शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०२७मध्ये गोव्यात ‘आप’ स्वबळावर सरकार स्थापन करेल”: अरविंद केजरीवाल; भाजपा-काँग्रेसवर टीका
2
आणखी एका मुलीने गमावला जीव, मृतांचा आकडा १० वर; काँग्रेसची ५० लाख भरपाई देण्याची मागणी
3
“RSS-BJPने ओबीसींचा घात केला, मोहन भागवत कधी गजानन महाराजांच्या दर्शनाला गेले का”: आंबेडकर
4
टॉपर तरुणीला गुंगीचे औषध देऊन अत्याचार; स्वतःला संपवायला निघालेल्या माय-लेकीला माजी सैनिकाने वाचवलं
5
"भारत माझी मातृभूमी, तर पाकिस्तान…’’, दानिश कनेरियाचं मोठं विधान, नागरिकत्वाबाबत म्हणाला  
6
...तर रोहित-विराटवर वनडे वर्ल्ड कप स्पर्धेआधीच निवृत्ती घेण्याची वेळ येणार?
7
भारतीय तरुणांना फसवून सायबर गुन्ह्यांसाठी जुंपणारी आंतरराष्ट्रीय टोळी उघडकीस; दोघे अटकेत, भारतीय आरोपींसह चिनी कनेक्शन आले समोर 
8
बिहारमध्ये लालू यादवांच्या निवासस्थांनी उमेदवारीवरून गोंधळ, घरात घुसले कार्यकर्ते, म्हणाले, आम्हाला...  
9
पावसाच्या 'बॅटिंग'च्या जोरावर श्रीलंकेनं उघडलं खातं; पाकला पराभूत करताच टीम इंडिया होईल टॉपर
10
अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या घालून हत्या; शिक्षणासोबत पेट्रोल पंपावर करत होता पार्ट-टाईम काम
11
“राहुल गांधी यांचा पासपोर्ट जप्त करावा अन् कायदेशीर कारवाई करावी”; भाजपा नेत्यांची मागणी
12
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
13
निसर्ग अशांतच! अतिवृष्टीनंतर आता ‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा
14
वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार; रोहित शर्मा दुसरा, मग पहिला कोण?
15
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी
16
“सोनम वांगचूक यांना सोडून द्यावे, नवीन पिढीसाठी मोठे योगदान”: शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद
17
४८ तासांत मंजूर झाले कोट्यवधींचे कर्ज ! भंडारा, नागपूर जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या नावे कर्ज घोटाळा; ईडीकडून कारवाईचा धडाका
18
“अनिल परब अर्धवट वकील”; रामदास कदमांचा पलटवार, पत्नीने जाळून घेतले की? यावरही दिले उत्तर
19
Video - "मी तुला गोळी मारेन, कोणी वाचवणार नाही"; भाजपा नेत्याची गुंडगिरी, डान्सरवर उधळले पैसे
20
प्रवाशांची दिवाळी! मुंबई-गोवा ‘वंदे भारत’च्या फेऱ्या वाढणार; कोकणवासीयांना फायदा, नवे टाइमटेबल

नववर्षात मेट्रो-३ चे २०% काम करणार

By admin | Updated: December 31, 2016 03:42 IST

मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने नव्या वर्षात कुलाबा-वांद्रे-सीप्झ या भुयारी मेट्रो-३चे बांधकाम २० टक्के पूर्ण करण्याचा निर्धार केला आहे. सर्व स्थानकांच्या भिंती बांधणे, टनेल बोअरिंग

मुंबई : मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने नव्या वर्षात कुलाबा-वांद्रे-सीप्झ या भुयारी मेट्रो-३चे बांधकाम २० टक्के पूर्ण करण्याचा निर्धार केला आहे. सर्व स्थानकांच्या भिंती बांधणे, टनेल बोअरिंग मशिन्सच्या मदतीने सातही टप्प्यांत खोदकाम करणे; इत्यादी कामे हाती घेतली जाणार आहेत. सर्व प्रकल्पबाधितांचे पुनर्वसन करण्याचा कॉर्पोरेशनचा मानस असून, नव्या वर्षात काळबादेवी आणि गिरगाव येथील पुनर्वसनाचा प्रश्न चर्चा करून सामंजस्याने सोडविण्यात येणार आहे.टॅक्शन पॉवर सप्लाय कंत्राटाबरोबरच प्रणालीबाबतच्या निविदा मंजूर करण्यासह यापूर्वी मेट्रो-३ची १८ हजार कोटींपेक्षा अधिक किमतीच्या बांधकामांची कंत्राटे देण्यात आली. संपूर्ण ३३.५ किमी मार्गाचे भौगोलिक सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले असून, भूगर्भ तपासणीचे काम प्रगतिपथावर आहे. मेट्रो-३च्या मार्गाच्या आसपास असलेल्या इमारतीच्या सद्य:स्थितीचे सर्वेक्षण सुरू आहे. जमिनीखालील सेवा जोखण्यासाठीचे खोदकाम प्रगतिपथावर असून, भिंती बांधण्यासाठी पायलिंगचे काम सुरू झाले आहे.मेट्रो-३चे प्रत्यक्ष बांधकाम सुरू करण्यासाठी बॅरिकेडिंग करण्यात येत आहे. रस्त्यावरील वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी सहपोलीस आयुक्तांच्या साहाय्याने तयार करण्यात आलेल्या वाहतूक आराखड्याची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. या आराखड्यानुसार गर्दीच्या वेळी वाहतूक नियमित ठेवण्यासाठी १ हजार ५०० प्रशिक्षित वाहतूक शिलेदारांची नेमणूक करण्यात येणार आहे. बांधकाम सुरू करण्यासाठी आवश्यक त्या सर्व परवानग्या मिळाल्या असून, सरकारी जमिनीच्या ९० टक्के जमीन संपादित करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)- मेट्रो-३ची अंमलबजावणी करताना २ हजार ८०७ प्रकल्पबाधितांचे पुनर्वसन कॉर्पोरेशनतर्फे करण्यात येणार आहे. यामध्ये १ हजार ८६६ रहिवासी, ७९५ व्यावसायिक आणि ३९ रहिवासी-कम-व्यावसायिक व १०७ इतर प्रकल्पबाधितांचा समावेश आहे.- मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनतर्फे आजपर्यंत ५०० प्रकल्पबाधितांना पर्यायी जागा देण्यात आली आहे. त्यांना नव्या ठिकाणी शिफ्ट करण्यात आले आहे. मेट्रो-३ मार्गावरील उर्वरित प्रकल्पबाधितांना नव्या वर्षात पर्यायी जागा देण्यात येणार आहे.काळबादेवी आणि गिरगावकरांनी उपस्थित केलेले मुद्दे विचारात घेत त्यांचे त्याच परिसरात पुनर्वसन करण्याच्या दृष्टीने आराखडा तयार केला आहे. सद्य:स्थितीमध्ये काळबादेवी आणि गिरगावमधील रहिवाशांसोबत चर्चा सुरू आहे. त्यांच्याशी चर्चा करून आराखड्याची अंमलबजावणी करण्यात येईल.- अश्विनी भिडे, व्यवस्थापकीय संचालक, मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन