शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Railway Accident: ठाण्याजवळ रेल्वे दुर्घटना! धावत्या ट्रेनमधून ट्रॅकवर पडले प्रवासी, पाच जणांचा मृत्यू; बचावकार्य सुरू
2
'आम्ही कोणत्याही पक्षाशी...' ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेवर आदित्य ठाकरे स्पष्टच बोलले!
3
इकडे पोलिस मेघालय-मध्य प्रदेशात शोधत राहिली; तिकडे 'बेवफा' सोनम युपीत सापडली...
4
Vat Purnima 2025: वडाची पूजा झाल्यावर 'हा' श्लोक म्हणायला विसरू नका, तरच पूर्ण होईल व्रत!
5
भारतात पहिल्यांदाच MCX नं केलं असं काम की विक्रमी उच्चांकी स्तरावर पोहोचले शेअर्स, जाणून घ्या
6
"आमची मुलगी असं का करेल? असं करायचं असतं, तर ती..."; सोनमच्या वडिलांची पहिली प्रतिक्रिया काय?
7
"गेल्या १० वर्षांपासून मी मानसोपचार...", अमृता सुभाषने केला खुलासा; कारणही सांगितलं
8
अनिल अंबानींची कंपनी करणार ₹५००० कोटींची गुंतवणूक; संरक्षण क्षेत्रात इतिहास रचण्यास तयार
9
७ वर्षांत एफडीआयमध्ये महाराष्ट्र टॉप, परदेशातील सर्वाधिक गुंतवणूक राज्यात; पायाभूत सुविधांतील सुधारणा ठरतेय मोठ्या फायद्याची
10
आऊट देताच महिला अंपायरवर भडकला अश्निन, रागाच्या भरात पॅडवर मारली बॅट!
11
हनिमूनसाठी नाही तर कायमचे संपवायला घेऊन गेली होती सोनम; पतीच्या हत्येप्रकरणी अखेर अटक
12
Sonam Raghuwanshi: राजा रघुवंशीची हत्या करण्यासाठी सोनमने घेतली तिघांची मदत; दोघांना अटक, एक फरार
13
"भ्रष्टाचार संपवायचा असेल, तर 500 रुपयांची नोट बंद केली पाहिजे"; मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांचे विधान चर्चेत
14
कुटुंबासोबत साजरी केली ईद, अचानक रुग्णालयात दाखल झाली 'बिग बॉस' विजेती अभिनेत्री
15
Bank Of Baroda, HDFC Bank नं ग्राहकांना दिली खुशखबर; कर्जाच्या व्याजदरात केली कपात, पाहा नवे दर
16
रणबीर कपूर-आलियाचा नवा आलिशान बंगला तयार, सोशल मीडियावर दिसली पहिली झलक
17
५ वर्षांत थेट ५ लाखांचा फायदा! गुंतवणूकीसाठी एकदम बेस्ट आहे पोस्टाची ‘ही’ स्कीम
18
मान्सून एक्स्प्रेसला ‘बॅड पॅच’; १३ जूनपासून पुन्हा धो-धो..., शेतकरी सक्रिय मोसमी पावसाच्या प्रतीक्षेत
19
सिनेसृष्टीतील लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने केलं थाटामाटात लग्न, आदिनाथ कोठारेची खास उपस्थिती

‘बाभळी’चे १४ दरवाजे उघडले

By admin | Updated: July 2, 2016 04:31 IST

तालुक्यातील बाभळी बंधाऱ्याचे १४ दरवाजे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार शुक्रवारी त्रिस्तरीय समितीच्या उपस्थितीत उघडण्यात आले़

धर्माबाद (जि. नांदेड) : तालुक्यातील बाभळी बंधाऱ्याचे १४ दरवाजे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार शुक्रवारी त्रिस्तरीय समितीच्या उपस्थितीत उघडण्यात आले़ दुष्काळ परिस्थिीत संघर्षाने इसापूर धरणाचे सोडलेले पाणी व पावसाने जमा झालेले ०़३ टीएमसी पाणी तेलंगणाकडे प्रवाहित झाले़त्रिस्तरीय समितीत केंद्राचे अभियंता श्रीनिवासराव, तेलंगणाचे अभियंता रामाराव व नांदेड बंधारा विभाग उत्तरचे कार्यकारी अभियंता एम़ टी़ लव्हराळे आदींच्या उपस्थितीत सकाळी साडेअकराला पहिले गेट उघडण्यात आले़ त्यानंतर दर-पंधरा मिनिटाच्या अंतराने एक याप्रमाणे सर्व १४ गेट उघडण्यात आले़बाभळी बंधारा तेलंगणा व महाराष्ट्र या दोन राज्यात संघर्ष होवून न्यायालयात गेला होता़ त्यावर सर्वोच्च न्यायालयाने बाभळी बंधाऱ्याचे दरवाजे २८ आॅक्टोबरनंतर बंद करावेत व १ जुलै रोजी उघडण्यात यावेत़ तसेच १ मार्च रोजी ०़६ टीएमसी पाणी तेलंगणात सोडावे असा निर्णय दिला होता़ या निर्णयानुसार १ जुलै रोजी बाभळी बंधाऱ्याचे दरवाजे उघडले़ शेजारील राज्यालाही पाणी मिळावे परंतु पाणी सोडण्याच्या तारखेत बदल करण्यात यावे, या मागणीसाठी बाभळी बंधारा कृती समिती सर्वोच्च न्यायालयात पुनर्याचिका दाखल करणार असल्याचे कृती समितीचे डॉ़ बालाजी कोंपलवार यांनी सांगितले. (वार्ताहर)