शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
3
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
4
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
5
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
6
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
7
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
8
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
9
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
10
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
11
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
12
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
13
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
14
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
15
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
16
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
17
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
18
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
19
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
20
Asha Bhosle: "...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
Daily Top 2Weekly Top 5

निवृत्तीच्या तोंडावर १७ महिला पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या

By admin | Updated: October 27, 2016 16:24 IST

आयुष्यातील पोलीस सेवेची २० ते २५ वर्षे मुंबई शहरात गेली असताना आणि आता ऐन निवृत्तीच्या वाटेवर असताना मुंबईतील डझनावर महिला पोलीस अधिकाऱ्यांना

ऑनलाइन लोकमतयवतमाळ, दि. 27 : आयुष्यातील पोलीस सेवेची २० ते २५ वर्षे मुंबई शहरात गेली असताना आणि आता ऐन निवृत्तीच्या वाटेवर असताना मुंबईतील डझनावर महिला पोलीस अधिकाऱ्यांना थेट घरापासून कोसोदूर ग्रामीण भागात पाठविण्यात आले आहे. पदोन्नतीच्या आडोश्याने दूरवर झालेल्या या बदल्यांविरोधात महिला अधिकाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी पहायला मिळत आहे. मुंबई महानगररातील पोलीस अधिकारी ग्रामीण महाराष्ट्रात काम करताना चाचपडतो. कारण या दोनही भागातील समस्या वेगवेगळ्या आहेत.

अशीच अडचण ग्रामीण महाराष्ट्रातील पोलीस अधिकाऱ्यांची मुंबई शहरात होते. परंतु गेल्या काही वर्षांपासून मुंबईतील अधिकाऱ्यांना बाहेर अर्थात ग्रामीण महाराष्ट्रात सक्तीने पाठविले जाते. तारुण्यात असलेले पोलीस अधिकारी अनेकदा आनंदाने ग्रामीण भागात जातात. परंतु शासनाने आता चक्क सेवानिवृत्तीवर आलेल्या आणि त्यातही महिला अधिकाऱ्यांना मुंबईपासून ८०० ते हजार किलोमीटरवर नियुक्त्या दिल्या आहेत.

शासनाने १ आॅक्टोबर रोजी ११० पोलीस निरीक्षकांना बढती देऊन उपअधीक्षक बनविले. या यादीतील १६ ते १७ महिला अधिकाऱ्यांना नागपूर, अकोला, हिंगोली, औरंगाबाद, पुणे, नाशिक, जालना, बीड, अमरावती, उस्मानाबाद, ठाणे या भागात नेमण्यात आले आहे. यातील बहुतांश महिलांच्या सेवानिवृत्तीसाठी अवघी दोन ते तीन वर्ष शिल्लक आहेत. कुणाला आजार आहेत तर कुणाला कौटुंबिक जबाबदारी. निवृत्तीच्या वाटेवर असताना घरापासून दूर नियुक्ती झाल्याने या महिलांमध्ये महासंचालक कार्यालयाच्या कारभाराबाबत रोष पहायला मिळतो आहे. यातील बहुतांश महिलांची नियुक्ती ही गृह पोलीस उपअधीक्षक पदावर झाली आहे.

मुंबईत जातीय दंगली घडत असताना आणि गुन्हेगारी टोळ्यांमध्ये सर्रास खुलेआम चकमक होत असताना आम्ही जीव धोक्यात घालून मुंबईत नोकरी केली आणि आता कौटुंबिक जबाबदाऱ्या असताना महासंचालक कार्यालयाने आम्हाला घरापासून कोसोदूर नियुक्त्या दिल्याने अनेक अडचणी निर्माण झाल्याची भावना महिला पोलीस अधिकाऱ्यांच्या वर्तुळातून ऐकायला मिळत आहे. फौजदार, सहायक निरीक्षक असताना या नियुक्त्या झाल्या असत्या तर आम्ही आनंदाने कितीही दूरवर रुजू झालो असतो. परंतु सेवाकाळ संपण्याच्या स्थितीत या नियुक्त्या झाल्याने अनेक समस्या निर्माण झाल्याचे त्यांनी सांगितले