शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी तेव्हा त्याच रूममध्ये होतो..."; ट्रम्प यांच्या युद्धविरामासंदर्भातील दाव्यावर एस जयशंकर यांची अमेरिकेतून पहिली प्रतिक्रिया
2
धक्कादायक...! धावत्या ट्रेनमध्ये टीसीला कपडे फाडून मारहाण! एलटीटी-हटिया एक्सप्रेसमधील घटना
3
“मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळे करायची ताकद कुणाच्या बापात नाही”; CM फडणवीसांचे ठाकरेंना उत्तर
4
शशी थरूर भाजपमध्ये प्रवेश करणार? निशिकांत दुबे यांचा मोठा खुलासा, स्पष्टच बोलले
5
डोंबिवलीचे आमदार झाले भाजपाचे नवे प्रदेशाध्यक्ष! कल्याण डोंबिवलीत यंदा महापौर कोणाचा?
6
RSS स्वयंसेवक ते BJP प्रदेशाध्यक्ष; ‘अशी’ आहे रवींद्र चव्हाण यांची राजकीय कारकीर्द
7
“शक्तिपीठ रद्द करण्याची सरकारला सुबुद्धी मिळो, पांडुरंगाला साकडे घालणार”: राजू शेट्टी
8
Ravindra Chavan BJP: रवींद्र चव्हाण भाजपाचे नवे 'कॅप्टन'! महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी बिनविरोध निवड
9
पत्नी म्हणाली 'रात्रीच्या वेळी तरी मोबाईल बाजूला ठेवा'; पतीला आला राग! पुढे त्याने जे केलं, ते ऐकून होईल संताप 
10
तो टीम इंडियाचा प्रॉब्लेम!; दुसऱ्या टेस्टआधी बेन स्टोक्सनं पंतसंदर्भातही केलं मोठं वक्तव्य
11
Bengaluru stampede: "चेंगराचेंगरीला RCBच जबाबदार"; लवादाचा निर्णय, म्हणाले- "पोलिसांकडे जादूचा दिवा नाही..."
12
बुमराह भाई इज डेफिनेटली....! गिलनं हिंट दिली की, इंग्लंडला 'गुमराह' करण्याचा डाव खेळलाय?
13
Viral Video : स्वतःच्याच लग्नात नवरा हे काय करून बसला! व्हायरल व्हिडीओ बघून नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली
14
उत्तराखंडात पावसाचे थैमान, मराठी पर्यटक अडकले; DCM शिंदे मदतीस सरसावले, फोनवरुन साधला संवाद
15
Raja Raghuwanshi : १६ लाखांचे दागिने, सिलोम, सोनमचा कट; राजा रघुवंशी हत्याप्रकरणाच्या तपासाची बदलली दिशा
16
अपूर्ण राहिलं शेफाली जरीवालाचं हे स्वप्न, पती पराग त्यागीसोबत बनवला होता प्लान
17
'२०-२५ वर्षे तरी दिल्लीत जागा नाही', योगी आदित्यनाथ यांच्याबद्दल भाजप खासदाराचे मोठे विधान
18
“CM देवेंद्र फडणवीस विकासकामे करणारी व्यक्ती”; भाजपात प्रवेश करताच कुणाल पाटलांनी केले कौतुक
19
"...तर मस्क यांना दुकान बंद करावे लागले असते!"; ईव्ही सब्सिडीसंदर्भात ट्रम्प यांची मस्क यांना थेट धमकी
20
मोठी बातमी! दोन वर्षांत ३.५ कोटी नोकऱ्या देणाऱ्या योजनेला केंद्राची मंजुरी; १ ऑगस्टपासून ELI लागू होणार

नववर्षात मेट्रो-३ चे २०% काम करणार

By admin | Updated: December 31, 2016 03:42 IST

मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने नव्या वर्षात कुलाबा-वांद्रे-सीप्झ या भुयारी मेट्रो-३चे बांधकाम २० टक्के पूर्ण करण्याचा निर्धार केला आहे. सर्व स्थानकांच्या भिंती बांधणे, टनेल बोअरिंग

मुंबई : मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने नव्या वर्षात कुलाबा-वांद्रे-सीप्झ या भुयारी मेट्रो-३चे बांधकाम २० टक्के पूर्ण करण्याचा निर्धार केला आहे. सर्व स्थानकांच्या भिंती बांधणे, टनेल बोअरिंग मशिन्सच्या मदतीने सातही टप्प्यांत खोदकाम करणे; इत्यादी कामे हाती घेतली जाणार आहेत. सर्व प्रकल्पबाधितांचे पुनर्वसन करण्याचा कॉर्पोरेशनचा मानस असून, नव्या वर्षात काळबादेवी आणि गिरगाव येथील पुनर्वसनाचा प्रश्न चर्चा करून सामंजस्याने सोडविण्यात येणार आहे.टॅक्शन पॉवर सप्लाय कंत्राटाबरोबरच प्रणालीबाबतच्या निविदा मंजूर करण्यासह यापूर्वी मेट्रो-३ची १८ हजार कोटींपेक्षा अधिक किमतीच्या बांधकामांची कंत्राटे देण्यात आली. संपूर्ण ३३.५ किमी मार्गाचे भौगोलिक सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले असून, भूगर्भ तपासणीचे काम प्रगतिपथावर आहे. मेट्रो-३च्या मार्गाच्या आसपास असलेल्या इमारतीच्या सद्य:स्थितीचे सर्वेक्षण सुरू आहे. जमिनीखालील सेवा जोखण्यासाठीचे खोदकाम प्रगतिपथावर असून, भिंती बांधण्यासाठी पायलिंगचे काम सुरू झाले आहे.मेट्रो-३चे प्रत्यक्ष बांधकाम सुरू करण्यासाठी बॅरिकेडिंग करण्यात येत आहे. रस्त्यावरील वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी सहपोलीस आयुक्तांच्या साहाय्याने तयार करण्यात आलेल्या वाहतूक आराखड्याची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. या आराखड्यानुसार गर्दीच्या वेळी वाहतूक नियमित ठेवण्यासाठी १ हजार ५०० प्रशिक्षित वाहतूक शिलेदारांची नेमणूक करण्यात येणार आहे. बांधकाम सुरू करण्यासाठी आवश्यक त्या सर्व परवानग्या मिळाल्या असून, सरकारी जमिनीच्या ९० टक्के जमीन संपादित करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)- मेट्रो-३ची अंमलबजावणी करताना २ हजार ८०७ प्रकल्पबाधितांचे पुनर्वसन कॉर्पोरेशनतर्फे करण्यात येणार आहे. यामध्ये १ हजार ८६६ रहिवासी, ७९५ व्यावसायिक आणि ३९ रहिवासी-कम-व्यावसायिक व १०७ इतर प्रकल्पबाधितांचा समावेश आहे.- मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनतर्फे आजपर्यंत ५०० प्रकल्पबाधितांना पर्यायी जागा देण्यात आली आहे. त्यांना नव्या ठिकाणी शिफ्ट करण्यात आले आहे. मेट्रो-३ मार्गावरील उर्वरित प्रकल्पबाधितांना नव्या वर्षात पर्यायी जागा देण्यात येणार आहे.काळबादेवी आणि गिरगावकरांनी उपस्थित केलेले मुद्दे विचारात घेत त्यांचे त्याच परिसरात पुनर्वसन करण्याच्या दृष्टीने आराखडा तयार केला आहे. सद्य:स्थितीमध्ये काळबादेवी आणि गिरगावमधील रहिवाशांसोबत चर्चा सुरू आहे. त्यांच्याशी चर्चा करून आराखड्याची अंमलबजावणी करण्यात येईल.- अश्विनी भिडे, व्यवस्थापकीय संचालक, मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन