शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
3
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
4
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज
5
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
6
Aamir Kaleem World Record: आमिर कलीमची कमाल! T 20I मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
7
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
8
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
9
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
10
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
11
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
12
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
13
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
14
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
15
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
16
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
17
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
18
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
19
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
20
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...

निवृत्तीच्या तोंडावर १७ महिला पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या

By admin | Updated: October 27, 2016 16:24 IST

आयुष्यातील पोलीस सेवेची २० ते २५ वर्षे मुंबई शहरात गेली असताना आणि आता ऐन निवृत्तीच्या वाटेवर असताना मुंबईतील डझनावर महिला पोलीस अधिकाऱ्यांना

ऑनलाइन लोकमतयवतमाळ, दि. 27 : आयुष्यातील पोलीस सेवेची २० ते २५ वर्षे मुंबई शहरात गेली असताना आणि आता ऐन निवृत्तीच्या वाटेवर असताना मुंबईतील डझनावर महिला पोलीस अधिकाऱ्यांना थेट घरापासून कोसोदूर ग्रामीण भागात पाठविण्यात आले आहे. पदोन्नतीच्या आडोश्याने दूरवर झालेल्या या बदल्यांविरोधात महिला अधिकाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी पहायला मिळत आहे. मुंबई महानगररातील पोलीस अधिकारी ग्रामीण महाराष्ट्रात काम करताना चाचपडतो. कारण या दोनही भागातील समस्या वेगवेगळ्या आहेत.

अशीच अडचण ग्रामीण महाराष्ट्रातील पोलीस अधिकाऱ्यांची मुंबई शहरात होते. परंतु गेल्या काही वर्षांपासून मुंबईतील अधिकाऱ्यांना बाहेर अर्थात ग्रामीण महाराष्ट्रात सक्तीने पाठविले जाते. तारुण्यात असलेले पोलीस अधिकारी अनेकदा आनंदाने ग्रामीण भागात जातात. परंतु शासनाने आता चक्क सेवानिवृत्तीवर आलेल्या आणि त्यातही महिला अधिकाऱ्यांना मुंबईपासून ८०० ते हजार किलोमीटरवर नियुक्त्या दिल्या आहेत.

शासनाने १ आॅक्टोबर रोजी ११० पोलीस निरीक्षकांना बढती देऊन उपअधीक्षक बनविले. या यादीतील १६ ते १७ महिला अधिकाऱ्यांना नागपूर, अकोला, हिंगोली, औरंगाबाद, पुणे, नाशिक, जालना, बीड, अमरावती, उस्मानाबाद, ठाणे या भागात नेमण्यात आले आहे. यातील बहुतांश महिलांच्या सेवानिवृत्तीसाठी अवघी दोन ते तीन वर्ष शिल्लक आहेत. कुणाला आजार आहेत तर कुणाला कौटुंबिक जबाबदारी. निवृत्तीच्या वाटेवर असताना घरापासून दूर नियुक्ती झाल्याने या महिलांमध्ये महासंचालक कार्यालयाच्या कारभाराबाबत रोष पहायला मिळतो आहे. यातील बहुतांश महिलांची नियुक्ती ही गृह पोलीस उपअधीक्षक पदावर झाली आहे.

मुंबईत जातीय दंगली घडत असताना आणि गुन्हेगारी टोळ्यांमध्ये सर्रास खुलेआम चकमक होत असताना आम्ही जीव धोक्यात घालून मुंबईत नोकरी केली आणि आता कौटुंबिक जबाबदाऱ्या असताना महासंचालक कार्यालयाने आम्हाला घरापासून कोसोदूर नियुक्त्या दिल्याने अनेक अडचणी निर्माण झाल्याची भावना महिला पोलीस अधिकाऱ्यांच्या वर्तुळातून ऐकायला मिळत आहे. फौजदार, सहायक निरीक्षक असताना या नियुक्त्या झाल्या असत्या तर आम्ही आनंदाने कितीही दूरवर रुजू झालो असतो. परंतु सेवाकाळ संपण्याच्या स्थितीत या नियुक्त्या झाल्याने अनेक समस्या निर्माण झाल्याचे त्यांनी सांगितले