शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
2
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
3
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
4
पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
5
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
6
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
7
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
8
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
9
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
10
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
11
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
12
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
13
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
14
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
15
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
16
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
17
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
18
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
19
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
20
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांसाठी १.९५ कोटी चौरस फूट भूखंड राखीव

By admin | Updated: December 29, 2015 02:11 IST

मुंबईसह राज्यातील पोलिसांच्या घरांसाठी जागेचा प्रश्न असल्याचे राज्यकर्त्यांकडून सांगितले जात असताना पोलीस खात्याकडे राज्यात १७ ठिकाणी १.९५ कोटी चौरस फूट जागा राखीव

मुंबई : मुंबईसह राज्यातील पोलिसांच्या घरांसाठी जागेचा प्रश्न असल्याचे राज्यकर्त्यांकडून सांगितले जात असताना पोलीस खात्याकडे राज्यात १७ ठिकाणी १.९५ कोटी चौरस फूट जागा राखीव ठेवण्यात आली असल्याची माहिती समोर आली आहे. दस्तुरखुद्द महाराष्ट्र राज्य पोलीस गृहनिर्माण व कल्याण महामंडळाने माहिती अधिकार कायद्यांतर्गत ही माहिती दिली आहे. या भूखंडांचे व्यवस्थित नियोजन केल्यास सर्व पोलिसांना घराची उपलब्धता होणे सहज शक्य आहे. पोलिसांच्या घरांचा प्रश्न वारंवार चर्चिला जात आहे, त्या पार्श्वभूमीवर माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांनी पोलीस हाउसिंग बोर्डकडे उपलब्ध जागेबाबत माहिती विचारली होती. विभागाचे जन माहिती अधिकारी सी.जे. सावंत यांनी मंडळाला शासनाकडून मिळालेल्या भागभांडवल भूखंडाची यादी दिली आहे. त्यामध्ये एकूण १७ ठिकाणी २१ लाख ५९ हजार ३३४ चौरस यार्ड म्हणजे १ कोटी ९४ लाख ३४ हजार ६ चौरस फूट भूखंड असल्याचा उल्लेख आहे. त्यामध्ये मुंबईतील वरळी, घाटकोपर व मरोळ तर पुणे येथील विक्रांत वाडी, येरवडा जेल, एसआरपीएफ जीआर १ व एसआरपीएफ जीआर २ या ठिकाणी भूखंड आहे. नागपूर, जालना, सातारा, अमरावती, चंद्रपूर, जळगाव, नाशिक रोड देवलाली आणि मालेगाव नाशिक येथेही भूखंड असल्याचे नमूद करण्यात आले आहे. मुंबई, पुणे, नागपूर, जालना, सातारा, अमरावती, चंद्रपूर, जळगाव आणि नाशिक येथील भूखंड अतिक्रमणमुक्त करून पोलिसांचा घरांचा प्रश्न सोडविला जाईल. सरकारने ठरविले तर सर्व पोलिसांना हक्काची घरे मिळणे शक्य आहे, असे गलगली यांनी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे. वरळीतील १६ हजार चौरस यार्ड भूखंडाचा ताबा अद्याप शासनाकडेचवरळी येथील सर्व्हे नंबर ७५४ पासून ८१८ मधील प्लाट नंबर २९ पासून ९४ असे एकूण ७७ भूखंड गृहविभागाने १४ फेबु्रवारी १९७४ रोजीच्या ठरावानुसार १ लाख ६० हजार ८५३ वर्ग यार्ड जमीन दिली होती. त्यापैकी १६ हजार ७९७ वर्ग यार्ड जमीन परत घेतली आहे. त्याचा ताबा अद्याप परत मिळालेला नाही. उर्वरित जागेवर कम्पाउंड वॉल आहे. सर्व भूखंड गृह विभागाने १९७४ ते १९८३ या कालावधीत वितरित केलेले असून, या भूखंडावर विकास योग्य आदर्श जमीन उपलब्ध नसल्याचे सांगण्यात आले.