शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
2
Latest Marathi News LIVE: सूरसम्राज्ञी आशा भोसले पंचत्वात विलीन, चाहत्यांनी साश्रू नयनांनी दिला अखेरचा निरोप
3
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
4
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
5
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
6
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
7
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
8
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
9
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
10
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
11
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
12
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
13
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
14
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
15
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
16
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
17
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
18
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
19
IPL 2026: बॉल बॉयनं पाय धरताच व्यंकटेश अय्यरनं केलं असं काही, सर्वत्र होतंय कौतुक! 
20
'एक अब्ज डॉलर आणि लग्नासाठी एक सुंदर तरुणी द्या, अन्यथा...', या देशाच्या लष्कर प्रमुखाची तुर्कीला धमकी
Daily Top 2Weekly Top 5

‘लोकमत’मुळे २२ वर्षांची फरफट संपली

By admin | Updated: July 1, 2015 00:17 IST

जावळीच्या शेतकऱ्याची कथा : बातमीनंतर १८ दिवसांत शेतात पडले झुळझुळ पाणी...!

विश्वास पाटील - कोल्हापूर वार... मंगळवार. वेळ... दुपारी एकची. सातारा जिल्ह्यातील करंदी (ता. जावळी) येथील सदाशिव दिनकर निकम यांच्या लिंगावणा नावाच्या शेतातील विहिरीवर वीजपंप सुरू झाला आणि नळातून पडणारे पांढरे शुभ्र झुळझुळ पाणी पाहून निकम कुटुंबीयांच्या आनंदाला पारावर उरला नाही. विजेचे कनेक्शन मिळावे म्हणून तब्बल २२ वर्षे हेलपाटे मारणाऱ्या निकम यांची फरफट ‘लोकमत’ने १२ जूनच्या अंकात प्रसिद्ध केल्यावर ‘महावितरण’ची यंत्रणा हादरली व अवघ्या १८ दिवसांत त्यांना वीज कनेक्शन जोडून दिले. निकम सध्या पंचाहत्तरीकडे झुकलेले व त्यांचा मोठा भाऊ ऐंशीकडे. आम्ही मरण्यापूर्वी शेतात पाणी पडताना पाहण्याचे भाग्य ‘लोकमत’मुळे मिळाल्याची प्रतिक्रिया या दोघांनी व्यक्त केली. निकम व त्यांच्या भावाची सुमारे तीन एकर जमीन. तिला पाणी मिळाले, तर भाजीपाला करता येईल म्हणून त्यांनी १६ आॅगस्ट १९९३ रोजी वीज मंडळाकडे अर्ज केला. त्यासाठी मेढा येथे जाऊन १९१० रुपये अनामत भरली. तेव्हापासून २०१० पर्यंत ते वारंवार चौकशी करीत होते; परंतु त्यांना कनेक्शन मंजूर झाले नाही. त्या अर्जाची मुदत संपल्याने त्यांनी १२ आॅक्टोबर २०११ रोजी नवीन अर्ज करून ३०२५ रुपये परत भरले; परंतु तरीही त्यांना कनेक्शन मिळाले नव्हते. मात्र, ‘लोकमत’ने ही बातमी प्रसिद्ध करताच दुसऱ्या दिवशी महावितरणची गाडी त्यांना शोधत घरी गेली व सगळी कागदोपत्री प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. निकम यांनी साडेबारा हजार रुपयांचा तीन अश्वशक्तीचा वीजपंप विकत घेतला. वायर, तार, आदी साहित्यासह त्यांना २१ हजार रुपये खर्च आला. त्या परिसरात पावसाचे प्रमाण जास्त असल्याने कनेक्शन जोडण्यात अडचणी आल्या. दोन दिवस पावसाने उसंत घेतल्यावर मंगळवारी दुपारी कनेक्शन जोडले व पंप सुरू होऊन त्यातून निकम यांच्या शेतात पाणी पडले. निव्वळ ६० फुटांसाठी... निकम यांच्या शेताजवळ २००३ लाच सिमेंटचा खांब उभारण्यात आला होता. तिथून त्यांचे शेत अवघ्या ६० फुटांवर आहे. त्यामुळे त्यावरूनच मला कनेक्शन द्या, असे त्यांचे म्हणणे होते; परंतु काही ना काही कारणे सांगून त्यांना ते दिले जात नव्हते. गरीब बिचाऱ्या शेतकऱ्याची अडवणूक सुरू होती. आता त्याच खांबावरून ‘महावितरण’ने त्यांना कनेक्शन जोडून दिले; परंतु त्यामध्ये त्यांच्या आयुष्यातील १२ वर्षे वाया गेली. अनामतही जमा निकम यांनी पहिल्यांदा १९९३ मध्ये कनेक्शनसाठी १९१० रुपये अनामत भरली होती. ती परत द्यायलाही महावितरण तयार नव्हते. ‘लोकमत’मध्ये वृत्त प्रसिद्ध होताच त्यांना लगेच १५ तारखेला १८७५ रुपयांचा बँक आॅफ महाराष्ट्रच्या वाई शाखेचा धनादेश महावितरणने पोस्टाने घरी पाठविला.