शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
2
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
3
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
4
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
5
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
6
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
7
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
8
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
9
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
10
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
11
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
12
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
13
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
14
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
15
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
16
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
17
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
18
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
19
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
20
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा

वर्षभरात १३ हजार रुग्णांनी घेतला लाभ

By admin | Updated: November 25, 2014 00:51 IST

गंभीर आजार आणि त्याचा वैद्यकीय उपचाराचा खर्च न पेलवणाऱ्या १३ हजारावर गोरगरीब रु ग्णांना शासनाने राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेच्या माध्यमातून मोठा आधार मिळाला आहे.

राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेला झाले वर्षसुमेध वाघमारे - नागपूर गंभीर आजार आणि त्याचा वैद्यकीय उपचाराचा खर्च न पेलवणाऱ्या १३ हजारावर गोरगरीब रु ग्णांना शासनाने राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेच्या माध्यमातून मोठा आधार मिळाला आहे. दोन वर्षे पूर्ण झालेल्या योजनेला शासनाने पुढील एक वर्षासाठी नूतनीकरण करून राबविण्याचा निर्णय घेतला आहे. गोरगरीब रु ग्णांसाठी आशेचा किरण ठरलेल्या या योजनेचा सर्वात जास्त लाभ मागील वर्षी कर्करोग, हृदयरोग व मूत्रपिंडाशी संबंधित रुग्णांंनी घेतला आहे. राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना २ जुलै २०१२ पासून सुरू झाली. या योजनेचा दुसरा टप्पा २१ नोव्हेंबर २०१३ पासून संपूर्ण राज्यात सुरू झाला. नागपूर जिल्ह्यात ही योजना तीन शासकीय रुग्णालयांसोबतच निवडक ३६ खासगी इस्पितळांमध्ये सुरू आहे. या योजनेच्या विमा कंपनीशी असलेली पॉलिसी एक वर्षाची असल्यामुळे त्याची मुदत २१ नोव्हेंबर रोजी संपली आहे. शासनाने या विमा पॉलिसीचे नूतनीकरण केले असून यामुळे योजनेमध्ये समाविष्ट असणाऱ्या सर्व लाभार्थ्यांना १.५० लाख रुपयांपर्यंतच्या विम्याचे संरक्षण चालू राहणार आहे. दहा खासगी इस्पितळांची कामगिरी उत्कृष्टही योजना तीन शासकीय रुग्णालयांसह ३६ खासगी रुग्णालयांत सुरू आहे. मागील वर्षी दहा खासगी इस्पितळांची कामगिरी उत्कृष्ट ठरली आहे. यात आशा हॉस्पिटलमध्ये २८२, अश्विनी किडनी अ‍ॅण्ड डायलेसीस सेंटरमध्ये ४९४, बारस्कर हॉस्पिटल अ‍ॅण्ड रिसर्च सेंटरमध्ये २०८, सेंट्रल इंडिया कॅन्सर रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये ३१५, क्रेसेन्ट हॉस्पिटल अ‍ॅण्ड हार्ट सेंटरमध्ये ४७९, गंगा केअर हॉस्पिटलमध्ये २५५, लता मंगेशकर हॉस्पिटलमध्ये ३९६, मोगरे चिल्ड्रन हॉस्पिटलमध्ये १९४, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज कॅन्सर हॉस्पिटल अ‍ॅण्ड रिसर्च सेंटरमध्ये २ हजार ७७८ तर श्रावण हॉस्पिटल अ‍ॅण्ड किडनी इन्स्टिट्यूटमध्ये ६२५ रुग्णांनी उपचार घेतला. ३१ कोटी ६८ लाखांचा खर्चमागील वर्षी या योजनेत १३ हजार ३ रु ग्णांनी या योजनेचा लाभ घेतला. या रु ग्णांवरील मोफत उपचारापोटी राज्य शासनाने ३० कोटी ७४ लाख ३० हजार ७६२ रु पयांचा खर्च संबंधित उपचार करणाऱ्या रु ग्णालयांना देण्यात आला आहे.कर्करोगाच्या ४ हजार ७५८ रुग्णांवर उपचारया योजनेत सर्वात जास्त कर्करोगाच्या ४ हजार ७५८ रुग्णांनी उपचार करून घेतला. मूत्रपिंड आजाराच्या १ हजार ३१५ रुग्णांनी तर हृदयाच्या १ हजार १४७ रुग्णांनी उपचार करून घेतले. ९४१ रुग्णांवर हृदय शस्त्रक्रिया करण्यात आली. १ हजार ३७३ रुग्णांनी रेडिएशन घेतले आहे. असा एकूण १३ हजाराच्यावर रुग्णांना लाभ घेतला आहे. मेडिकलमध्ये सर्वात जास्त रुग्णांवर उपचारया योजनेत मेडिकलमध्ये सर्वात जास्त ३ हजार ६१५ रुग्णांवर उपचार करण्यात आले. मेडिकलशी संलग्न असलेल्या सुपर स्पेशालिटी रुग्णालयात १ हजार २४४ रुग्णांवर तर मेयोमध्ये ६१० रुग्णांवर उपचार करण्यात आले. वर्षभरात या तिन्ही शासकीय रुग्णालयांमध्ये ५ हजार ४६९ रुग्णांवर उपचार झाले. खासगी इस्पितळांमध्ये उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या सर्वाधिकराजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेत ५८ टक्के रुग्णांनी खासगी इस्पितळात तर ४२ टक्के रुग्णांनी शासकीय रुग्णालयात उपचार करून घेतले. दिवसेंदिवस खासगी इस्पितळांमध्ये या योजनेतील रुग्णांची गर्दी वाढत असल्याचे चित्र आहे. शहरातील साडेचार हजार रुग्णांवर उपचारनागपूर जिल्ह्यतील १४ तालुक्यामधून सर्वात जास्त नागपूर शहरातील ४ हजार ५०५ रुग्णांवर उपचार करण्यात आले. त्यानंतर कामठीमधून ४१०, काटोलमधून २७०, सावनेरमधून २५५ तर नागपूर ग्रामीणमधून २०० रुग्णांनी याचा लाभ सेवेत नागपूर जिल्हा पहिल्या क्रमांकावरराजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेचा लाभ इतर जिल्ह्यांच्या तुलनेत नागपूर जिल्ह्यातील सर्वात जास्त १३ हजार तीन रुग्णांनी घेतला. भंडारा जिल्ह्यात ७३३, चंद्रपूर २७७, गडचिरोली २६०, गोंदिया ५१४ तर वर्धा जिल्ह्यात ५ हजार ८०६ रुग्णांनी लाभ घेतला. याचे श्रेय या योजनेचे जिल्हा समन्वयक डॉ. एम.एस. पिंपळगावकर व डॉ. धीरज वासेकर यांना जाते. यांच्या परिश्रमामुळे ही योजना जिल्ह्यात सुरळीत सुरू असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.