शहरं
Join us  
Trending Stories
1
हुमायूं मकबऱ्यात भिंत कोसळली, ७-८ जण दबले; मदत कार्य सुरू; व्हिडीओ आला समोर
2
बुलढाणा: जलसमाधी आंदोलन करायला गेले अन् आंदोलकच गेला वाहून; अधिकाऱ्यांसोबत कशावरून झाली बाचाबाची?
3
'अमरीका ने कुत्ते पाले, वर्दी वाले-वर्दी वाले', पीओके मध्ये पाकिस्तान लष्कर प्रमुखांविरोधात घोषणा; व्हिडीओ व्हायरल
4
"चीनपेक्षाही धोकादायक म्हणजे RSS…"; ओवेसींनी साधला निशाणा, PM मोदींना विचारला एक प्रश्न
5
डोनाल्ड ट्रम्प भेटीपूर्वी व्लादिमीर पुतिन यांचा झटका; ४१५ कोटींचं लढाऊ विमान 'गायब'? 
6
ज्या चित्रपट निर्मात्याला राखी बांधली, पुढे त्याचीच पत्नी बनली ही अभिनेत्री, लग्नापूर्वीच...    
7
"भटक्या कुत्र्यांना शेल्टर होममध्ये ठेवल्याने प्रश्न सुटणार नाही, तर..."; सरसंघचालक भागवतांनी काय सुचवला पर्याय?
8
VIDEO: जय महाकाल !! आशिया कपआधी गौतम गंभीर सहकुटुंब महाकालेश्वराच्या चरणी, भस्म आरतीही केली!
9
महिला अधिकारी तुरुंगात गुंडाशी फोनवर अश्लील बोलायची, पत्रेही सापडली; धक्कादायक माहिती उघड
10
विधानसभेच्या नो पार्किंगमध्ये उभी होती मंत्र्यांची कार, वाहतूक पोलिसांनी क्रेन आणली आणि...
11
बेपत्ता अर्चनाला शोधण्यासाठी पोलिसांना नवा प्लॅन; ८ दिवसांपासून ती गायब, ६ टीम अलर्ट
12
'तारीख-वार तुम्ही ठरवा, मी यायला तयार...'; बागेश्वर बाबाने स्वीकारलं अखिलेश यादवंचे 'चॅलेंज'
13
Krishna Janmashtami 2025: टीव्हीवर बालकृष्णाची भूमिका साकारणारी चिमुरडी आता दिसते खूप वेगळी, सध्या ती काय करते?
14
भारताच्या स्वातंत्र्याने खलिस्तान्यांना होतोय त्रास; ऑस्ट्रेलियाच्या रस्त्यांवर गोंधळ घातला
15
ठाकरे बंधूंच्या पॅनेलला टक्कर देण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी २ शिलेदारांवर सोपवली जबाबदारी
16
पाकिस्तानमध्ये हाहाकार! ढगफुटी, पूर आणि भूस्खलनात ४१ लोकांचा मृत्यू, असंख्य बेपत्ता; पाचशे पर्यटक अडकले
17
प्रियकराची ओढ, पत्नीचं संसाराकडे दुर्लक्ष; त्यानंतर पतीने जे केले..., सासरचे जावयावरच उलटले
18
सुदर्शन चक्र, दहा वर्षात तयार होणार भारताचं स्वदेशी सुरक्षा कवच, सर्व शस्त्रास्त्रे ठरणार निष्प्रभ, अशी आहे योजना
19
“जालना, मुंबई, दिल्लीत कुठेही आंदोलन कर, पण...”; जरांगेंच्या निर्धारावर भुजबळ स्पष्टच बोलले
20
'दहा मृतदेह आम्ही स्वतःच बाहेर काढले, अजूनही लोक मातीखालीच...'; चशोटीत आक्रोश, मन्न सुन्न करणारे अनुभव

यंदाचे सार्वजनिक गणेशोत्सवाचे १२५वे वर्ष

By admin | Updated: August 30, 2016 02:02 IST

स्वातंत्र्यचळवळीला सार्वजनिक गणेशोत्सवाच्या माध्यमातून दिशा देण्याचे महत्त्वाचे राष्ट्रीय कार्य हे श्रीमंत भाऊसाहेब रंगारी ऊर्फ भाऊ लक्ष्मण जावळे यांनी केले

