शहरं
Join us  
Trending Stories
1
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
2
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
3
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
4
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
5
‘रोजगार महाकुंभ’चे आयोजन; ५०,००० हून अधिक तरुणांना नोकऱ्या देणार योगी सरकार!
6
विमान हवेतच गायब झालं! २२ दिवसापूर्वी तस्मानियाहून उड्डाण केलं होतं; नेमकं काय घडलं?
7
Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक
8
क्षुल्लक कारणावरून वाद झाला, बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडच्या तोंडात बॉम्ब टाकला अन्...; घटना ऐकून होईल अंगाचा थरकाप!
9
Atharva Sudame : 'अक्कल शिकवतोय, तुझा धंदा मर्यादित ठेव'; अथर्व सुदामेला ब्राह्मण महासंघानेही सुनावले
10
एकाच घरात का केलं दोन्ही मुलींचं लग्न? निक्की भाटीच्या वडिलांनी सांगितलं कारण! म्हणाले...
11
"राज ठाकरे साहेब, आपण..."; हकालपट्टीनंतर वैभव खेडेकरांनी सोडलं मौन, राणेंच्या भेटीबद्दल काय सांगितलं?
12
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
13
"गौतम एका ठिकाणी बसून ओरडत होता"; सिंहगड किल्ल्यावरून बेपत्ता झालेल्या तरुणाला पोलिसांनी कसं शोधलं?
14
"कुटुंबाला सांगू नका, लोकांकडून पैसे घेऊन अंत्यसंस्कार करा"; मनातील वेदना कागदावर लिहून तरुणाने संपवलं आयुष्य
15
Video: कार चालकाने अचानक दरवाजा उघडला; क्रिकेटर थेट धडकला, जागीच मृत्यू
16
याला म्हणतात परतावा...! 11403% ने वाढला हा स्टॉक, आता कंपनीला DRDO कडून मिळाली ₹3.36 कोटींची ऑर्डर, शेअरची किंमत 200 हून कमी!
17
मोबाइल हॅक झाला आहे का? हे संकेत ओळखा आणि लगेच पावलं उचला
18
अथर्व सुदामेवर टीकेचा भडीमार, असिम सरोदे मैदानात; म्हणाले, "राज ठाकरेंनी तुझं कौतुक केलंय, तू..."
19
"पप्पांनीच मम्मीला काठीने मारलं, पंख्याला लटकवलं..."; ३ वर्षांच्या लेकीने केली हत्येची पोलखोल
20
भारताने दाखवले मोठे मन; पाकिस्तानला पुराबाबत केले सतर्क, ऑपरेशन सिंदूर नंतर पहिल्यांदाच चर्चा

राज्यात उद्योगांसाठी फक्त २५ परवाने!

By admin | Updated: May 10, 2015 01:17 IST

राज्यात उद्योग निर्माण करण्यासाठी उद्योजकांना ७६ विविध परवाने घ्यावे लागत होते, त्यामध्ये परिवर्तन करून त्यांची संख्या २५वर आणण्याचा शासनाचा मानस आहे आणि उद्योजकांना

मुंबई : राज्यात उद्योग निर्माण करण्यासाठी उद्योजकांना ७६ विविध परवाने घ्यावे लागत होते, त्यामध्ये परिवर्तन करून त्यांची संख्या २५वर आणण्याचा शासनाचा मानस आहे आणि उद्योजकांना परवान्यांसाठी इकडे-तिकडे जाण्याची आवश्यकता भासू नये म्हणून दीड महिन्यात एक खिडकी योजना सुरू करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे केली.राज्यात ६० टक्के लोकसंख्या २५ वर्षांखालील युवक-युवतींची आहे. त्यांच्यासाठी सूक्ष्म, लघू व मध्यम उद्योगांसाठी विकास संस्था स्थापन करण्यात येणार आहे. तसेच उद्योजकांना येणाऱ्या अडचणींवर मात करण्यासाठी किंवा परवाने वेळेवर मिळण्यासाठी विभागीय स्तरावर समिती स्थापन करण्यात येऊन १५ दिवसांमध्ये हे परवाने उद्योजकांना मिळतील, असे उद्दिष्ट समितीला देण्यात आलेले आहे. सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योगांसाठी ‘सिडबी’बरोबर एक महत्त्वाचा करार करण्यात आला असून या करारामुळे २०० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध होणार असल्याचेही मुख्यमंत्री या वेळी म्हणाले. केंद्र सरकारच्या ‘मेक इन इंडिया’ धोरणास अनुसरून सर्वांगीण औद्योगिक विकास होण्याच्या दृष्टीने सूक्ष्म, लघू व मध्यम उद्योगाच्या परिवर्तनातून महाराष्ट्राचे परिवर्तन ही एकदिवसीय परिषद यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये भरविण्यात आली होती. त्या परिषदेच्या समारोपप्रसंगी मुख्यमंत्री बोलत होते. अध्यक्षस्थानी उद्योगमंत्री सुभाष देसाई होते. या परिषदेमुळे उद्योजकांमध्ये एक प्रकारचे उत्साहवर्धक वातावरण निर्माण झाल्याचे सांगून सुभाष देसाई म्हणाले, राज्यात इन्स्पेक्टर राज संपविण्याचे शासनाचे धोरण असेल. उद्योग उभारणीसाठी ज्या लोकांनी भूखंड घेऊन ठेवले असतील परंतु उद्योग उभारले नसतील अशा लोकांचे भूखंड परत घेऊन गरजूंना त्यांचे वाटप करण्यात येईल. या वेळी प्रधान सचिव अपूर्व चंद्रा, औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी भूषण गगराणी, सीआयआयचे पश्चिम विभागाचे अध्यक्ष के. नंदकुमार आदींसह राज्यातील विविध ठिकाणचे उद्योजक मोठ्या संख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी)