शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रशांत किशोर यांना बिहारच्या आरा येथील रॅलीमध्ये गंभीर दुखापत, उपचारासाठी पाटणाला रवाना
2
छांगुर बाबावर EDची मोठी कारवाई! मुंबई, लखनौमध्ये छापे; ६० कोटींहून जास्तीचे मनी लाँड्रिंग उघड
3
"मी कोणाला छेडत नाही; पण मला कुणी त्रास दिला तर..."; एकनाथ शिंदेंचा उबाठा गटाला इशारा
4
महाराष्ट्र मराठी माणसाच्या बापाचाच! इथे कुणी वेडंवाकडं वागायचा प्रयत्न केला तर...- राज ठाकरे
5
"आता दुकाने नाही शाळाच बंद करेन"; त्रिभाषा सूत्रावरुन राज ठाकरेंनी सरकारला दिला इशारा
6
वैभव सूर्यवंशीच्या 'त्या' कृत्यामुळे मोठा गोंधळ; विराट कोहलीचे चाहते प्रचंड संतापले, कारण...
7
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
8
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
9
करुण नायरला दोन्ही टेस्टमध्ये संधी मिळेल! फ्लॉप शोनंतरही कोचला त्याच्यावर 'भरवसा'
10
"विधिमंडळात हे माझे ३६वे वर्ष, पण एवढ्या वर्षात..."; जयंत पाटील यांना नेमकी कसली खंत?
11
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
12
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
13
IND vs ENG ...तर रिषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवू नका! शास्त्रींनी दिला गिल-गंभीर जोडीला सल्ला
14
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
15
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
16
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
17
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
18
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
19
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
20
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं

राज्यातील २३ लाख वाहने बंद

By admin | Updated: August 31, 2016 05:01 IST

राज्यातील २३ लाख वाहने फिटनेस सर्टिफिकेटअभावी बंद आहेत. कारण राज्यातील आरटीओंमध्ये अडीचशे मीटर टेस्ट ट्रॅक उपलब्ध करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत

मुंबई : राज्यातील २३ लाख वाहने फिटनेस सर्टिफिकेटअभावी बंद आहेत. कारण राज्यातील आरटीओंमध्ये अडीचशे मीटर टेस्ट ट्रॅक उपलब्ध करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत. पण या आदेशाची अंमलबजावणी न करण्यात आलेली नाही. त्यामुळे २५ आॅगस्ट रोजी राज्य सरकारने फिटनेस सर्टिफिकेट देणे बंद केल्याची माहिती, हंगामी महाअधिवक्ता रोहित देव यांनी मंगळवारी उच्च न्यायालयाला दिली.फिटनेस सर्टिफिकेट आणि ब्रेक टेस्ट करताना मोटार व्हेइकल कायद्याचे पालन केले जात नाही. त्यामुळे राज्य सरकारला कायद्याचे काटेकोर पालन करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी करणारी जनहित याचिका पुण्याचे समाजसेवक श्रीकांत कर्वे यांनी उच्च न्यायालयात केली. न्या. अभय ओक व न्या. अमजद सय्यद यांच्या खंडपीठापुढे या याचिकेवर सुनावणी होती.१८ फेब्रुवारी रोजी उच्च न्यायालयाने सहा महिन्यांत अडीचशे मीटर लांबीचे टेस्ट ट्रॅक उपलब्ध करा, अन्यथा आरटीओंनी फिटनेस सर्टिफिकेट देऊ नये, असे सरकारला बजावले होते. सहा महिने उलटल्यानंतरही राज्य सरकारने सहा महिन्यांत राज्यांतील आरटीओंमध्ये अडीचशे मीटर टेस्ट ट्रॅक उपलब्ध न केल्याने, अखेरीस २५ आॅगस्ट रोजी आरटीओंनी वाहनांना फिटनेस सर्टिफिकेट देणे थांबवले. त्यामुळे राज्यातील २३ लाख वाहने फिटनेस सर्टिफिकेट मिळवण्यासाठी रांगेत आहेत, अशी माहिती देव यांनी मंगळवारी खंडपीठाला दिली.न्यायालयाच्या आदेशाचे पालन न केल्याने, तुम्हीच वाहनांना फिटनेस सर्टिफिकेट देणे थांबवले आहे. येत्या सहा महिन्यांत अडीचशे मीटर टेस्ट ट्रॅक उपलब्ध करा, असे खंडपीठाने म्हटल्यावर, राज्य सरकारने हे शक्य नसल्याचे सांगितले.अ‍ॅड. देव यांनी गृहविभागाचे उपसचिव प्रकाश साबळे यांचे प्रतिज्ञापत्र खंडपीठापुढे सादर केले. ‘राज्यातील ५० आरटीओंपैकी १६ ठिकाणी राज्य सरकारच्या मालकीची जागा असल्याने, या ठिकाणी अडीचशे मीटर टेस्ट ट्रॅक उपलब्ध होऊ शकतात. त्यासाठी आवश्यक ती प्रक्रिया पार पाडण्यात येईल. नागपूरमध्ये असलेली दोन आरटीओ एकाच ठिकाणी एकत्र आणण्यात येतील, तर ३२ ठिकाणी अद्याप जागा उपलब्ध झालेली नाही. जिल्हाधिकाऱ्यांनी ११ ठिकाणी जागा शोधल्या आहेत. मात्र, उर्वरित २१ ठिकाणी जागा मिळत नाहीत. त्यामुळे राज्य सरकारला खासगी जागा संपादित कराव्या लागतील आणि या संपादन प्रक्रियेत अनेक अडथळे येण्याची शक्यता आहे. या सर्व प्रक्रियेला १८ महिने लागतील,’ असे राज्य सरकारने प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे. उच्च न्यायालयाने या याचिकेवरील सुनावणी १ सप्टेंबर रोजी ठेवली आहे. (प्रतिनिधी)