शहरं
Join us  
Trending Stories
1
“विठ्ठला...! सरकारला कर्जमाफी देण्याची सद्बुद्धी दे...”; आषाढी एकादशीला बच्चू कडूंची पोस्ट
2
'देशात गरीब वाढत चाललेत आणि काही श्रीमंताच्या हातात संपत्ती चाललीये'; नितीन गडकरींनी व्यक्त केली चिंता
3
2028 च्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत उतरणार 'America Party'? इलॉन मस्क यांनी वेगळीच हिंट दिली!
4
संपत्तीवरून वाद झाला, काकीनेच पुतण्याचा गेम केला! तरुणाचा दुर्दैवी मृत्यू 
5
अमेरिकेचा मोठा निर्णय! १ ऑगस्टपासून १०० देशांवर लादणार नवीन शुल्क, भारतावर काय परिणाम?
6
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते वडाळा येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात पूजा
7
Tata च्या Harrier EV ला ग्राहकांचा प्रचंड प्रतिसाद; काही तासांत हजारो युनिट्सची विक्री...
8
"मी यूपीचा, पण महाराष्ट्रासाठी रक्त सांडलं, तेव्हा तुमचे...?"; भाषा वादावरून 26/11 च्या 'नायका'चा राज ठाकरेंना थेट सवाल
9
"निवृत्त होऊन ८ मिहिने झाले, तरी माजी CJI चंद्रचूड यांनी सोडला नाही बंगला"; सर्वोच्च न्यायालयाचं सरकारला पत्र
10
'ऑपरेशन सिंदूर'मुळे घाबरलेला पाकिस्तान आता चीनकडून घेणार 'केजे-५००'! कसं आहे 'हे' नवं विमान?
11
तेरा वर्षीय मुलाने तुळशीच्या पानावर साकारले विठ्ठल! पाहा माऊलीचं सुंदर रूप
12
टेक्सासमध्ये महापूर! ५१ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता; ट्रम्प यांच्या 'त्या' निर्णयामुळे संकट ओढावलं?
13
"राज ठाकरेंनी शिवसेना सोडली तो दिवस आठवला...", मराठी अभिनेत्याची पोस्ट चर्चेत
14
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना अनुकूल, इच्छापूर्ती शक्य; मन प्रसन्न करणारा धनलाभाचा काळ!
15
दिल्ली हादरली! एकाच घरात सापडले ३ तरुणांचे मृतदेह; एकाची प्रकृती गंभीर, कारण काय?
16
१०, १५ किंवा २० वर्षे काम केल्यानंतर तुमच्या PF खात्यात किती पैसे जमा होतील? चला गणित समजून घ्या
17
"भाऊ एक झाले की शहराला बळ येतं...", प्रसिद्ध मराठी लेखकाची ठाकरे बंधूंसाठी पोस्ट
18
"बॉयफ्रेंडला सांगून तुला संपवेन", पत्नी रोज देत होती धमकी; छळाला कंटाळलेल्या पतीने उचलले टोकाचे पाऊल
19
लिव्हरला सूज, हाताला सलाईन; रुग्णालयात उपचार सुरू असतानाही चिमुकल्याने तुळशीच्या पानावर साकारले विठूरायाचे चित्र 
20
"मला राजकारणात पडायचं नाही...", हिंदी सक्ती वादावर शरद केळकरची प्रतिक्रिया

किडनीच्या आजाराने १४ जणांचा मृत्यू

By admin | Updated: August 13, 2014 00:45 IST

कळमेश्वर तालुक्यातील पानउबाळी येथे फ्लोराईडयुक्त पाण्यामुळे गेल्या वर्षभरात १४ लोकांचा मृत्यू झाला आहे. तसेच ८ ते १० रुग्णांवर उपचार सुरू आहे. यामुळे गावातील लोकांत भीतीचे वातावरण

