शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा पलटवार...! कतारमधील अमेरिकेच्या सर्वात मोठ्या एअरबेसवर डागली 6 क्षेपणास्त्रे
2
आखाती देशांत तणाव वाढण्याची चिन्हे, अनेक ठिकाणी एअरस्पेस बंद; एअर इंडिया, इंडिगोकडून सूचना जारी
3
“त्रिभाषा सूत्रावर सर्व संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय घेणार”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
4
ENG vs IND : फलंदाजांनी आपलं काम केलं! टीम इंडियानं हा मंत्र जपला तर विजय पक्का, पण...
5
“स्वसंरक्षणाचा इराणला पूर्ण अधिकार”; रशियाने स्पष्टच सांगितले, तणाव वाढण्याची चिन्हे
6
ठरले! महादेव बाबर NCPमध्ये करणार प्रवेश; DCM अजित पवार राहणार उपस्थित, पुण्यात ताकद वाढणार
7
कुर्ला-सायनदरम्यान ओव्हरहेड वायर तुटली; मध्य रेल्वेच्या जलद फेऱ्या ठप्प, प्रवाशांचे हाल
8
"...तेलाच्या किमती कमी ठेवा, मी बघतोय!" इराण-इस्रायल युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं विधान
9
ENG vs IND: KL राहुल-पंतच्या सेंच्युरीनंतर जड्डूची उपयुक्त खेळी! इंग्लंडसमोर ३७१ धावांचे टार्गेट
10
इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला, ५० हून अधिक लढाऊ विमानांचा कहर; महत्त्वाच्या लष्करी तळांवर तुफान बॉम्बिंग
11
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
12
खामेनेई पळून जाण्याच्या तयारीत! इराणच्या माजी युवराजांचा दावा, 'सुप्रीम लीडर'बद्दल काय म्हणाले?
13
२८ जुलैचा दावा खरा होणार? तिसरे महायुद्ध अटळ? बाबा वेंगा-नास्त्रेदमस यांची मोठी भविष्यवाणी
14
"तमीज से खेलने के चक्कर में..." कडक खेळी शिवाय पंतची 'मन की बात' चर्चेत (VIDEO)
15
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
16
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
17
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
18
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार
19
“विकासासाठीचा प्रत्येक रुपया सर्वसामान्यांपर्यंत पोहोचला पाहिजे”: DCM एकनाथ शिंदे
20
"वाटलं भारताने अण्वस्त्र हल्लाच केला, पाकिस्तानकडे फक्त...', नेमकं काय म्हणाले बिलावल भुट्टो

यंदाचे सार्वजनिक गणेशोत्सवाचे १२५वे वर्ष

By admin | Updated: August 30, 2016 02:02 IST

स्वातंत्र्यचळवळीला सार्वजनिक गणेशोत्सवाच्या माध्यमातून दिशा देण्याचे महत्त्वाचे राष्ट्रीय कार्य हे श्रीमंत भाऊसाहेब रंगारी ऊर्फ भाऊ लक्ष्मण जावळे यांनी केले

पुणे : स्वातंत्र्यचळवळीला सार्वजनिक गणेशोत्सवाच्या माध्यमातून दिशा देण्याचे महत्त्वाचे राष्ट्रीय कार्य हे श्रीमंत भाऊसाहेब रंगारी ऊर्फ भाऊ लक्ष्मण जावळे यांनी केले. १८९२ मध्ये भाऊसाहेब रंगारी यांनी शालूकरांच्या बोळात सार्वजनिक गणेशोत्सवाची मुहूर्तमेढ रोवली. त्यामुळे यंदाचे वर्ष हे सार्वजनिक गणेशोत्सवाचे १२५वे वर्ष आहे, असा दावा श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टने केला आहे. परंतु शासनाने लोकमान्य टिळकांनी सुरू केलेल्या गणेशोत्सव चळवळीचे पुढील शतकोत्तर रोप्यमहोत्सवी वर्ष असल्याची घोषणा करून या उत्सवाच्या संस्थापकांवर एकप्रकारे अन्यायच केला आहे असे सांगत यंदाचे वर्ष हे कायमस्वरूपी सार्वजनिक गणेशोत्सवाचे शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्ष म्हणून श्रीमंत भाऊसाहेब रंगारी यांच्या नावाने साजरे केले जावे अशी मागणी ट्रस्टतर्फे शासनाकडे करण्यात आली आहे. ट्रस्टने सोमवारी पत्रकार परिषदेत यासंदर्भातील सर्व कागदोपत्री पुरावेही सादर केले. या वेळी ट्रस्टचे विश्वस्त सूरज रेणुसे, अध्यक्ष सुनील कुलकर्णी, सचिव राजेंद्र गुप्ता, उपाध्यक्ष भाऊ निकम, सहसचिव दिलीप आडकर आणि प्रवक्ता दत्ता माने उपस्थित होते. जीर्णोद्धारादरम्यान काही कागदपत्रे उपलब्ध झाली, त्यामध्ये रंगारी यांनी १८९२मध्ये सार्वजनिक गणेशोत्सवाची मुहूर्तमेढ रोवली, असा स्पष्ट उल्लेख पाहायला मिळतो. वर्षापूर्वीच यासंदर्भातील माहिती देणारे रंगारी यांचे मृत्यूपत्र ट्रस्टला मिळाले आहे असे सांगून रेणुसे म्हणाले, स्वातंत्र्याचे विचार सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी सरदार नानासाहेब खासगीवाले यांच्याशी केलेल्या चर्चेतून क्रांतीची वाट सुकर झाली. सार्वजनिक गणेशोत्सवाची कल्पना मूर्तरूप धारण करू लागली. १८९२मध्ये शालूकरांच्या बोळात म्हणजे आत्ताच्या भाऊ रंगारी मार्ग येथे सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात करण्यात आली. पुण्यात एकूण तीन गणपती बसविण्यात आले. त्यामध्ये भाऊसाहेब रंगारी गणपती, गणपतराव घोटावडेकर यांचा गणपती आणि नानासाहेब खासगीवाले यांचा समावेश होता. या प्रेरणेने पुढील वर्षी १८९३मध्ये शंभर तरी गणपतींची संख्या वाढली. लोकमान्य टिळकांनी केसरीमधील २६ सप्टेंबर १८९३च्या अंकात या उपक्रमाचे कौतुक केले होते. १८९४मध्ये लोकमान्य टिळकांनी सरदार विंचूरकर वाड्यामध्ये गणपती बसविला. श्रीमंत भाऊसाहेबांनी आपली संपूर्ण मिळकत मृत्युपत्राद्वारे सार्वजनिक गणेशोत्सवासाठी दिली. भाऊसाहेब रंगारी यांनी आपल्या मृत्युपत्रात सर्वत्र साजरा होणारा गणपतीचा सार्वजनिक उत्सव हा आमच्या नावाने साजरा करण्यात यावा अशी इच्छा व्यक्त केली होती, त्याचा मान राखला जावा हीच आमची अपेक्षा आहे.