शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानला अक्कल असेल तर बंदुका शांत ठेवाव्यात, नाहीतर..."; CM ओमर अब्दुल्ला यांचा थेट इशारा
2
बीकेसी ते वरळी फक्त १५ मिनिटांत! मेट्रो-३ चा दुसरा टप्पा सुरु, CM फडणवीसांच्या हस्ते उदघाटन
3
Mumbai: भारत- पाकिस्तान युद्धात घाटकोपरमधील जवान शहीद
4
गस्त वाढवा, ‘त्या’ हँडल्सवर लक्ष ठेवा, वरिष्ठांच्या सुट्या रद्द; CM फडणवीसांकडून महत्त्वाचे निर्देश
5
पाकिस्तानला आणखी एक धक्का; सिंधू कराराबाबत जागतिक बँकेने घेतली भारताची बाजू...
6
“उद्धव ठाकरे सत्तेत कमी विरोधी पक्षात जास्त राहिले, कारखाने वाचवण्यासाठी सत्ता नको”: राऊत
7
मत्स्यव्यवसाय क्षेत्राला कृषी दर्जा देण्याचा शासन निर्णय जारी; आजपासून होणार अंमलबजावणी
8
"राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र आले तर आक्षेप नाही; काँग्रेसची भूमिका भारत जोडोची’’, हर्षवर्धन सपकाळ यांची प्रतिक्रिया
9
भारताने केलेला ड्रोन हल्ला का रोखला नाही? पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांचं संसदेत अजब उत्तर, म्हणाले...  
10
Jalgaon Accident: भरधाव टिप्परची दुचाकीला धडक; आजी- आजोबांच्या डोळ्यांदेखत दोन नातवंडांचा मृत्यू
11
अक्षय केळकरनं १० वर्षांच्या रिलेशनशिपनंतर 'रमा'सोबत थाटला संसार, पहिला फोटो आला समोर
12
भारत-पाक संघर्षादरम्यान 'या' ड्रोन उत्पादक कंपनीच्या शेअर्सला अपर सर्कीट; तुमच्याकडे आहे का?
13
“भविष्यात STच्या नव्या बसेस हायब्रीड इंधनावर, डिझेलच्या पर्यायांचा विचार आवश्यक”: सरनाईक
14
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारतीय रेल्वेचा मोठा निर्णय, उधमपूर-जम्मू-दिल्ली विशेष ट्रेन चालवणार
15
Mumbai: पिझ्झा देण्याच्या बहाण्याने घरी नेले आणि...; आठ वर्षाच्या चिमुकलीसोबत शेजाऱ्याचे संतापजनक कृत्य
16
भारत-पाक संघर्षाचा बाजारावर दबाव! आठवड्यात ३ टक्के घसरण; फक्त 'या' सेक्टरमध्ये तेजी
17
भारत-पाक तणावादरम्यान एअरटेलच्या अध्यक्षांचा मोठा निर्णय, चिनी कंपनीतील हिस्सा खरेदी करणार
18
IPL 2025: आयपीएल रद्द होणार की, उर्वरित सामनेही खेळवले जाणार? बीसीसीआयनं घेतला 'हा' निर्णय
19
India Pakistan: एटीएम २-३ दिवस बंद राहणार? व्हायरल मेसेजबद्दल सरकारने केला खुलासा
20
महामृत्युंजय मंत्र कधी व कोणासाठी म्हणावा? त्यामुळे नेमका कसा लाभ होतो? जाणून घ्या!

साठे महामंडळ घोटाळ्यातील १३ वाहने जप्त

By admin | Updated: August 15, 2015 01:32 IST

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाने बेकायदेशीर वाटप केलेली १३ आलिशान चारचाकी वाहने गुन्हे अन्वेषण विभागाच्या (सीआयडी) भरारी पथकाने जप्त केली आहेत.