जिल्हा परिषद : सायकल अन् जलशुद्धीकरण घोटाळा गाजलानागपूर : कळमेश्वर तालुक्यातील पानउबाळी येथे फ्लोराईडयुक्त पाण्यामुळे गेल्या वर्षभरात १४ लोकांचा मृत्यू झाला आहे. तसेच ८ ते १० रुग्णांवर उपचार सुरू आहे. यामुळे गावातील लोकांत भीतीचे वातावरण असल्याची धक्कादायक माहिती जिल्हा परिषदेतील विरोधीपक्षनेते मनोहर कुंभारे यांनी मंगळवारी जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत दिली. मृतांमध्ये किसन शिवणकर, आनंदराव ढोणे, यमुनाबाई डहाट, शंकरराव वानखडे, केशवराव नारनवरे, किसन बाबडे, संतोषराव ढोणे, सूर्याबाई धुंदे, सुमित्रा वाडीवा , रावण सालमुरकर, रमेश मुनघाटे व हिरुबाई जुनघरे आदींचा समावेश आहे. तसेच स्मिताबाई बाबळे (५५) व किशनदेव जुनघरे (६०) यांच्यावर नागपुुरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. इतरही अनेक लोकांना किडनीच्या आजाराने पछाडले आहे. अशुद्ध पाणीपुरवठ्याला जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांच्या विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी कुंभारे यांनी केली. गावातील पाणी नमुने तपासणीसाठी तातडीने प्रयोगशाळेकडे पाठवा, गावाला सुरू असलेला पाणीपुरवठा बंद करून पर्यायी उपययोजना करण्याचे निर्देश उपाध्यक्ष चंद्रशेखर चिखले व मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजी जोंधळे यांनी दिले. यात आरोग्य विभागातील अधिकारी जबाबदार असल्यास त्यांचेवर कारवाई केली जाईल, अशी ग्वाही चिखले यांनी दिली.महिला व बाल कल्याण विभागामार्फत विद्यार्थ्यांना करण्यात आलेल्या सायकल वाटपात लाखों रुपयांचा घोटाळा झाला आहे. एकाच विद्यार्थ्यांच्या नावाने ८ ते १५ सायकली उचलण्यात आल्या आहेत. यामुळे जि.प.ची बदनामी होत आहे. या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी सदस्यांनी केली. आदिवासी भागातील विद्यार्थ्यांनाही सायकली मिळाल्या नसल्याचे शांता कुमरे यांनी निदर्शनास आणले. तालुका स्तरावरून आलेल्या नावांनुसार यादी मंजूर करण्यात आल्याची माहिती महिला व बाल कल्याण विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली. काही ठिकाणी अनुसूचित जातीचे लाभार्थी न मिळाल्याने त्यांना वाटप करता आले नाही. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी समिती गठित करण्याची घोषणा अध्यक्ष संध्या गोतमारे यांनी केली. शाळांना बंद असलेली जलशुद्धीकरण यंत्रे पुरविण्यात आल्याच्या मुद्यावरून चांगलाच गोंधळ झाला. उपासराव भुते यांनी हा प्रश्न उपस्थित केला. तेराव्या वित्त आयोगातून शाळांना ७७४ जलशुद्धीकरण यंत्रे पुरविण्यात आली. ती चांगल्या कंपनीची नसल्याने यावर आक्षेप घेण्यात आले. या यंत्रांचा शासन स्तरावरून पुरवठा झाल्याची माहिती पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली. याची सदस्यांना कल्पना न दिल्याबाबत जयकुमार वर्मा व उकेश चव्हाण यांनी नाराजी व्यक्त केली.कन्हान येथील अंगणवाडीतील बालकांना पोषण आहार वाटपात गैरप्रकार झाल्याचा आरोप सदस्यांनी केला. याबाबत चुकीचा अहवाल देण्यात आला. या प्रकरणाची चौकशी करून संबंधितावर कारवाई करण्याची मागणी सदस्यांनी केली. मनसर भागातील काही शाळांत विद्यार्थ्याच्या गणवेश वाटपात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप पुष्पा गायकवाड यांनी केला. शालेय गणवेशाची खरेदी स्थानिक स्तरावर व्यवस्थापन समिती करते. या प्रकरणाची चौकशी करून दोषीवर कारवाई करण्याचे निर्देश अध्यक्षांनी दिले.(प्रतिनिधी)