शहरं
Join us  
Trending Stories
1
बॅडमिंटन स्टार सायना नेहवाल आणि पारुपल्ली कश्यप यांचा घटस्फोट, ७ वर्षांनी लग्न तुटले!
2
Wimbledon 2025 Final : अल्काराझची हॅटट्रिक हुकली! नंबर वन यानिक सिनरनं विम्बल्डन जेतेपद जिंकत रचला इतिहास
3
इंग्लंड: लंडनच्या साऊथएन्ड विमानतळावर मोठा अपघात! उड्डाणानंतर काही वेळातच विमानाला आग
4
मैत्रिणीला सोडायला गेलेली स्नेहा परत आलीच नाही; थेट यमुना नदीत सापडला मृतदेह; नेमकं काय घडलं?
5
अमरावती: पोलिसांनी उधळली तरुणाईची मद्य पार्टी ! अल्पवयीन मुला-मुलींसह १००-१५० जण ताब्यात
6
टीम इंडियासाठी सोपा वाटणारा पेपर झाला अवघड; ५८ धावांत ४ विकेट्स! KL राहुल एकटा पडला!
7
क्रॉसिंग गेटवर रेल्वेचे ‘झिरो अ‍ॅक्सिडेन्ट’चे लक्ष्य; मध्य रेल्वे नागपूर विभागात सुरक्षा मोहीम
8
"भाजपाने पेरलेल्या विषाला..."; प्रवीण गायकवाड प्रकरणावरून संजय राऊत यांनी व्यक्त केला संताप
9
IND vs ENG : वॉशिंग्टन सुंदरनं घेतली इंग्लंडची फिरकी; टीम इंडियासमोर १९३ धावांचे आव्हान
10
Video: बापरे!! पर्यटक समोर असताना चित्ता अचानक माणसांसारखा दोन पायांवर उभा राहिला अन्...
11
लातुरात ड्रग्ज विक्री नेटवर्कचा उलगडा! आणखी तिघांना अटक; चार दिवसांची पाेलिस काेठडी
12
दुर्गम जंगलातील खोल गुहेमध्ये २ मुलींसह सापडली रशियन महिला, विठ्ठल मूर्तीची करायची पूजा, तपासामधून धक्कादायक माहिती उघड  
13
IND vs ENG : अति 'सुंदर'! वॉशिंग्टनच्या फिरकीतील जादूसह टीम इंडियाच्या विजयातील मोठा अडथळा झाला दूर
14
नीरज चोप्रा अन् अरशद नदीम पुन्हा भिडणार; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिलीच लढत
15
ठाणे: जि.प., पं. समित्यांचा निवडणूक प्रभाग रचना मसुदा प्रसिद्ध; हरकतींसाठी २१ जुलैपर्यंत मुदत
16
भाजपाकडून खासदारकी मिळालेल्या उज्ज्वल निकम यांची संपत्ती किती? मुंबईत किती कोटींची घरं?
17
ब्रूकची आडवी-तिडवी फटकेबाजी! ३ चेंडूत कुटल्या १४ धावा; मग आकाशदीपनं 'मिडल स्टंप' उडवत घेतला बदला
18
"प्रवीण गायकवाड यांच्यावर हल्ला करणाऱ्या गुंडांना तात्काळ अटक करून कठोर कारवाई करा’’, काँग्रेसची मागणी  
19
जगद्गुरू अविमुक्तेश्वरानंद यांनी व्यक्त केली मराठी शिकण्याची इच्छा; शिंदेसेना देणार मराठीचे धडे
20
मोठी बातमी! संभाजी ब्रिगेडच्या प्रवीण गायकवाडांना अक्कलकोटमध्ये काळं फासलं

यंदा २५ टक्के जादा पाऊस!

By admin | Updated: May 25, 2016 04:00 IST

राज्यात यंदा सरासरीच्या २५ टक्क्यांहून अधिक पाऊस पडेल, असा अंदाज भारतीय हवामान खात्याने व्यक्त केला असून, अनेक भागांमध्ये अतिवृष्टीची शक्यता लक्षात घेऊन त्याचा मुकाबला

- यदु जोशी,  मुंबई

राज्यात यंदा सरासरीच्या २५ टक्क्यांहून अधिक पाऊस पडेल, असा अंदाज भारतीय हवामान खात्याने व्यक्त केला असून, अनेक भागांमध्ये अतिवृष्टीची शक्यता लक्षात घेऊन त्याचा मुकाबला करण्यासाठी आतापासूनच नियोजन करण्याचे आदेश राज्याचे मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय यांनी आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेला दिले आहेत. राज्यात यंदा सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडणार असल्याचा प्राथमिक अंदाज असल्याचे हवामान खात्याने राज्य शासनाला कळविले आहे. हे लक्षात घेता आता राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापनाच्या धर्तीवर संबंधित सर्व घटकांशी समन्वय राखून काम करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. त्यानुसार वायुदल, नौसेना आणि लष्कराच्या स्थानिक अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात आली आहे. मुंबई महापालिका आणि राज्य आपत्ती व्यवस्थापन सेलतर्फे मुंबईत पाणी साठून धोका उद्भवू शकतो अशी २५ ठिकाणे शोधून त्या ठिकाणांची पाहणी येत्या काही दिवसांत करण्यात येणार आहे. मुख्य सचिव क्षत्रिय यांनी ‘लोकमत’ला सांगितले, भारतीय हवामान खात्याच्या अधिकाऱ्यांनी आमच्या बैठकीत पावसाच्या अंदाजाची माहिती दिली. त्यानुसार गेल्या ५० वर्षांतील पावसाच्या सरासरीपेक्षा २५ टक्के अधिक पाऊस पडू शकतो. दुष्काळाने होरपळत असलेल्या राज्यात प्रशासन दुष्काळ निवारणाच्या उपाययोजना करीत असतानाच संभाव्य अतिवृष्टी व त्यातून येणारा ओला दुष्काळ यावर मात करता यावी म्हणून यंत्रणा सज्ज ठेवावी लागत आहे. आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार करणारमहाराष्ट्राला लागून असलेल्या मध्य प्रदेश, छत्तीसगड, कर्नाटक, तेलंगणा आदी राज्यांच्या धरणाचे पाणी (बॅक वॉटरसह) अतिवृष्टीच्या परिस्थितीत महाराष्ट्रात येऊन बरेचदा हाहाकार उडतो. या संभाव्य परिस्थितीवर मात करण्यासाठी या राज्यांच्या यंत्रणांशी आधीच संपर्क करून उपाययोजना करण्यात येणार आहेत, असे क्षत्रिय यांनी सांगितले. आरोग्य, आदिवासी विकास, सार्वजनिक बांधकाम, नगरविकास, जलसंपदा आदी विभागांचा आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार करण्यात येणार आहे. देशात १०९ टक्के पाऊस पुणे : महाराष्ट्रात यंदा चांगला पाऊस पडणार असून, तो सरासरीपेक्षा जास्त असेल. एकूणच देशातही चांगला पाऊस पडणार असून, तो सरासरीच्या १०९ टक्के पडेल, असा सुधारित अंदाज ‘स्कायमेट’ या खासगी संस्थेने मंगळवारी जाहीर केला. जूनमध्ये मात्र पावसाचे प्रमाण कमी असेल. तो सरासरीच्या ८७ टक्केच पडेल. उर्वरित ३ महिन्यांत मात्र सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडेल, असे भाकीत वर्तविण्यात आले आहे.