शहरं
Join us  
Trending Stories
1
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
2
पाऊस थांबला! लगेच आकाश दीपचा 'हमला'! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये दोन विकेट्स अन् इंग्लंडचा अर्धा संघ तंबूत (VIDEO)
3
मतदारयाद्यांतील गैरप्रकार रोखण्यास काँग्रेसची समिती; अध्यक्ष पृथ्वीराज चव्हाण अहवाल देणार
4
अंत्यसंस्कारासाठी मृतदेह घेऊन निघाले अन् घरी जिवंत सापडली 'ती' व्यक्ती; जळगावातील प्रकार
5
“जीवनात ही घडी अशीच राहू दे”; फोटो शेअर करत बाळा नांदगावकरांची पांडुरंगाकडे प्रार्थना
6
मनातलं सगळंच सांगितलं; प्रताप सरनाईकांचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ३ पानी खुलं पत्र
7
बर्मिंगहॅमच्या मैदानात पावसाची बॅटिंग! इंग्लंडच्या ७ विकेट्स घेण्यासाठी टीम इंडियाला किती षटके मिळणार?
8
“एकाचं भाषण अपूर्ण अन् दुसऱ्याचं अप्रासंगिक, तर पूर्ण कार्यक्रम अवास्तव”; भाजपाची टीका
9
१६ वर्षे अत्याचार झालेल्या मुलींच्या मृतदेहाची लावत होता विल्हेवाट; एका घटनेमुळे केला खुलासा
10
आधी कॅब चालकांची करायचे हत्या, दऱ्यांमध्ये फेकायचे मृतदेह; सीरियल किलरला अखेर अटक
11
शेतकऱ्यांसाठी खुशखबर! पीएम किसानचा २०वा हप्ता 'या' दिवशी खात्यात येणार? आत्ताच यादी तपासा!
12
राज्यात सुरू असलेल्या भाषा वादावर बाबा रामदेव यांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले; दिला असा सल्ला
13
सोलापूर : 'तुझ्यामुळेच माझी बायको...'; सावत्र दिराने भावजयीच्या मानेवर कुऱ्हाडीने केला वार, जागेवरच गेला जीव
14
“विठ्ठला...! सरकारला कर्जमाफी देण्याची सद्बुद्धी दे...”; आषाढी एकादशीला बच्चू कडूंची पोस्ट
15
ऐकवं ते नवलंच! पोलिसात भरती झाला, पण १२ वर्षे ड्युटीवरच गेला नाही; तरीही मिळाली ₹२८ लाख पगार
16
हाफिज सईद आणि मसूद अजहर भारताकडे सोपवू, पण...; बिलावल भुट्टो यांची 'ती' मागणी काय?
17
ENG vs IND : इंग्लंड टेस्ट मॅच ड्रॉ करण्यासाठी खेळणार? कोच म्हणाला, आम्ही एवढेही मूर्ख नाही की,...
18
'देशात गरीब वाढत चाललेत आणि काही श्रीमंताच्या हातात संपत्ती चाललीये'; नितीन गडकरींनी व्यक्त केली चिंता
19
"२० कोटी दिले तरी ...", बिग बॉस १९ मध्ये सहभागी होण्याच्या चर्चांवर राम कपूरने सोडलं मौन
20
ज्या घटनेमुळे बापाने केली हत्या, त्यात आईचा होता सहभाग; कोल्हापुरातील प्रकरणात काय आले समोर?

राज्यात उद्योगांसाठी फक्त २५ परवाने!

By admin | Updated: May 10, 2015 01:17 IST

राज्यात उद्योग निर्माण करण्यासाठी उद्योजकांना ७६ विविध परवाने घ्यावे लागत होते, त्यामध्ये परिवर्तन करून त्यांची संख्या २५वर आणण्याचा शासनाचा मानस आहे आणि उद्योजकांना

मुंबई : राज्यात उद्योग निर्माण करण्यासाठी उद्योजकांना ७६ विविध परवाने घ्यावे लागत होते, त्यामध्ये परिवर्तन करून त्यांची संख्या २५वर आणण्याचा शासनाचा मानस आहे आणि उद्योजकांना परवान्यांसाठी इकडे-तिकडे जाण्याची आवश्यकता भासू नये म्हणून दीड महिन्यात एक खिडकी योजना सुरू करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे केली.राज्यात ६० टक्के लोकसंख्या २५ वर्षांखालील युवक-युवतींची आहे. त्यांच्यासाठी सूक्ष्म, लघू व मध्यम उद्योगांसाठी विकास संस्था स्थापन करण्यात येणार आहे. तसेच उद्योजकांना येणाऱ्या अडचणींवर मात करण्यासाठी किंवा परवाने वेळेवर मिळण्यासाठी विभागीय स्तरावर समिती स्थापन करण्यात येऊन १५ दिवसांमध्ये हे परवाने उद्योजकांना मिळतील, असे उद्दिष्ट समितीला देण्यात आलेले आहे. सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योगांसाठी ‘सिडबी’बरोबर एक महत्त्वाचा करार करण्यात आला असून या करारामुळे २०० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध होणार असल्याचेही मुख्यमंत्री या वेळी म्हणाले. केंद्र सरकारच्या ‘मेक इन इंडिया’ धोरणास अनुसरून सर्वांगीण औद्योगिक विकास होण्याच्या दृष्टीने सूक्ष्म, लघू व मध्यम उद्योगाच्या परिवर्तनातून महाराष्ट्राचे परिवर्तन ही एकदिवसीय परिषद यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये भरविण्यात आली होती. त्या परिषदेच्या समारोपप्रसंगी मुख्यमंत्री बोलत होते. अध्यक्षस्थानी उद्योगमंत्री सुभाष देसाई होते. या परिषदेमुळे उद्योजकांमध्ये एक प्रकारचे उत्साहवर्धक वातावरण निर्माण झाल्याचे सांगून सुभाष देसाई म्हणाले, राज्यात इन्स्पेक्टर राज संपविण्याचे शासनाचे धोरण असेल. उद्योग उभारणीसाठी ज्या लोकांनी भूखंड घेऊन ठेवले असतील परंतु उद्योग उभारले नसतील अशा लोकांचे भूखंड परत घेऊन गरजूंना त्यांचे वाटप करण्यात येईल. या वेळी प्रधान सचिव अपूर्व चंद्रा, औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी भूषण गगराणी, सीआयआयचे पश्चिम विभागाचे अध्यक्ष के. नंदकुमार आदींसह राज्यातील विविध ठिकाणचे उद्योजक मोठ्या संख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी)