शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकन नागरिकांना १३० कोटींना गंडा घातला, ईडीने बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश केला; ८ आलिशान कार जप्त
2
सुरतमधून आणलं अन् मुंबईत हत्या; ट्रेनच्या टॉयलेटमध्ये सापडलेल्या पाच वर्षाच्या मुलाला मावशीच्या मुलानेच...
3
लग्नस्थळ पाहायला गेलेल्या पित्यासह दोघांचा बुडून मृत्यू; पिंपळनेरजवळ अपघात, कार कॅनॉलमध्ये उलटली
4
Video: थैलीत नवजात बाळाचा मृतदेह; बाप जिल्हाधिकाऱ्यांसमोर ढसा ढसा रडला; म्हणाला, 'डॉक्टरांनी...'
5
"बंद दाराआड जे घडलं ते...." श्रेयस अय्यरसंदर्भात एबी डिव्हिलियर्सनं मांडलं रोखठोक मत
6
भोग भोगावे लागतील, शेतकऱ्यांनी नुकसानीची सवय करून घ्यावी; भाजपा नेते पाशा पटेलांचा अजब सल्ला
7
पतीने केली मृत्यूची भविष्यवाणी, पत्नीनं खरी करून दाखवली; साडीच्या पदरानं गळा दाबून मारलं, मग...
8
नोटांचा ढीग, 12 कोटी कॅश, किलोमध्ये सोनं-चांदी, मर्सिडीज कार अन्...! ईडीच्या छाप्यात सापडलं घबाड; काँग्रेसच्या आमदाराला अटक
9
आधी बेदम मारहाण केली, मग बेशुद्ध पडल्यानंतर जिवंत जाळली; निक्कीच्या मृत्यूनंतर बहिणीचा आक्रोश
10
'माझ्याकडे मरण्याशिवाय काही पर्याय नाहीये'; उत्तराखंडच्या माजी मुख्यमंत्र्याच्या भाच्याचा व्हिडीओ व्हायरल
11
Duleep Trophy : सिराज-KL राहुलला संघात घ्या! BCCI नं जोर लावला; पण सिलेक्टर्संचा साफ नकार, कारण...
12
Tech: फोनमध्ये कॉल आणि डायलर सेटिंग अचानक बदलण्यामागे नेमके काय कारण? बदल शक्य आहे का?
13
काळजी घ्या! मार्केटमध्ये नवीन स्कॅम आला, व्हॉट्सअ‍ॅपवर लग्नपत्रिका पाठवून बँक खाते रिकामे करतात
14
Viral Video: भटक्या कुत्र्यांना खायला दिलं म्हणून महिलेला भररस्त्यात मारहाण; एका व्यक्तीला अटक
15
वर्धा: पत्नी माधुरीची हत्या करून घराशेजारच्या खड्ड्यात पुरला मृतदेह, पण, सुभाषची एक चुक अन् पोलिसांनी ठोकल्या बेड्या
16
इथं हिटमॅन रोहित लॅम्बोर्गिनीतून फिरतोय; तिकडं क्रिकेटच्या पंढरीत किंग कोहली प्रॅक्टिसमध्ये मग्न
17
पोस्ट ऑफिसचा मोठा निर्णय, अमेरिकेत जाणाऱ्या पार्सलवर बंदी! फक्त 'या' गोष्टींना सूट मिळणार
18
भारताचे समर्थन करणारे माजी सुरक्षा सल्लागार जॉन बोल्टन यांच्या घरावर एफबीआयची धाड, प्रकरण काय?
19
मैत्रिणीसोबत थांबला होता फ्लॅटमध्ये, तरुणाने अचानक ३२व्या मजल्यावरून मारली उडी
20
IB Recruitment: गुप्तचर विभागात ज्युनियर ऑफिसर पदांसाठी भरती, जाणून घ्या पात्रता

सिंचनासाठी १२ हजार कोटींचे कर्ज

By admin | Updated: April 13, 2016 01:58 IST

राज्यातील सिंचन प्रकल्पांसाठी यंदाच्या अर्थसंकल्पात केलेली ८ हजार कोटी रुपयांची तरतूद अपुरी असून, आणखी १२ हजार कोटी रुपयांची तरतूद कर्ज घेऊन करण्यात येईल, तसेच

मुंबई : राज्यातील सिंचन प्रकल्पांसाठी यंदाच्या अर्थसंकल्पात केलेली ८ हजार कोटी रुपयांची तरतूद अपुरी असून, आणखी १२ हजार कोटी रुपयांची तरतूद कर्ज घेऊन करण्यात येईल, तसेच ७० हजार कोटी रुपयांची अपूर्ण कामे येत्या तीन वर्षांत पूर्ण करण्यासाठीही कर्ज काढले जाईल, असे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी आज विधानसभेत सांगितले. मराठवाड्यावरील चर्चेला उत्तर देताना त्यांनी सांगितले की, ‘यंदा राज्यातील २७ सिंचन प्रकल्प पूर्ण करून, त्याद्वारे १ लाख ६० हजार हेक्टर जमीन सिंचनाखाली आणली जाईल. गेल्या वर्षी २८ प्रकल्प पूर्ण करून ४४ हजार हेक्टर जमीन सिंचनाखाली आणली गेली. यंदा १२ हजार कोटींची अतिरिक्त तरतूद आणि त्यानंतरच्या प्रत्येक वर्षांत २० हजार कोटी रुपयांची तरतूद व कर्जाद्वारे करून सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यास मुख्यमंत्री व वित्तमंत्र्यांनी अनुमती दिली आहे.’ मराठवाडा-उत्तर महाराष्ट्रात धरणांमधील पाण्याचे समन्यायी वाटप करण्याची जोरदार मागणी प्रशांत बंब, मधुकरराव चव्हाण, अब्दुल सत्तार, जयप्रकाश मुंदडा, जयदत्त क्षीरसागर, अमित देशमुख आदी सदस्यांनी या वेळी केली. मात्र, या सूचनेवर विचार करू, एवढेच आश्वासन महाजन यांनी दिले. या मागणीवर सर्वपक्षीय सदस्य संतप्त झालेले असताना, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी मात्र, समन्यायी वाटपाचा मुद्दा न्यायप्रविष्ठ असल्याचे सांगितले. सिंचनाबाबत राज्याचे नियोजन आजवर चुकत गेले. आपल्या मतदारसंघात, आपल्या शेताजवळ धरण करण्याचा संकुचित विचार झाला. त्यातून जायकवाडीच्या डोक्यावर धरणे उभी राहिली. सोलापूर जिल्ह्याला दोन टीएमसी पाणी सोडण्यासाठी दहा टीएमसी पाणी सोडावे लागते. कारण वेगवेगळ्या कारणाने पाण्याची गळती होते, असे महाजन म्हणाले. (विशेष प्रतिनिधी)मराठवाड्याचा अनुशेष नाही; मंत्र्यांच्या विधानाने सदस्य संतप्तनिदेशांक व अनुशेष निर्मूलन समितीने दर्शविलेला सिंचनाचा भौतिक अनुशेष आज मराठवाड्यात शिल्लक नसल्याचे विधान मंत्री महाजन यांनी करताच, दोन्ही बाजूंचे मराठवाड्यातील सदस्य आक्रमक झाले. हा मराठवाड्यावरील अन्याय असल्याचे त्यांचे म्हणणे होते.अध्यक्ष हरीभाऊ बागडे यांनीही मंत्र्यांच्या विधानाबद्दल नाराजी व्यक्त केली. आपली माहिती योग्यच आहे. मात्र, मराठवाड्याला सिंचन निधीची मोठ्या प्रमाणात आवश्यकता आहे व ती पूर्ण केली जाईल, असे महाजन म्हणाले. ‘उपसा’चे बिल सरकार भरणारदुष्काळग्रस्त जिल्ह्यांतील उपसा सिंचन योजनांचे शेतकऱ्यांचे बिल हे यंदाच्या वर्षी राज्य सरकार भरेल, अशी घोषणा मदत व पुनर्वसनमंत्री एकनाथ खडसे यांनी या वेळी केली. सहकारी पाणीवापर संस्थांकडून या योजना चालविल्या जातात. पाणीपुरवठामंत्री बबनराव लोणीकर यांनीही चर्चेला उत्तर दिले.