शहरं
Join us  
Trending Stories
1
Operation Sindoor 2.0: पाकिस्तानला सहजासहजी सोडणार नाही भारत, आणखी काय-काय घडणार?
2
Thank You Rohit Sharma! हिटमॅनच्या कसोटी निवृत्तीनंतर कोण काय म्हणाले? वाचा सविस्तर
3
ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचे अवसान गळाले, आता म्हणतात, "आम्ही संयम पाळू, तणाव आणखी वाढता नये’’  
4
मुरिदकेमध्ये बड्या दहशतवाद्याचा खात्मा? पाकिस्तानी सैन्यातील अधिकाऱ्यांची अंत्ययात्रेला हजेरी   
5
Mumbai Local: मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे मुंबई लोकल सेवा विस्कळीत, प्रवाशांची गैरसोय
6
'ऑपरेशन सिंदूर'बद्दल पंतप्रधान मोदींनी कालच दिले होते संकेत? 'त्या' वाक्यावरून रंगलीये चर्चा
7
Rohit Sharma: रोहित शर्माची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा
8
Operation Sindoor Live Updates: भारतीय सैन्यदलांनी राबवलेल्या ऑपरेशन सिंदूरच्या यशानंतर श्रीनगरमधील लाल चौकातही जल्लोष
9
"मारुतीरायाच्या आदर्शांचं पालन केलं, आम्ही त्यांनाच मारलं ज्यांनी…’’, राजनाथ सिंह यांचं मोठं विधान  
10
"दहशतवाद्यांना माफी नाही"; 'ऑपरेशन सिंदूर'वर इंग्लंडचे माजी PM ऋषी सुनक यांची रोखठोक प्रतिक्रिया
11
अजिंक्य रहाणेचं अर्धशतक हुकलं; पण IPL मध्ये ५ हजार धावांचा पल्ला गाठत मारली खास क्लबमध्ये एन्ट्री
12
Operation Sindoor : "कलमाबद्दल विचारणाऱ्यांना भारतीय सैन्याने महाभारत सुनावलं, आपल्या शांत झोपेमागे..."
13
भारताच्या कारवाईने पाकिस्तानचा तीळपापड, शाहबाज शरीफ बैठका घेत सुटले; म्हणाले, 'आम्हीही उत्तर..."
14
हाफिज सईद, मसूद अझहर, सय्यद सलाउद्दीन..., भारताच्या एअर स्ट्राईकमध्ये दहशतवाद्यांच्या म्होरक्यांचं झालं एवढं नुकसान
15
'सैन्याच्या शौर्याला सलाम, आम्ही सरकारसोबत उभे आहोत'; 'ऑपरेशन सिंदूर'वर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया
16
लादेन पुरवायचा निधी, कसाब-हेडलीने घेतलेले प्रशिक्षण..; भारताने 'ते' मरकज केले जमीनदोस्त
17
Operation Sindoor : "मुलाच्या मृत्यूचा बदला घेतला"; पर्यटकांसाठी जीव धोक्यात घातलेल्या आदिलच्या वडिलांची प्रतिक्रिया
18
ऑपरेशन सिंदूर: शरद पवारांनी केला पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन; म्हणाले, “या कठीण काळात...”
19
'ऑपरेशन सिंदूर'मुळे IPL 2025 स्पर्धेच्या नियोजनात काय बदल होणार? BCCI ने दिलं उत्तर
20
operation sindoor video: जिथे रचले गेले, भारतात रक्ताचा सडा पाडणारे कट; ती ठिकाणं अशी उडवली, बघा व्हिडीओ

स्टरलाइट गुंतवणार १६ हजार कोटी

By admin | Updated: November 14, 2015 03:34 IST

औरंगाबादजवळील वाळुंज येथील आपल्या प्रकल्पात पुढील पाच वर्षांत १६ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याचा मानस स्टरलाइट उद्योग समूहाचे अध्यक्ष अनिल

मुंबई : औरंगाबादजवळील वाळुंज येथील आपल्या प्रकल्पात पुढील पाच वर्षांत १६ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याचा मानस स्टरलाइट उद्योग समूहाचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांनी लंडनमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी झालेल्या चर्चेत व्यक्त केला. मुख्यमंत्र्यांनी अग्रवाल आणि वेदांत समूहाचे मुख्य कार्यकारी अधिकारी टॉम अल्बानीज यांच्याशीही चर्चा केली. वाळुंजमधील प्रकल्पात पुढील पाच वर्षांत एलसीडी पॅनेल फॅब प्रोजेक्टमध्ये १६ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याचे सूतोवाच अग्रवाल यांनी यावेळी केले. राज्यात त्याची उभारणी झाल्यास तो देशातील पहिला सेमीकंडक्टर फॅब निर्मिती प्रकल्प असेल.स्मार्ट रोजगाराचे उद्दिष्टकेवळ वाढते नागरीकरण व त्याचे प्रभावी नियोजन हे स्मार्ट शहरांच्या निर्मितीमागचे उद्दिष्ट नसून, सामान्यांना अधिकाधिक कार्यक्षम सेवा मिळाव्यात तसेच पायाभूत सुविधांच्या विकासातून रोजगारनिर्मिती व्हावी, हे या अभियानामागचे प्रमुख ध्येय असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी लंडन येथे आयोजित एका परिषदेत सांगितले. प्रबोधन लीडर्स कॉन्क्लेव्ह २०१५ या परिषदेत मुख्यमंत्र्यांची विशेष उपस्थिती होती. भारत आणि ब्रिटनमधील अनेक प्रमुख उद्योगांचे मुख्य कार्यकारी अधिकारी या परिषदेस उपस्थित होते. स्मार्ट सिटी, शहरी विकास, खासगी भागीदारी, नवीन तंत्रज्ञान आणि महापौरांचे अधिकार यावर व्यापक प्रकाश टाकून मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, सेवांच्या अंमलबजावणीतील त्रुटी रोखण्यासाठी आपल्याला अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करावा लागेल. वीज आणि पाणी यासारख्या सुविधा देताना त्याचा महत्तम उपयोग कसा होईल, याचीही काळजी घ्यावी लागेल. पाण्याचा प्रत्येक थेंब आणि प्रत्येक युनिट वीज वाचिवण्यासाठी किंवा त्याची नोंद होण्यासाठी त्या सेवांना स्मार्ट ग्रीडमध्ये टाकावे लागेल. यामुळे आपोआपच त्याच्या किमती कमी होतील, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.स्मार्ट सिटीजच्या प्रकल्पात केंद्र सरकार मोठी गुंतवणूक करीत आहे. पण खासगी गुंतवणुकीलाही पुरेसा वाव आहे. जनतेसाठीच्या अनेक सोयी खाजगी गुंतवणुकीतून पूर्ण करता येऊ शकतील. महापौरांकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा करताना त्यांना व्यापक अधिकार प्रदान करणे आवश्यक असून, आपले सरकार त्याही दृष्टीने पावले टाकत असल्याचीही ग्वाही त्यांनी यावेळी दिली. (विशेष प्रतिनिधी)