शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाकला स्पष्ट शब्दांत ठणकावले; पाहा, भाषणातील ५६ महत्त्वाचे मुद्दे
2
आजचे राशीभविष्य १३ मे २०२५ : या राशींना आर्थिक लाभ, कसा असेल तुमचा आजचा दिवस...
3
एअर मार्शल भारती म्हणाले, “भय बिनु होइ न प्रीति, कोणत्याही आव्हानांचा मुकाबला करण्यास सज्ज”
4
१९७१नंतर प्रथमच पाकला मोठा दणका; ५२हून अधिक वायुसैनिकांचा मृत्यू; १२ एअरबेसवर भारताचे हल्ले
5
‘हे’ तीन दहशतवादी हवेत, मगच थांबेल काश्मीरचा दहशतवाद; भारताची पाककडे सातत्याने मागणी
6
धास्ती: सीमावर्ती गावांत अद्याप शेकडो जिवंत बॉम्ब, ६ ठिकाणी केले निष्क्रिय; नागरिक परतले घरी
7
जे होते ‘ऑपरेशन सिंदूर’चा चेहरा त्यांचे ट्रोलिंग; मिस्रींच्या मुलीची वैयक्तिक माहिती लीक
8
युद्ध झालेलेच नाही, तेव्हा शस्त्रसंधीचा प्रश्नच नाही; भारत-पाकच्या राजनैतिकांनाच श्रेय
9
३२ विमानतळ पुन्हा सुरू करण्याची तयारी; भारत-पाकिस्तान संघर्षामुळे विमान उड्डाणे होती बंद
10
पाकच्या ताब्यातील जवानाच्या पत्नीशी संवाद; सुटकेसाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन, फोनवर चर्चा
11
संरक्षण दलांना राज्यात सर्वतोपरी मदत: मुख्यमंत्री; तिन्ही दलांच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक
12
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर सायबर हल्ल्यांचा आकडा १५ लाखांवर; फक्त १५० यशस्वी, सायबर विभागाचा तपास
13
दहावीचा निकाल आज... मित्रांनो, मनासारखे नाही झाले, तरी हार मानू नका 
14
मराठवाडा, उत्तर महाराष्ट्राला अवकाळीचा तडाखा; पिकांनी टाकल्या माना, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान
15
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील जखमी म्हणतात, आजही तेथून जाताना हृदयात चर्रर्र होतं
16
नवीन होर्डिंग धोरण वर्षभरानंतरही कागदावरच! घाटकोपर दुर्घटनेला वर्ष होऊनही महापालिका गप्पच
17
शाहरुख खानच्या ‘त्या’ कर्मचाऱ्याच्या कुटुंबाला ६२ लाखांची भरपाई योग्यच; हायकोर्टाचे आदेश
18
आंतरराष्ट्रीय सीमेवर संशयित ड्रोन दिसले, अनेक ठिकाणी ब्लॅकआऊट केले; ‘त्या’ ४ तासांत काय घडले?
19
डोनाल्ड ट्रम्प यांचा ‘तो’ दावा फेटाळला; भारताने स्पष्टच सांगितले, “चर्चेत ते मुद्दे नव्हते”
20
“भारत-पाकने युद्धविराम केला नाही, तर व्यापार नाही, आम्ही अण्वस्त्रांचे युद्ध रोखले”: ट्रम्प

नववर्षात मेट्रो-३ चे २०% काम करणार

By admin | Updated: December 31, 2016 03:42 IST

मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने नव्या वर्षात कुलाबा-वांद्रे-सीप्झ या भुयारी मेट्रो-३चे बांधकाम २० टक्के पूर्ण करण्याचा निर्धार केला आहे. सर्व स्थानकांच्या भिंती बांधणे, टनेल बोअरिंग

मुंबई : मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने नव्या वर्षात कुलाबा-वांद्रे-सीप्झ या भुयारी मेट्रो-३चे बांधकाम २० टक्के पूर्ण करण्याचा निर्धार केला आहे. सर्व स्थानकांच्या भिंती बांधणे, टनेल बोअरिंग मशिन्सच्या मदतीने सातही टप्प्यांत खोदकाम करणे; इत्यादी कामे हाती घेतली जाणार आहेत. सर्व प्रकल्पबाधितांचे पुनर्वसन करण्याचा कॉर्पोरेशनचा मानस असून, नव्या वर्षात काळबादेवी आणि गिरगाव येथील पुनर्वसनाचा प्रश्न चर्चा करून सामंजस्याने सोडविण्यात येणार आहे.टॅक्शन पॉवर सप्लाय कंत्राटाबरोबरच प्रणालीबाबतच्या निविदा मंजूर करण्यासह यापूर्वी मेट्रो-३ची १८ हजार कोटींपेक्षा अधिक किमतीच्या बांधकामांची कंत्राटे देण्यात आली. संपूर्ण ३३.५ किमी मार्गाचे भौगोलिक सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले असून, भूगर्भ तपासणीचे काम प्रगतिपथावर आहे. मेट्रो-३च्या मार्गाच्या आसपास असलेल्या इमारतीच्या सद्य:स्थितीचे सर्वेक्षण सुरू आहे. जमिनीखालील सेवा जोखण्यासाठीचे खोदकाम प्रगतिपथावर असून, भिंती बांधण्यासाठी पायलिंगचे काम सुरू झाले आहे.मेट्रो-३चे प्रत्यक्ष बांधकाम सुरू करण्यासाठी बॅरिकेडिंग करण्यात येत आहे. रस्त्यावरील वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी सहपोलीस आयुक्तांच्या साहाय्याने तयार करण्यात आलेल्या वाहतूक आराखड्याची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. या आराखड्यानुसार गर्दीच्या वेळी वाहतूक नियमित ठेवण्यासाठी १ हजार ५०० प्रशिक्षित वाहतूक शिलेदारांची नेमणूक करण्यात येणार आहे. बांधकाम सुरू करण्यासाठी आवश्यक त्या सर्व परवानग्या मिळाल्या असून, सरकारी जमिनीच्या ९० टक्के जमीन संपादित करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)- मेट्रो-३ची अंमलबजावणी करताना २ हजार ८०७ प्रकल्पबाधितांचे पुनर्वसन कॉर्पोरेशनतर्फे करण्यात येणार आहे. यामध्ये १ हजार ८६६ रहिवासी, ७९५ व्यावसायिक आणि ३९ रहिवासी-कम-व्यावसायिक व १०७ इतर प्रकल्पबाधितांचा समावेश आहे.- मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनतर्फे आजपर्यंत ५०० प्रकल्पबाधितांना पर्यायी जागा देण्यात आली आहे. त्यांना नव्या ठिकाणी शिफ्ट करण्यात आले आहे. मेट्रो-३ मार्गावरील उर्वरित प्रकल्पबाधितांना नव्या वर्षात पर्यायी जागा देण्यात येणार आहे.काळबादेवी आणि गिरगावकरांनी उपस्थित केलेले मुद्दे विचारात घेत त्यांचे त्याच परिसरात पुनर्वसन करण्याच्या दृष्टीने आराखडा तयार केला आहे. सद्य:स्थितीमध्ये काळबादेवी आणि गिरगावमधील रहिवाशांसोबत चर्चा सुरू आहे. त्यांच्याशी चर्चा करून आराखड्याची अंमलबजावणी करण्यात येईल.- अश्विनी भिडे, व्यवस्थापकीय संचालक, मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन