शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा आरक्षण सुनावणी होणार जलद; हायकोर्टात विशेष पूर्णपीठ स्थापन; SCच्या आदेशानंतर पाऊल
2
भारताला हवेत हाफिज सईद, मसूद अझहर, दाऊद इब्राहिम; मोस्ट वाँटेडची यादी पाकला सोपवणार
3
‘सेलेबी’ला काम नको; आयबीचा होता इशारा, सुरक्षेविषयी नवीन प्रश्न निर्माण होण्याची भीती
4
भारत आता पाकिस्तानवर ‘डिप्लोमॅटिक स्ट्राइक’ करणार; ‘ऑपरेशन सिंदूर’ची माहिती जगात पोहोचवणार
5
आगळीक करू नका, ‘ऑपरेशन सिंदूर’ हा फक्त ट्रेलर, गरज पडल्यास पूर्ण ‘पिक्चर’ दाखवू: राजनाथ सिंह
6
अफगाणिस्तानातून पाकची जलकोंडी होण्याची शक्यता; शाहतूत धरणास भारताचे आर्थिक, तांत्रिक सहकार्य
7
‘८६४७’ म्हणजे थेट डोनाल्ड ट्रम्प यांच्या हत्येचा संदेश? जेम्स कॉमी यांच्या पोस्टमुळे खळबळ
8
मध्य प्रदेशच्या मंत्र्यानंतर आता उपमुख्यमंत्र्यांचेही विधान चर्चेत; काँग्रेसची भाजपावर टीका
9
पाक समर्थक तुर्की, अझरबैजानशी  कोणताही व्यापार, पर्यटन नाही; भारतीय व्यापाऱ्यांचा बहिष्कार
10
“तणावाच्या पार्श्वभूमीवर तुर्की, अझरबैजानसोबत करार करू नका”; याआधीचे करार रद्द करायचा निर्णय
11
मुंबईत तळ ठोकून असणाऱ्या २५० बांगलादेशींना घरचा रस्ता; २ दिवसांत पोलिसांची मोठी धडक कारवाई
12
राजकीय नेत्यांना चढला महापालिका निवडणुकीचा ज्वर! स्थानिक प्रश्नांकडे लक्ष, भेटीगाठी सुरू
13
...आता सहपोलिस आयुक्त गुप्तवार्ता; आयपीएस डॉ. आरती सिंह यांच्याकडे जबाबदारी
14
तिन्ही मार्गावर मुंबईत उद्या ‘मेगा ब्लॉक डे’; पश्चिम, मध्य, हार्बरवरील वेळापत्रक कसे असेल?
15
मुंबई सेंट्रल स्थानकावर पहिले डिजिटल लाउंज; केवळ प्रवासी नाही तर नागरिकांनाही लाभ मिळणार
16
दारूच्या नशेत बेभान कंटेनर चालकाने वाहनांसह २० नागरिकांना उडविले; बीडमधील थरार, महिला ठार
17
भारताच्या नीरज चोप्राची ऐतिहासिक कामगिरी; दोहा डायमंड लीगमध्ये भालाफेकीत ९० मीटरचा टप्पा सर
18
पाकला आणखी एक दणका! अफगाणिस्तानातून मिळणारे पाणीही थांबणार? भारताची पावले उचलण्यास सुरुवात
19
सेलेबी एअरपोर्ट सर्व्हिसेस कंपनीचा मोठा निर्णय; भारताने करार रद्द केल्यावर हायकोर्टात धाव
20
IND vs ENG: इंग्लंड दौऱ्यासाठी भारताच्या 'अ' संघाची घोषणा, 'या' खेळाडूकडे कर्णधारपद!

शेतीसाठी २५ हजार कोटी

By admin | Updated: March 19, 2016 02:10 IST

अभूतपूर्व दुष्काळाचा सामना करणाऱ्या शेतकऱ्याला केंद्रस्थानी ठेवत शेतीच्या सर्वांगीण विकासासाठी २५ हजार कोटी रुपयांची भरीव तरतूद राज्याच्या अर्थसंकल्पात करण्यात आली आहे.

बळीराजा केंद्रस्थानी : शेतकरी स्वाभिमानी वर्ष म्हणून साजरे करणारमुंबई : अभूतपूर्व दुष्काळाचा सामना करणाऱ्या शेतकऱ्याला केंद्रस्थानी ठेवत शेतीच्या सर्वांगीण विकासासाठी २५ हजार कोटी रुपयांची भरीव तरतूद राज्याच्या अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी अर्थसंकल्प शेतकऱ्यांना समर्पित करीत हे वर्ष शेतकरी स्वाभिमानी वर्ष म्हणून साजरे करण्याची घोषणा केली. गेली काही वर्षे राज्यातील शेतकरी अभूतपूर्व दुष्काळाचा सामना करीत आहेत. या शेतकऱ्यांना बळ देण्याचे काम या अर्थसंकल्पातील तरतुदीतून दिसून येते. २0१५-२0१६ या वर्षात दुष्काळ आणि नैसर्गिक आपत्तीमध्ये सापडलेल्या शेतकऱ्याला द्यावयाच्या प्रति हेक्टर मदतीत लक्षणीय वाढ करीत त्यासाठी पाच हजार दोन कोटी ८२ लाख रुपये इतका निधी उपलब्ध करून दिला आहे. २0१६-२0१७ करिता ३,३६0 कोटी ३५ लाख रुपयाची तरतूद करण्यात आली आहे. पीक विमा योजनेसाठी १८५५ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. बहुचर्चित जलयुक्त शिवार योजनेसाठी एक हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे. ‘मागेल त्याला शेततळे’ या योजनेसाठी २000 कोटींची तरतूद केली आहे. या माध्यमातून राज्यात एक लाख शेततळी ३७,५00 विहिरी व ९0 हजार विद्युतपंपांना जोडण्या उपलब्ध करून दिल्या जातील. (प्रतिनिधी)पालकमंत्री पाणंद रस्ते जेसीबी मशिन खरेदी योजना शेतांमध्ये जाणारे वर्षानुवर्षे नादुरुस्त असलेले पाणंद रस्ते दुरुस्तीसाठी तसेच जलयुक्त शिवार योजनेतील कामांसाठी ‘पालकमंत्री पाणंद रस्ते जेसीबी मशिन खरेदी योजना’ जाहीर करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत बेरोजगार युवकांना जेसीबी खरेदी करण्यासाठी राष्ट्रीयीकृत बँकांमार्फत कर्जपुरवठा करण्यात येईल. या कर्जावरील व्याजाची हमी शासन घेणार आहे. यासाठी १०० कोटी रुपयांची तरतूद. पाणीपुरवठ्यासाठी ६७० कोटी१ग्रामीण भागातील पाणीपुरवठ्यासाठी सुरू असलेल्या ‘राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमा’साठी सन २०१६-१७ मध्ये १७० कोटी रुपये तरतूद केली आहे. याचबरोबर ग्रामीण व दुर्गम भागातील पाण्याची समस्या सोडविण्याच्या उद्देशाने ‘मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल कार्यक्रम’ या नावाने ग्रामीण पाणीपुरवठ्याचा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम हाती घेतला आहे. २आगामी काळात या कार्यक्रमावर सुमारे दोन हजार ५०० कोटी खर्च प्रस्तावित आहे. या योजनेत राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमात समाविष्ट नसणाऱ्या योजना तसेच बंद असलेल्या प्रादेशिक पाणीपुरवठा योजनांचे पुनरुज्जीवन व देखभाल या बाबीं समाविष्ट आहेत. यासाठी या अर्थसंकल्पात ५०० कोटींची तरतूद केली आहे. एकूण पाणीपुरवठ्यासाठी ६७0 कोटींची तरतूद करण्यात आली आहे.आदिवासी योजनांमधील ठळक मुद्दे : आदिवासी विभागांतर्गत रस्ते विकासासाठी ३00 कोटींची तरतूद. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार योजना व राज्य रोजगार हमी योजनेसाठी ३,४७३ कोटींची तरतूद. बीओटी तत्त्वावर रस्त्यांचे दुपदरीकरण व चौपदरीकरणासाठी ५५0 कोटी. अनुसूचित जातीसाठी घरकुल योजनेंतर्गत २0१९ पर्यंत अनुसूचित जातीचे एकही कुटुंब बेघर राहणार नाही. राहत्या ठिकाणी किंवा भूखंड विकत घेऊन घरकुल बांधून देण्यासाठी ३२0 कोटींची तरतूद.दिलासा मिळणार ?सरासरीपेक्षा कमी पाऊस पडल्यामुळे तेलबिया, कापूस, ऊस यांच्यावर परिणाम झाला. कदाचित नव्या तरतुदींमुळे शेतकऱ्याला दिलासा मिळेल.आदिवासी युवकांसाठी एकलव्य क्रीडा व उद्योजकता प्रबोधिनी उभारण्याकरिता २५ कोटी रुपयांचा नियतव्यय. वारली कलेच्या जोपासना व संवर्धनासाठी ‘वारली हट’करिता ६० कोटी रुपयांची तरतूद. डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंब योजनेंतर्गत अनुसूचित जातीच्या शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होण्यासाठी विहिरींसाठी २ लाख रुपयांपर्यंत अनुदान तसेच विहिरीवर विद्युत पंप बसवून ग्रीडमधून वीजपुरवठा शक्य नसल्यास सौरऊर्जेतून वीजपुरवठा.कृषी प्रक्रिया उद्योग योजना कृषी प्रक्रिया उद्योग योजनेअंतर्गत कृषी प्रक्रिया उद्योग उभारण्यासाठी शासनाकडून अनुदान देण्यात येणार. हे अनुदान प्रकल्प खर्चाच्या २५ टक्के किंवा जास्तीत जास्त ५० लाख रुपये मर्यादेत असेल. यासाठी ५० कोटी रुपयांची तरतूद .जिल्हा कृषी महोत्सव प्रत्येक जिल्ह्यामध्ये दरवर्षी कृषी महोत्सव भरविण्यात येईल. या माध्यमातून कृषीविषयक योजनांची माहिती व मार्गदर्शन याकरिता २० लाख रुपये प्रत्येक जिल्ह्याला दरवर्षी देण्यात येतील. यासाठी एकूण ६ कोटी ८० लाख रुपयांची तरतूद.काटेरी तारेच्या जाळीवर करात सूट शेताची राखण करण्यासाठी असलेल्या काटेरी तारेवर सध्या १२.५ टक्के कर लागू होता. त्याचबरोबर मुख्यत: शेतकरी वापरत असलेल्या तारेची जाळी व साखळी दुवा यावरही १२.५ टक्के कर लागू आहे. बळीराजाच्या अल्पशा उतराईकरिता यावरील कराचा दर ५.५ टक्के प्रस्तावित केला आहे.