औरंगाबाद : लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाने बेकायदेशीर वाटप केलेली १३ आलिशान चारचाकी वाहने गुन्हे अन्वेषण विभागाच्या (सीआयडी) भरारी पथकाने जप्त केली आहेत.औरंगाबाद, जालना आणि बीड जिल्ह्यांतून ही वाहने जप्त करण्यात आली असून, आणखी सात वाहनांचा शोध सुरू आहे. यातील काही वाहनांचा वापर राष्ट्रवादी काँग्रेसचे बडे पुढारी करीत आहेत.एक लाख रुपये वार्षिक उत्पन्न असणाऱ्या लाभार्थ्यांना स्वत:चा व्यवसाय करण्यासाठी चारचाकी वाहन खरेदीची योजना महामंडळाकडून राबविली जाते. सर्व नियम धाब्यावर बसवून मर्जीतील लाभार्थ्यांना २०१४-१५ या वर्षात आलिशान चारचाकी वाहनांचे वाटप करण्यात आले होते. महामंडळातील घोटाळ्याची चौकशी करणारे ‘सीआयडी’चे भरारी पथक गेल्या काही दिवसांपासून मराठवाड्यात तळ ठोकून आहे. पोलीस निरीक्षक ए. एस. लंबे, जगदाळे व साळुंके यांच्या नेतृत्वाखालील पथकाने औरंगाबाद येथून सात, तर जालना आणि बीड येथून प्रत्येकी तीन, अशी १३ वाहने जप्त केली आहेत. औरंगाबाद जिल्ह्यातून लहू नामदेव सरोदे, कडुबा सुंदरलाल मावस, सुरेश एकनाथ फाजगे, धर्मराज तुकाराम मिसाळ, संभाजी माधवराव संभाळकर, शिवाजी रामभाऊ घोडके आणि सुभाष नागोजी मिसाळ तर जालना जिल्ह्यातून राजेंद्र गणेश थोरात, कैलास रामदास फाजगे आणि योगिराज तुकाराम मिसाळ आणि बीड जिल्ह्यातून जप्त करण्यात आलेल्या वाहनांत संतोष वैजनाथ पाटोळे, रामेश्वर केरू घोरपडे आणि बाबू यशवंत गायकवाड यांच्याकडील वाहनांचा त्यात समावेश आहे. (प्रतिनिधी)एकाच दिवसात फेडले कर्ज१महामंडळातर्फे वाहन खरेदीसाठी लाभार्थ्यांना कर्ज दिले जाते. लाभार्थ्याने प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांची खरेदी करून उदरनिर्वाह करणे अपेक्षित असते; परंतु बहुतांश लाभार्थ्यांनी इनोव्हा, फॉर्च्युनर, डस्टर, बोलेरो अशी आलिशान वाहने खरेदी केली होती. राजकीय पक्षांच्या पुढाऱ्यांनी मातंग समाजातील लाभार्थ्यांच्या नावावर ही वाहने घेतली असल्याचे बोलले जाते. २लहु सरोदे आणि कडुबा मावस यांच्या नावावर बोलेरो आणि इनोव्हा वाहने घेण्यात आली होती. राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन बडे पुढारी या वाहनांचा वापर करीत असल्याचे बोलले जाते. वाहन कर्जाची सीआयडी चौकशी सुरू होताच ८ लाख ७७ हजार ४६२ रुपये आणि १८ लाख ४५ हजार रुपयांच्या थकबाकीचा एकाच दिवसात भरणा करण्यात आला. ३महामंडळाच्या योजनेसाठी लाभार्थ्यांचे वार्षिक उत्पन्न एक लाख रुपयांच्या आत असणे अपेक्षित आहे. या गरीब लाभार्थ्यांकडे एकाच दिवसात थकबाकीची रक्कम भरण्यासाठी लाखो रुपये कुठून आले, असा प्रश्न उपस्थित होत आहे. लाभार्थ्यांच्या जबाबातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन बड्या नेत्यांची नावे पुढे आली आहेत.