शहरं
Join us  
Trending Stories
1
Ujjwal Nikam MP: उज्ज्वल निकम यांचे खासदारकीचे स्वप्न अखेर पूर्ण! राष्ट्रपतींकडून राज्यसभेवर चार जणांची नियुक्ती
2
तामिळनाडूमध्ये डिझेलने भरलेल्या मालगाडीला भीषण आग; संपूर्ण परिसरात आगीच्या ज्वाळा अन् धुराचे लोट
3
Beed Video: 'डोक्यात मार... पायावर मार... मार... मार'; उपसरपंचाला काठ्या, दगडाने मारहाण, बीड पुन्हा हादरले
4
Air India Plane Crash : विमानाचे इंजिन पायलटमुळे बंद पडले की यांत्रिक बिघाडामुळे? एअर इंडियाच्या अपघाताच्या अहवालावर अनेकांनी प्रश्न उपस्थित केले
5
दक्षिण भारत प्रसिद्ध खलनायकाला मुकला; कोटा श्रीनिवास राव यांचे ८३ व्या वर्षी निधन
6
सोनं-शेअर्स विसरा! चांदीने दिला सर्वाधिक परतावा, किंमत १.११ लाख रुपयांवर, अजून किती वाढणार?
7
'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान भारतावर अणुहल्ल्याची तयारी करत होता? शाहबाज शरीफ यांनी दिले उत्तर
8
Delhi Accident: भरधाव कारने फूटपाथवर झोपलेल्या पाच जणांना चिरडले, चालक होता नशेत
9
पायलटकडूनच मोठी चूक? दोन्ही इंजिनांचा इंधनपुरवठा सेकंदाच्या फरकाने झाला बंद
10
तीन वेळा पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केलेली, जयंत पाटलांचा राजीनामा? राष्ट्रवादी, भाजप म्हणतेय...
11
आजचे राशीभविष्य, १३ जुलै २०२५ : आज आर्थिक गुंतवणूक विचार पूर्वक करा
12
"जीव घेतलात तरी मराठी बोलणार नाही", प्रसिद्ध अभिनेता बरळला, म्हणाला- "मी घाबरत नाही..."
13
म्हाडाची जाहिरात आली; ५,२८५  घरांची लॉटरी, या दिवशी होणार बुकिंगला सुरुवात...
14
शत्रूचं ड्रोन ५ लाखांचं, पाडायला लागते १० लाखांचं मिसाइल...; ब्रिगेडिअरनी सांगितला ऑपरेशन सिंदूरचा खर्च...
15
मंत्री शिरसाट म्हणाले...पैशांची एखादी बॅग देऊ, आजकल हमारा नाम बहुत चल रहा है 
16
मेक इन इंडियाचे १०वे वर्ष;  येणार १०० रुपयांचे नाणे; कोलकाता टाकसाळीमध्ये तयार होणार विशेष नाणे
17
नवी मुंबई विमानतळाला ३० सप्टेंबरची डेडलाइन; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सिडको, अदानी समूहाला निर्देश
18
खंडाळा घाटातील ‘मिसिंग लिंक’ नोव्हेंबरपर्यंत सुरू करा; मुख्यमंत्र्यांचे आदेश
19
ईडी आरोपपत्रात रोहित पवारांचे नाव; २०२४ मध्येच चौकशी
20
बूट घ्यायलाही पैसे नव्हते; चिखलात सराव केला...

गतिमान वैरण विकास कार्यक्रमासाठी २५ कोटींचा निधी

By admin | Updated: August 3, 2015 00:18 IST

राज्यातील १३१ तालुक्यांमध्ये राबविणार कार्यक्रम; विदर्भ, मराठवाड्याला प्राधान्य.

