शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
2
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
3
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
4
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
5
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
6
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
7
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
8
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
9
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
10
Shreyas Iyer : बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
11
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
12
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
13
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
14
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
15
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
16
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
17
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
18
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
19
Nashik House Collapses: नाशकात दुमजली घर कोसळलं, आठ महिलांसह नऊ जण जखमी
20
भारताच्या सीमेवर 'चिनी' पकड मजबूत होतेय? जिनपिंग यांनी तिबेटला दिले 'हे' नवे निर्देश!

पश्‍चिम विदर्भातील १४ हजार शेतकर्‍यांची २३ कोटींची वीज देयके माफ

By admin | Updated: June 15, 2014 22:23 IST

पश्‍चिम विदर्भातील १४ हजार ३८0 शेतकर्‍यांची, २३ कोटी ६९ लाख रुपयांची वीज देयके माफ झालीे आहेत.

अकोला : गतवर्षी अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे नुकसान झालेल्या, पश्‍चिम विदर्भातील १४ हजार ३८0 शेतकर्‍यांची, २३ कोटी ६९ लाख रुपयांची वीज देयके माफ झालीे आहेत. गतवर्षी अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे शेतकर्‍यांचे प्रचंड नुकसान झाले. नुकसान झालेल्या शेतकर्‍यांचीे जानेवारी ते जून या सहा महिन्यातील कृषी पंपांची वीज देयके माफ करण्याची घोषणा शासनाने केली होती. त्यानुसार पहिल्या टप्प्यात जानेवारी ते मार्च या तीन महिन्यांची देयके माफ करण्यात आली आहेत.गतवर्षी ओल्या दुष्काळाचा सामना कराव्या लागणार्‍या अमरावती विभागातील शेतकर्‍यांना रब्बी हंगामात अवकाळी पावसाचा फटका बसला. गारपीट व वादळी पावसामुळे लाखो हेक्टरवरील पिके व फळबागांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला होता. अशातच महावितरणने देयके थकल्यामुळे विद्युत पुरवठा तोडण्याचा सपाटा लावला होता. त्यामुळे अनेक शेतकरी पीक वाचवू शकले नाहीत. अशा शेतकर्‍यांना आधार देण्यासाठी, शासनाने जानेवारी ते जून २0१४ पर्यंत सहा महिन्यांची वीज देयके माफ करण्याची घोषणा केली होती. त्यानुसार शासनाने महसूल विभागाच्या अधिकार्‍यांकडून नुकसानग्रस्त शेतकर्‍यांच्या याद्या मागविल्या होत्या.याद्या प्राप्त झाल्यानंतर, जानेवारी ते मार्च या तीन महिन्यांची वीज देयके माफ करण्यात आली. राज्यात एकूण ५ लाख ८७ हजार १४५ शेतकर्‍यांची ९२ कोटी ४९ लाख ४१ हजार रुपयांची वीज देयके माफ करण्यात आली आहेत. त्यामध्ये अमरावती परिमंडळात १४ हजार ३८0 शेतकर्‍यांचा समावेश आहे. एप्रिल ते जून या उर्वरित तीन महिन्यांची देयके पुढील टप्प्यात माफ करण्यात येणार आहेत.