पुणे : स्वातंत्र्यचळवळीला सार्वजनिक गणेशोत्सवाच्या माध्यमातून दिशा देण्याचे महत्त्वाचे राष्ट्रीय कार्य हे श्रीमंत भाऊसाहेब रंगारी ऊर्फ भाऊ लक्ष्मण जावळे यांनी केले. १८९२ मध्ये भाऊसाहेब रंगारी यांनी शालूकरांच्या बोळात सार्वजनिक गणेशोत्सवाची मुहूर्तमेढ रोवली. त्यामुळे यंदाचे वर्ष हे सार्वजनिक गणेशोत्सवाचे १२५वे वर्ष आहे, असा दावा श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टने केला आहे. परंतु शासनाने लोकमान्य टिळकांनी सुरू केलेल्या गणेशोत्सव चळवळीचे पुढील शतकोत्तर रोप्यमहोत्सवी वर्ष असल्याची घोषणा करून या उत्सवाच्या संस्थापकांवर एकप्रकारे अन्यायच केला आहे असे सांगत यंदाचे वर्ष हे कायमस्वरूपी सार्वजनिक गणेशोत्सवाचे शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्ष म्हणून श्रीमंत भाऊसाहेब रंगारी यांच्या नावाने साजरे केले जावे अशी मागणी ट्रस्टतर्फे शासनाकडे करण्यात आली आहे. ट्रस्टने सोमवारी पत्रकार परिषदेत यासंदर्भातील सर्व कागदोपत्री पुरावेही सादर केले. या वेळी ट्रस्टचे विश्वस्त सूरज रेणुसे, अध्यक्ष सुनील कुलकर्णी, सचिव राजेंद्र गुप्ता, उपाध्यक्ष भाऊ निकम, सहसचिव दिलीप आडकर आणि प्रवक्ता दत्ता माने उपस्थित होते. जीर्णोद्धारादरम्यान काही कागदपत्रे उपलब्ध झाली, त्यामध्ये रंगारी यांनी १८९२मध्ये सार्वजनिक गणेशोत्सवाची मुहूर्तमेढ रोवली, असा स्पष्ट उल्लेख पाहायला मिळतो. वर्षापूर्वीच यासंदर्भातील माहिती देणारे रंगारी यांचे मृत्यूपत्र ट्रस्टला मिळाले आहे असे सांगून रेणुसे म्हणाले, स्वातंत्र्याचे विचार सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी सरदार नानासाहेब खासगीवाले यांच्याशी केलेल्या चर्चेतून क्रांतीची वाट सुकर झाली. सार्वजनिक गणेशोत्सवाची कल्पना मूर्तरूप धारण करू लागली. १८९२मध्ये शालूकरांच्या बोळात म्हणजे आत्ताच्या भाऊ रंगारी मार्ग येथे सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात करण्यात आली. पुण्यात एकूण तीन गणपती बसविण्यात आले. त्यामध्ये भाऊसाहेब रंगारी गणपती, गणपतराव घोटावडेकर यांचा गणपती आणि नानासाहेब खासगीवाले यांचा समावेश होता. या प्रेरणेने पुढील वर्षी १८९३मध्ये शंभर तरी गणपतींची संख्या वाढली. लोकमान्य टिळकांनी केसरीमधील २६ सप्टेंबर १८९३च्या अंकात या उपक्रमाचे कौतुक केले होते. १८९४मध्ये लोकमान्य टिळकांनी सरदार विंचूरकर वाड्यामध्ये गणपती बसविला. श्रीमंत भाऊसाहेबांनी आपली संपूर्ण मिळकत मृत्युपत्राद्वारे सार्वजनिक गणेशोत्सवासाठी दिली. भाऊसाहेब रंगारी यांनी आपल्या मृत्युपत्रात सर्वत्र साजरा होणारा गणपतीचा सार्वजनिक उत्सव हा आमच्या नावाने साजरा करण्यात यावा अशी इच्छा व्यक्त केली होती, त्याचा मान राखला जावा हीच आमची अपेक्षा आहे.