शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ८५ व्या वर्षी निधन
2
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
3
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
4
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
5
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
6
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
7
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
8
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
9
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
10
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
11
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
12
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
13
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
14
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
15
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
16
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
17
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
18
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
19
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
20
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील २३ लाख वाहने बंद

By admin | Updated: August 31, 2016 05:01 IST

राज्यातील २३ लाख वाहने फिटनेस सर्टिफिकेटअभावी बंद आहेत. कारण राज्यातील आरटीओंमध्ये अडीचशे मीटर टेस्ट ट्रॅक उपलब्ध करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत

मुंबई : राज्यातील २३ लाख वाहने फिटनेस सर्टिफिकेटअभावी बंद आहेत. कारण राज्यातील आरटीओंमध्ये अडीचशे मीटर टेस्ट ट्रॅक उपलब्ध करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत. पण या आदेशाची अंमलबजावणी न करण्यात आलेली नाही. त्यामुळे २५ आॅगस्ट रोजी राज्य सरकारने फिटनेस सर्टिफिकेट देणे बंद केल्याची माहिती, हंगामी महाअधिवक्ता रोहित देव यांनी मंगळवारी उच्च न्यायालयाला दिली.फिटनेस सर्टिफिकेट आणि ब्रेक टेस्ट करताना मोटार व्हेइकल कायद्याचे पालन केले जात नाही. त्यामुळे राज्य सरकारला कायद्याचे काटेकोर पालन करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी करणारी जनहित याचिका पुण्याचे समाजसेवक श्रीकांत कर्वे यांनी उच्च न्यायालयात केली. न्या. अभय ओक व न्या. अमजद सय्यद यांच्या खंडपीठापुढे या याचिकेवर सुनावणी होती.१८ फेब्रुवारी रोजी उच्च न्यायालयाने सहा महिन्यांत अडीचशे मीटर लांबीचे टेस्ट ट्रॅक उपलब्ध करा, अन्यथा आरटीओंनी फिटनेस सर्टिफिकेट देऊ नये, असे सरकारला बजावले होते. सहा महिने उलटल्यानंतरही राज्य सरकारने सहा महिन्यांत राज्यांतील आरटीओंमध्ये अडीचशे मीटर टेस्ट ट्रॅक उपलब्ध न केल्याने, अखेरीस २५ आॅगस्ट रोजी आरटीओंनी वाहनांना फिटनेस सर्टिफिकेट देणे थांबवले. त्यामुळे राज्यातील २३ लाख वाहने फिटनेस सर्टिफिकेट मिळवण्यासाठी रांगेत आहेत, अशी माहिती देव यांनी मंगळवारी खंडपीठाला दिली.न्यायालयाच्या आदेशाचे पालन न केल्याने, तुम्हीच वाहनांना फिटनेस सर्टिफिकेट देणे थांबवले आहे. येत्या सहा महिन्यांत अडीचशे मीटर टेस्ट ट्रॅक उपलब्ध करा, असे खंडपीठाने म्हटल्यावर, राज्य सरकारने हे शक्य नसल्याचे सांगितले.अ‍ॅड. देव यांनी गृहविभागाचे उपसचिव प्रकाश साबळे यांचे प्रतिज्ञापत्र खंडपीठापुढे सादर केले. ‘राज्यातील ५० आरटीओंपैकी १६ ठिकाणी राज्य सरकारच्या मालकीची जागा असल्याने, या ठिकाणी अडीचशे मीटर टेस्ट ट्रॅक उपलब्ध होऊ शकतात. त्यासाठी आवश्यक ती प्रक्रिया पार पाडण्यात येईल. नागपूरमध्ये असलेली दोन आरटीओ एकाच ठिकाणी एकत्र आणण्यात येतील, तर ३२ ठिकाणी अद्याप जागा उपलब्ध झालेली नाही. जिल्हाधिकाऱ्यांनी ११ ठिकाणी जागा शोधल्या आहेत. मात्र, उर्वरित २१ ठिकाणी जागा मिळत नाहीत. त्यामुळे राज्य सरकारला खासगी जागा संपादित कराव्या लागतील आणि या संपादन प्रक्रियेत अनेक अडथळे येण्याची शक्यता आहे. या सर्व प्रक्रियेला १८ महिने लागतील,’ असे राज्य सरकारने प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे. उच्च न्यायालयाने या याचिकेवरील सुनावणी १ सप्टेंबर रोजी ठेवली आहे. (प्रतिनिधी)