजना जाहीर करत आदिवासींचा पुळका असल्याचे सरकार जाहिरातींद्वारे करीत असल्याचा आरोपही तुळपुळे यांनी केला असून आदिवासी विकास विभागाच्या सचिवांना लेखी निवेदन देऊन आदिवासींच्या विविध योजनांकडे त्यांचे लक्ष वेधले आहे. आरोग्य, पोषण, शिक्षण याबाबतच्या सर्व योजना अंमलबजावणीअभावी कागदावर शोभेच्या बनून राहिल्या आहेत, असा खेद व्यक्त करून याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची अपेक्षा सचिवांकडून केली आहे. (प्रतिनिधी)