शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
2
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
3
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
4
मोहम्मद युनूस यांचा मोठा निर्णय; शेख हसीन यांच्या ‘अवामी लीग’वर आणली बंदी
5
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
6
"पाकिस्तानी लोक 'ऑफिशियल भिकमंगे'..."; असदुद्दीन ओवेसींनी पाकड्यांची पार लक्तरं काढली!
7
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
8
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
9
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
10
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
11
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
12
पाकिस्तानसोबतच्या युद्धविरामावर असदुद्दीन ओवेसींनी उपस्थित केलं प्रश्नचिन्ह, सरकारला विचारले चार सवाल  
13
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
14
"काँग्रेस पक्षाचा आणि देशाचा डीएनए एकच, काँग्रेस कधीही न संपणारा पक्ष’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास   
15
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
16
पुढे धोका आहे! रात्री मोबाईलचा जास्त वापर करणं 'डेंजर'; शरीरातील 'हा' हार्मोन होतो कमी अन्...
17
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
18
Operation Sindoor Live Updates: दिल्ली विमानतळाकडून प्रवाशांना मार्गदर्शक सूचना जारी
19
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
20
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video

मराठवाडयातील चार जिल्ह्यांत १६५ जणांना डेंग्यूची लागण !

By admin | Updated: September 22, 2016 18:20 IST

लातूर जिल्ह्यासह उस्मानाबाद, बीड आणि नांदेड या जिल्ह्यांत डेंग्यूने थैमान घातले आहे. त्यामुळे १६५ जणांना डेंग्यूची लागण झाल्याचे रक्त नमुन्यांच्या तपासणीअंती अहवाल आल्यानंतर स्पष्ट झाले

सितम सोनवणे,

लातूर, दि. २२ : लातूर जिल्ह्यासह उस्मानाबाद, बीड आणि नांदेड या जिल्ह्यांत डेंग्यूने थैमान घातले आहे. त्यामुळे १६५ जणांना डेंग्यूची लागण झाल्याचे रक्त नमुन्यांच्या तपासणीअंती अहवाल आल्यानंतर स्पष्ट झाले आहे. या डेंग्यूमुळे बीड जिल्ह्यात दोघांचा तर नांदेड जिल्ह्यात एकाचा अशा एकूण तिघांचा मृत्यू झाला आहे. अन्य रुग्णांवर जिल्हा रुग्णालयात तसेच खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

लातूर जिल्ह्यासह उस्मानाबाद, बीड आणि नांदेड जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून झालेल्या पावसामुळे डासोत्पत्तीचे प्रमाण वाढले असून, परिणामी, ताप, खोकला, सर्दीचे रुग्ण वाढले असून, रुग्णांना थंडी वाजून ताप येणे, ताप सतत एक दिवसाआड येणे, नंतर घाम येऊन अंग थंड पडणे, डोके खूप दुखणे, उलट्या होणे आदी प्रकार घडत आहेत. तर काही रुग्णांमध्ये तीव्र स्वरुपाचा ताप असून, डोकेदुखी, डोळ्यांच्या मागे दुखणे, सांधेदुखी, अंगावर पुरळ येणे, उलट्या होणे आदी बाबी होत असल्याने रुग्णांवर शहरातील सर्वोपचार रुग्णालयासह प्राथमिक व जिल्हा रुग्णालयात उपचार केले जात आहेत.

आरोग्य विभागाने १ जानेवारीपासून अशा रुग्णांचे रक्तनमुने तपासणीसाठी घेतले असून, मागील दोन महिन्यांत या रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. या रुग्णसंख्येत लातूर जिल्ह्यातील ६४ रुग्णांचे रक्तनमुने तपासले असता त्यातील २३ रुग्णांना डेंग्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे. तर लातूर महापालिका कार्यक्षेत्रातील ३७ जणांचे असे एकूण रक्तनमुने तपासले असता त्यातील दहा जणांना डेंग्यू झाल्याचे निदर्शनास आले आहे. अशा एकूण १०७ जणांचे रक्तनमुने तपासले असता यातील ३३ जणांना डेंग्यूची लागण झाली आहे.

उस्मानाबाद जिल्ह्यातील २१० जणांचे रक्तनमुने तपासले असता त्यातील दोघांना डेंग्यूची लागण झाल्याचे निदर्शनास आले. तर बीड जिल्ह्यातील ४५५ जणांचे रक्तनमुने तपासले असता त्यातील २८ जणांना डेंग्यूची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले. तर नांदेड जिल्ह्यातील २९३ जणांचे रक्तनमुने तपासले असता त्यातील ५५ जणांना डेंग्यूची लागण झाली आहे. तर नांदेड महापालिका कार्यक्षेत्राअंतर्गत १५६ रुग्णांची तपासणी केली असता यातील ४७ जणांना डेंग्यूची लागण झाल्याचा अहवाल आरोग्य उपसंचालक कार्यालयाकडे प्राप्त झाला आहे.

चार जिल्ह्यांतील रुग्णांची तपासणी...डेंग्यूच्या तपासण्या बीड जिल्हा रुग्णालय तसेच नांदेड जिल्हा रुग्णालयात होत असून, चारही जिल्ह्यांतील एकूण १२१५ रक्त नमुन्यांची तपासणी केली असता त्यातील १६५ जणांना डेंग्यूची लागण झाल्याचा अहवाल प्रयोगशाळेने दिला असल्याचे आरोग्य उपसंचालक व्ही.एम. कुलकर्णी यांनी ह्यलोकमतह्णशी बोलताना सांगितले