शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

१९ लाख शेतकऱ्यांच्या पदरी निराशा

By admin | Updated: January 5, 2015 04:42 IST

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना शासन मदतीची घोषणा ११ डिसेंबरला करण्यात आली. तब्बल २५ दिवसांचा कालाावधी उलटला असताना अद्याप

गजानन मोहोड, अमरावतीदुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना शासन मदतीची घोषणा ११ डिसेंबरला करण्यात आली. तब्बल २५ दिवसांचा कालाावधी उलटला असताना अद्याप शासन निर्णय निर्गमित झाले नाहीत. या पार्श्वभूमीवर अमरावती विभागातील १९ लाख ९४ हजार ६७२ दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या पदरी केव्हा व किती शासकीय मदत पडणार, याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. दुष्काळाची प्रचलित निकषाची शासनाची मदतदेखील गुलदस्त्यात आहे, हे विशेष.खरीप २०१४ च्या हंगामात जून महिन्यापासून दीड महिना पावसाने दडी मारली. त्यामुळे मूग व उडीदसारखी ६० दिवसांचा कालावधी असणारी पिके बाद झालीत. ‘कॅश क्रॉप’ म्हणून ओळखले जाणारे सोयाबिनचे देखील निकृष्ट बियाणे, दुबार, तिबार पेरणी, रोगांचा प्रादुर्भाव, पीक फुलोऱ्यावर व शेंगा भरण्याच्या अवस्थेत पाऊस नसल्याने शेंगा पोचट राहिल्याने सरासरी ६० ते ८० टक्के उत्पन्न कमी झाले. क्विंटलऐवजी किलोची झडती आली. नापिकीच्या सत्रात शेतकरी सतत पिचला जात आहे. शासनाने ११ डिसेंबरला ३ हजार ९२५ कोटी रूपयांचे पॅकेज जाहीर केले. याबाबतचा शासन निर्णय न झाल्याने प्रशासकीय यंत्रणा ठप्प आहे. शेतकरी शासकीय मदतीच्या प्रतिक्षेत असताना महसूल यंत्रणेच्या याद्या अद्याप तयार करण्याचेही काम सुरू झालेले नाही.विभागाची पैसेवारी ४३ पैसे जाहीर झाली. विभागातील ७ हजार ३५६ गावांमधील ७ हजार २४१ गावात दुष्काळस्थिती घोषित करण्यात आली. यामध्ये अल्प, अत्यल्प व बहुभुधारक असलेल्या १९ लाख ९४ हजार ६७२ शेतकऱ्यांच्या ३३ लाख ८० हजार ४११ हेक्टरमधील खरिपाच्या पिकांचा समावेश आहे. अवकाळी पाऊस आणि दुष्काळी परिस्थितीत सरकारी मदतीच्या प्रतीक्षेत असणाऱ्या शेतकऱ्याच्या पदरात प्रत्यक्षात किती आणि केव्हा मदत पडणार? यावर प्रश्नचिन्ह लागले आहे. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदतीसाठी जाहीर झालेली शासकीय मदत देखील गुलदस्त्यात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नैराश्याची भावना आहे. रबीचा हंगाम दोन महिने उशीरा सुरू झाला. जमिनीत आर्द्रता नाही त्यामुळे हरभऱ्याची उगवण कमी झाली. विभागातील ५० हजारांवर हेक्टर क्षेत्र नापेर आहे. या पार्श्वभूमिवर शासन मदतीचा लाभ केव्हा मिळणार या प्रतीक्षेत शेतकरी आहेत.