शहरं
Join us  
Trending Stories
1
Sambhajinagar Accident: संभाजीनगरात भीषण अपघात, भरधाव कार दुभाजकाला धडकून उलटली, ३ जण जागीच ठार!
2
IND vs ENG: केएल राहुलने शुभमन गिलकडून घेतली 'कॅप्टन्सी', पराभवापूर्वी सामन्यात अचानक काय घडलं?
3
संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा वाल्मीक कराडच 'डायरेक्टर'; न्यायालयात ३ तास काय झाला युक्तिवाद?
4
IND vs ENG: आधी चार झेल सोडले, नंतर हसत-खेळत केली 'तशी' कृती... यशस्वी जैस्वालवर संतापले नेटिझन्स
5
मदरशामध्ये अल्पवयीन विद्यार्थ्यासोबत ठेवले अनैसर्गिक संबंध, व्हिडीओही काढले, सोशल मीडियावर शेअर केले, आरोपी अटकेत
6
पाकिस्तान सुधारणार नाही, राजौरीमध्ये नियंत्रण रेषेवर घुसखोरीचा प्रयत्न अयशस्वी; दहशतवादी गोळीबार करून पळून गेले
7
Iran Israel Conflict: इराण इस्रायल प्रकरणी भारत शांत का? एक चूक आणि ५७,४४८ कोटी येतील धोक्यात
8
Pramod Kondhare: पाठीमागून आला आणि...; भाजप पदाधिकाऱ्याचं महिला पोलीसाशी गैरवर्तन, गुन्हा दाखल
9
जगभर: चिनी राष्ट्राध्यक्षांच्या ‘अज्ञात’ मुलीची ‘हेरगिरी’! शी जिनपिंग यांची मुलगी कोण?
10
पीएफ खात्यातून ७२ तासांत काढता येणार ५ लाख रुपये; एटीएम आणि यूपीआयद्वारेही पैसे काढता येणार
11
दोन पत्नी असल्याने आमदारकी रद्द होत नाही; शिवसेना आमदाराला मुंबई उच्च न्यायालयात मोठा दिलासा
12
Mumbra Local Train Accident: ‘त्या’ प्रवाशामुळे मुंब्र्यात अपघात? दोन्ही ट्रेनमधील प्रवाशांमध्ये होते फक्त ०.७५ मीटर अंतर
13
"...म्हणून आम्ही हरलो", पराभवानंतर शुभमन गिलने यांच्यावर फोडलं अपयशाचं खापर 
14
नीरज चोप्राचं सोनेरी यश, ओस्ट्रावा गोल्डन स्पाईक स्पर्धेत जिंकलं सुवर्णपदक   
15
आजचे राशीभविष्य - २५ जून २०२५, नोकरीत पदोन्नतीची शक्यता, वैवाहिक सौख्य लाभेल!
16
विशेष लेख: आणीबाणीने देशाला शिकवलेले तीन धडे
17
Samruddhi Mahamarg: 'समृद्धी'वर शहापूरजवळ ओव्हरपासच्या पुलावर १९ दिवसांतच पडले खड्डे
18
लेख: तोटा सोसून बँकेच्या बचत खात्यात लोकांनी पैसे का ठेवावे?
19
शक्तिपीठ महामार्ग होणारच; 'कोल्हापुरात महामार्ग नको', कोल्हापूरच्या मंत्र्यांची भूमिका
20
India vs England: जिथे कमी तिथे केएल राहुल!

‘लोकमत’मुळे २२ वर्षांची फरफट संपली

By admin | Updated: July 1, 2015 00:17 IST

जावळीच्या शेतकऱ्याची कथा : बातमीनंतर १८ दिवसांत शेतात पडले झुळझुळ पाणी...!

विश्वास पाटील - कोल्हापूर वार... मंगळवार. वेळ... दुपारी एकची. सातारा जिल्ह्यातील करंदी (ता. जावळी) येथील सदाशिव दिनकर निकम यांच्या लिंगावणा नावाच्या शेतातील विहिरीवर वीजपंप सुरू झाला आणि नळातून पडणारे पांढरे शुभ्र झुळझुळ पाणी पाहून निकम कुटुंबीयांच्या आनंदाला पारावर उरला नाही. विजेचे कनेक्शन मिळावे म्हणून तब्बल २२ वर्षे हेलपाटे मारणाऱ्या निकम यांची फरफट ‘लोकमत’ने १२ जूनच्या अंकात प्रसिद्ध केल्यावर ‘महावितरण’ची यंत्रणा हादरली व अवघ्या १८ दिवसांत त्यांना वीज कनेक्शन जोडून दिले. निकम सध्या पंचाहत्तरीकडे झुकलेले व त्यांचा मोठा भाऊ ऐंशीकडे. आम्ही मरण्यापूर्वी शेतात पाणी पडताना पाहण्याचे भाग्य ‘लोकमत’मुळे मिळाल्याची प्रतिक्रिया या दोघांनी व्यक्त केली. निकम व त्यांच्या भावाची सुमारे तीन एकर जमीन. तिला पाणी मिळाले, तर भाजीपाला करता येईल म्हणून त्यांनी १६ आॅगस्ट १९९३ रोजी वीज मंडळाकडे अर्ज केला. त्यासाठी मेढा येथे जाऊन १९१० रुपये अनामत भरली. तेव्हापासून २०१० पर्यंत ते वारंवार चौकशी करीत होते; परंतु त्यांना कनेक्शन मंजूर झाले नाही. त्या अर्जाची मुदत संपल्याने त्यांनी १२ आॅक्टोबर २०११ रोजी नवीन अर्ज करून ३०२५ रुपये परत भरले; परंतु तरीही त्यांना कनेक्शन मिळाले नव्हते. मात्र, ‘लोकमत’ने ही बातमी प्रसिद्ध करताच दुसऱ्या दिवशी महावितरणची गाडी त्यांना शोधत घरी गेली व सगळी कागदोपत्री प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. निकम यांनी साडेबारा हजार रुपयांचा तीन अश्वशक्तीचा वीजपंप विकत घेतला. वायर, तार, आदी साहित्यासह त्यांना २१ हजार रुपये खर्च आला. त्या परिसरात पावसाचे प्रमाण जास्त असल्याने कनेक्शन जोडण्यात अडचणी आल्या. दोन दिवस पावसाने उसंत घेतल्यावर मंगळवारी दुपारी कनेक्शन जोडले व पंप सुरू होऊन त्यातून निकम यांच्या शेतात पाणी पडले. निव्वळ ६० फुटांसाठी... निकम यांच्या शेताजवळ २००३ लाच सिमेंटचा खांब उभारण्यात आला होता. तिथून त्यांचे शेत अवघ्या ६० फुटांवर आहे. त्यामुळे त्यावरूनच मला कनेक्शन द्या, असे त्यांचे म्हणणे होते; परंतु काही ना काही कारणे सांगून त्यांना ते दिले जात नव्हते. गरीब बिचाऱ्या शेतकऱ्याची अडवणूक सुरू होती. आता त्याच खांबावरून ‘महावितरण’ने त्यांना कनेक्शन जोडून दिले; परंतु त्यामध्ये त्यांच्या आयुष्यातील १२ वर्षे वाया गेली. अनामतही जमा निकम यांनी पहिल्यांदा १९९३ मध्ये कनेक्शनसाठी १९१० रुपये अनामत भरली होती. ती परत द्यायलाही महावितरण तयार नव्हते. ‘लोकमत’मध्ये वृत्त प्रसिद्ध होताच त्यांना लगेच १५ तारखेला १८७५ रुपयांचा बँक आॅफ महाराष्ट्रच्या वाई शाखेचा धनादेश महावितरणने पोस्टाने घरी पाठविला.