शहरं
Join us  
Trending Stories
1
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
2
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
7
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
8
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
9
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
10
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
11
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
12
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
13
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
14
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
15
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
16
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
17
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
18
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
19
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
20
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

वसई शहरातील १३५ अनधिकृत बांधकामे उध्वस्त

By admin | Updated: October 19, 2016 03:45 IST

पावसाळ्यामुळे गेली दोन महिने थंडावलेली अनधिकृत बांधकामविरोधी कारवाई वसई विरार महापालिकेने पुन्हा सुरु केली

वसई : पावसाळ्यामुळे गेली दोन महिने थंडावलेली अनधिकृत बांधकामविरोधी कारवाई वसई विरार महापालिकेने पुन्हा सुरु केली आहे. पालिकेच्या पथकाने संतोष भुवन, वालईपाडा, गावराईपाडा परिसरातील तब्बल १३५ बेकायदा बांधकामे जमिनदोस्त केली. याहीवेळी स्थानिकांनी कारवाईला विरोध करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, पोलिसांनी जमावाला पिटाळून लावून कारवाईचा मार्ग मोकळा केला. पावसाळ्याचे साडेतीन ते चार महिने मनपाची अवैध बांधकामांवरील कारवाई बंद थंडावली होती. त्याचा फायदा उचलत चाळमाफियांनी या कालावधीत अवैध बांधकामे मोठ्या प्रमाणात उभारली आहेत. परंतु आता महापालिकेने अवैध बांधकामांविरोधी कारवाई सुुरु केली आहे. महापालिका आयुक्त सतीश लोखंडे यांनी नुकतीच सर्व प्रभाग सहाय्यक आयुक्त व अतिक्रमण विरोधी पथकातील अधिकाऱ्यांची बैठक घेऊन अवैध बांधकामांवर कारवाईचे निर्देश दिले आहेत. तसेच कारवाई पथकावर होत असलेले हल्ले लक्षात घेऊन संबंधीत पोलीस ठाण्यांशी बंदोबस्तासाठी पत्रव्यवहार करण्याच्या सूचना केल्या आहेत.आयुक्तांच्या आदेशानंतर उपायुक्त किशोर गवस यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभाग फ चे सहाय्यक आयुक्त राजेंद्र पाटील, अतिक्रमण अधिकारी, मनपा सुरक्षा बल यांनी पोलीसांच्या कडेकोट बंदोबस्तात संतोषभुवन, वलाईपाडा, गावराईपाडा आणि आजूबाजुच्या भागातील अवैध बांधकामे जमिनदोस्त केली. या कारवाईत पालिकेने १३५ अवैध गाळ्यांवर कारवाई करुन जमिनदोस्त केले. दरम्यान, संतोषभुवन येथे पालिकेच्या कारवाईत अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न ग्रामस्थांनी केला. परंतू पोलीसांनी ग्रामस्थांचा प्रयत्न हाणून पाडताना पालिका पथकाला कारवाईचा मार्ग मोकळा करुन दिला. पालिकेने पुन्हा अवैध बांधकामांकडे मोर्चा वळवला असल्याने भुमाफिया व बांधकाम माफियांमध्ये घबराट पसरली आहे.