अतुल जयस्वाल/ अकोला: राज्यात यावर्षी पावसाने पाठ फिरवल्यामुळे आगामी काळातील संभाव्य चारा टंचाईवर मात करण्यासाठी शासनाने चालू वित्तीय वर्षात राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत गतिमान वैरण विकास कार्यक्रम राबविण्याचे ठरविले आहे. यासाठी शासनाने ३१ जुलै रोजी २५ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला. राज्यातील ५0 टक्क्यांपेक्षा कमी पर्जन्यमान झालेल्या १३१ तालुक्यांमध्ये हा कार्यक्रम राबविण्यात येणार असून, विदर्भ व मराठवाड्यातील तालुक्यांचा प्राधान्याने विचार केला जाणार आहे. यावर्षी राज्यात आतापर्यंत समाधानकारक पाऊस झाला नाही. त्यामुळे पिकांचे नुकसान तर होतच आहे, शिवाय जनावरांच्या चार्‍याचाही प्रश्न बिकट बनला आहे. या पृष्ठभूमीवर १८ जून रोजी राष्ट्रीय कृषी विकास योजनेच्या राज्यस्तरीय प्रकल्प मंजुरी समितीच्या मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीत जून ते सप्टेंबर या महिन्यात समाधानकारक पाऊस न झाल्यास गतिमान वैरण विकास कार्यक्रम राबविण्यात येईल, असा निर्णय घेण्यात आला होता. ३१ जुलै अखेरपर्यंत राज्यातील अनेक तालुक्यांमध्ये ५0 टक्के किंवा त्यापेक्षा कमी पावसाची नोंद झाली आहे. या पृष्ठभूमीवर शासनाने चालू वित्त वर्षात गतिमान वैरण विकास कार्यक्रम राबविण्यास प्रशासकीय मान्यता देऊन २५ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. ३१ जुलै अखेरपर्यंत सरासरी पर्जन्यमानाच्या ५0 टक्क्यांपेक्षा कमी पाऊस झालेल्या तालुक्यांमध्ये या कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्याचे निर्देश शासनाने दिले आहेत. विदर्भ व मराठवाड्यातील अवर्षणग्रस्त परिस्थिती उद्भवलेल्या जिल्हय़ांमध्ये उपलब्ध पशुधनाची संख्या विचारात घेऊन चारा उत्पादन घेता येऊ शकेल, अशा गावांमध्ये प्राधान्याने हा कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. या कार्यक्रमांतर्गत किमान 0.२ हेक्टर ते कमाल १ हेक्टर क्षेत्रावर चारा पिकाच्या लागवडीकरिता बियाणे व बीज प्रक्रियेकरिता १५00 रुपये प्रतिहेक्टरप्रमाणे लाभार्थी शेतकर्‍यांना अनुदान देण्यात येईल. पशुधन असलेल्या अल्प व अत्यल्प भूधारक शेतकर्‍यांचा प्राधान्याने विचार करण्यात येणार आहे. लाभार्थी शेतकर्‍यांची यादी तालुका कृषी अधिकार्‍यांच्या स्तरावरून संकलित करण्यात येणार आहे. या कार्यक्रमासाठी उपलब्ध करून देण्यात आलेला निधी कोणत्याही परिस्थितीत अखर्चित राहणार नाही, याची काळजी संबंधित यंत्रणांनी घ्यावी, असे निर्देश देण्यात आले आहेत. यासंदर्भात एस डी मालपुरे यांनी अवर्षणाची स्थिती पाहता राज्यातील संभाव्य चारा टंचाईच्या परिस्थितीवर मात करण्यासाठी गतिमान वैरण विकास कार्यक्रम राबविण्यात येणार असल्याचे सांगीतले. शासनाकडून निधीही मंजूर करण्यात आला असून याबाबतची प्रक्रिया सुरू झाली आहे. शेतकर्‍यांनी या योजनेचा लाभ घेण्याचे त्यांनी शेतकर्‍यांना अवाहन केले आहे.

विदर्भातील या तालुक्यांमध्ये राबविणार कार्यक्रम

अकोला - आकोट, तेल्हारा, अकोला

बुलडाणा - लोणार, जळगाव जामोद, संग्रामपूर, चिखली, बुलडाणा, देऊळगाव राजा, मेहकर, सिंदखेड राजा, खामगाव, शेगाव, नांदुरा

चंद्रपूर - चिमुर, ब्रह्मपुरी, नागभिड वाशिम - मालेगाव, कारंजा

यवतमाळ - यवतमाळ, उमरखेड, बाभूळगाव, कळंब, दारव्हा, दिग्रस, नेर, महागाव, वणी, मारेगाव, झरी-जामनी, केळापूर, घाटंजी, राळेगाव.