शहरं
Join us  
Trending Stories
1
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...
2
Vladimir Putin High-Level Security : पुतिन यांची 'विष्ठा'ही परत नेली रशियात, अलास्काच्या दौऱ्यात लघवीसाठी होती खास सुटकेस; कारण...
3
'त्यांचा दीर्घ अनुभव देशाच्या कामी येणार', सीपी राधाकृष्णन यांच्या भेटीनंतर PM मोदींची प्रतिक्रिया
4
Maharashtra Rain: अचानक इतका पाऊस का पडतोय? अजून किती दिवस पावसाचा जोर कायम राहणार?
5
पोलीस कॉन्स्टेबलचा पत्नी-मुलावर तलवारीनं हल्ला; मग स्वत: धावत्या ट्रेनसमोर घेतली उडी, त्यानंतर...
6
CCTV देणं प्रायव्हेसी उल्लंघन कसं?; दिल्लीत पत्रकार परिषद घेत विरोधकांचा ECI वर हल्लाबोल
7
सलग ४३ व्या दिवशी 'या' शेअरला अपर सर्किट; किंमत ₹१०० पेक्षाही कमी, २ महिन्यांत केलं मालामाल
8
Aja Eakadashi 2025: श्रावणातले अजा एकादशीचे लाभदायी व्रत; का आणि कसे करावे? वाचा!
9
लेकी- सुनांवर अन्याय करणाऱ्यांना इथून पुढे...; महिलांच्या संरक्षणासाठी शिंदेंनी उचलला विडा
10
उपराष्ट्रपतीपदासाठी विरोधक तामिळनाडूचाच उमेदवार देणार; ठरल्यात जमा, बलाबल काय...
11
Crime News : पुन्हा निळ्या ड्रमचे प्रकरण आले, बायको घरमालकाच्या प्रेमात पडली; पतीला संपवले अन्...
12
आर्यन खानच्या 'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मध्ये दिसणारी अभिनेत्री कोण? सनी देओलशी आहे कनेक्शन
13
२०१४ मध्येच भाजपा शिवसेनेला हात दाखवणार होती,पण...; प्रफुल्ल पटेलांचा १० वर्षांनी गौप्यस्फोट
14
Mumbai Rain: 'गो अराऊंड'चा मेसेज आणि 9 विमानांच्या मुंबई विमानतळावर बराच वेळ घिरट्या
15
'अलास्का' इथं डोनाल्ड ट्रम्पच्या भेटीला पोहचले डुप्लिकेट पुतिन; सोशल मीडियात चर्चांना उधाण, कारण...
16
सोहम बांदेकरचं 'ठरलं तर मग'! 'या' अभिनेत्रीसोबत बांधणार लग्नगाठ? होतोय अभिनंदनाचा वर्षाव
17
Asia Cup 2025 : गिलमुळे धोक्यात होतं तिलक वर्माचं स्थान; शेवटी BCCI निवडकर्त्यांनी असा काढला तोडगा
18
गुंतवणूकदार होणार मालामाल! 'ही' ऑटोमोबाईल कंपनी देणार प्रति शेअर १०० रुपये लाभांश, तुम्हालाही संधी?
19
मोठी नाचक्की...! ऑपरेशन सिंदूरवेळी कराची बंदरातून पाकिस्तानी नौदल पळून गेलेले; कुठे लपलेले...
20
Russia-Ukraine War : एकीकडे शांतता चर्चा, दुसरीकडे बॉम्ब वर्षाव: झेलेन्स्की अमेरिकेत असताना रशियाने युक्रेनला हादरवले!

नववर्षात मेट्रो-३ चे २०% काम करणार

By admin | Updated: December 31, 2016 03:42 IST

मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने नव्या वर्षात कुलाबा-वांद्रे-सीप्झ या भुयारी मेट्रो-३चे बांधकाम २० टक्के पूर्ण करण्याचा निर्धार केला आहे. सर्व स्थानकांच्या भिंती बांधणे, टनेल बोअरिंग

मुंबई : मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने नव्या वर्षात कुलाबा-वांद्रे-सीप्झ या भुयारी मेट्रो-३चे बांधकाम २० टक्के पूर्ण करण्याचा निर्धार केला आहे. सर्व स्थानकांच्या भिंती बांधणे, टनेल बोअरिंग मशिन्सच्या मदतीने सातही टप्प्यांत खोदकाम करणे; इत्यादी कामे हाती घेतली जाणार आहेत. सर्व प्रकल्पबाधितांचे पुनर्वसन करण्याचा कॉर्पोरेशनचा मानस असून, नव्या वर्षात काळबादेवी आणि गिरगाव येथील पुनर्वसनाचा प्रश्न चर्चा करून सामंजस्याने सोडविण्यात येणार आहे.टॅक्शन पॉवर सप्लाय कंत्राटाबरोबरच प्रणालीबाबतच्या निविदा मंजूर करण्यासह यापूर्वी मेट्रो-३ची १८ हजार कोटींपेक्षा अधिक किमतीच्या बांधकामांची कंत्राटे देण्यात आली. संपूर्ण ३३.५ किमी मार्गाचे भौगोलिक सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले असून, भूगर्भ तपासणीचे काम प्रगतिपथावर आहे. मेट्रो-३च्या मार्गाच्या आसपास असलेल्या इमारतीच्या सद्य:स्थितीचे सर्वेक्षण सुरू आहे. जमिनीखालील सेवा जोखण्यासाठीचे खोदकाम प्रगतिपथावर असून, भिंती बांधण्यासाठी पायलिंगचे काम सुरू झाले आहे.मेट्रो-३चे प्रत्यक्ष बांधकाम सुरू करण्यासाठी बॅरिकेडिंग करण्यात येत आहे. रस्त्यावरील वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी सहपोलीस आयुक्तांच्या साहाय्याने तयार करण्यात आलेल्या वाहतूक आराखड्याची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. या आराखड्यानुसार गर्दीच्या वेळी वाहतूक नियमित ठेवण्यासाठी १ हजार ५०० प्रशिक्षित वाहतूक शिलेदारांची नेमणूक करण्यात येणार आहे. बांधकाम सुरू करण्यासाठी आवश्यक त्या सर्व परवानग्या मिळाल्या असून, सरकारी जमिनीच्या ९० टक्के जमीन संपादित करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)- मेट्रो-३ची अंमलबजावणी करताना २ हजार ८०७ प्रकल्पबाधितांचे पुनर्वसन कॉर्पोरेशनतर्फे करण्यात येणार आहे. यामध्ये १ हजार ८६६ रहिवासी, ७९५ व्यावसायिक आणि ३९ रहिवासी-कम-व्यावसायिक व १०७ इतर प्रकल्पबाधितांचा समावेश आहे.- मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनतर्फे आजपर्यंत ५०० प्रकल्पबाधितांना पर्यायी जागा देण्यात आली आहे. त्यांना नव्या ठिकाणी शिफ्ट करण्यात आले आहे. मेट्रो-३ मार्गावरील उर्वरित प्रकल्पबाधितांना नव्या वर्षात पर्यायी जागा देण्यात येणार आहे.काळबादेवी आणि गिरगावकरांनी उपस्थित केलेले मुद्दे विचारात घेत त्यांचे त्याच परिसरात पुनर्वसन करण्याच्या दृष्टीने आराखडा तयार केला आहे. सद्य:स्थितीमध्ये काळबादेवी आणि गिरगावमधील रहिवाशांसोबत चर्चा सुरू आहे. त्यांच्याशी चर्चा करून आराखड्याची अंमलबजावणी करण्यात येईल.- अश्विनी भिडे, व्यवस्थापकीय संचालक, मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन