शहरं
Join us  
Trending Stories
1
गणेशभक्तांना घेऊन जाणारी बस कशेडी बोगद्याजवळ पेटली; प्रवासी झोपेत असतानाच उडाला आगीचा भडका
2
तीन हजार महिला सेवा सहकारी संस्थांना सरकारी कामे देणार,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
3
"या गोष्टी खेळाशी जोडू नयेत म्हणणारे लोक...";भारत-पाक सामन्यावरून गोंधळावरुन अजित पवारांचे स्पष्ट मत
4
अमेरिकेत ५.५ कोटी व्हिसाधारकांची चौकशी; ५० लाख भारतीयांचाही समावेश, आता ट्रक चालकांनाही व्हिसा नाही
5
पालिका बँक निवडणुकीत ठाकरे, दरेकर गटाला धक्का, सहकार पॅनलने मारली बाजी
6
चालू शूटिंगमध्ये कोसळले, सेटवरच ४७ वर्षीय दिग्दर्शकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
7
आजचे राशीभविष्य, २४ ऑगस्ट २०२५: दैनंदिन कामे निर्विघ्नपणे पार पडतील; संसारात समाधान राहील
8
काँग्रेसच्या गॅम्बलर आमदाराला अटक; १२ कोटींची राेकड जप्त
9
अनिल अंबानी सीबीआयच्या रडारवर; मुंबईतील घरी छापे, ३,०७३ कोटींचे कथित कर्ज घोटाळा प्रकरण
10
निवडणूक लढवायची? मग मतदारयाद्या तपासायला घ्या, राज ठाकरे यांची इच्छुकांना सूचना
11
"वर्ष अखेरीस मेड इन इंडिया सेमीकंडक्टर बाजारात येणार, तसेच ६ जी..."; PM नरेंद्र मोदींची घोषणा
12
"मी मांसाहार खाल्लेलं माझ्या पांडुरंगाला चालतं, तुम्हाला काय प्रॉब्लेम..?"; सुप्रिया सुळेंच्या विधानानं नवा वाद
13
गणेशोत्सवात परीक्षा नको, अमित ठाकरे यांनी केली मागणी
14
वन नेशन, वन इलेक्शन...! भाजपानं रणनीतीत केला बदल; विरोधकांना शह देण्यासाठी नवा 'मेगा प्लॅन'
15
दीड वर्षाच्या मुलाला मिठीत घेऊन BSF जवानानं मारली गंगा नदीत उडी; कारण ऐकून डोळ्यात पाणी येईल
16
अमेरिकन नागरिकांना १३० कोटींना गंडा घातला, ईडीने बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश केला; ८ आलिशान कार जप्त
17
सुरतमधून आणलं अन् मुंबईत हत्या; ट्रेनच्या टॉयलेटमध्ये सापडलेल्या पाच वर्षाच्या मुलाला मावशीच्या मुलानेच...
18
रोनाल्डोनं रचला नवा इतिहास! अशी कामगिरी करणारा फुटबॉल जगतातील ठरला पहिला खेळाडू
19
लग्नस्थळ पाहायला गेलेल्या पित्यासह दोघांचा बुडून मृत्यू; पिंपळनेरजवळ अपघात, कार कॅनॉलमध्ये उलटली
20
Video: थैलीत नवजात बाळाचा मृतदेह; बाप जिल्हाधिकाऱ्यांसमोर ढसा ढसा रडला; म्हणाला, 'डॉक्टरांनी...'

खनिकर्मबाधित गावांसाठी १०३ कोटी

By admin | Updated: October 30, 2014 00:45 IST

खनिकर्मबाधित गावांच्या विकासासाठी राज्य शासन आणि खनिकर्म महामंडळाने १०२ कोटी ९९ लाख ३७ हजार रुपयांचा निधी वितरित केल्याचे शपथपत्राद्वारे सांगण्यात आल्याने आज उच्च न्यायालयाचे

हायकोर्ट : आशिष जयस्वाल यांची जनहित याचिका निकालीनागपूर : खनिकर्मबाधित गावांच्या विकासासाठी राज्य शासन आणि खनिकर्म महामंडळाने १०२ कोटी ९९ लाख ३७ हजार रुपयांचा निधी वितरित केल्याचे शपथपत्राद्वारे सांगण्यात आल्याने आज उच्च न्यायालयाचे न्या. भूषण गवई आणि न्या. विनय देशपांडे यांच्या खंडपीठाने याचिकाकर्ते आशिष जयस्वाल यांची जनहित याचिका निकाली काढली. खनिज विकास निर्मिती व उपयोजन निधी नियम २००१ नुसार राज्यात एकूण खनिजातून मिळणाऱ्या स्वामित्व धनातून १० टक्के रकमेच्या दोन तृतीयांश रक्कम खनिज विकास निधी म्हणून जमा करण्यात येतो. यातून खनिकर्मबाधित गावांमध्ये रस्ते, पाणी, आरोग्य सेवा, पर्यावरण संतुलन इत्यादी कामे घेण्यात येतात. वाळू निर्गती धोरणानुसारसुद्धा जिल्हाधिकाऱ्यांना स्वामित्व धनाच्या दोन तृतीयांश रकमेपैकी ५० टक्के निधी रस्ते, आरोग्य सेवेवर खर्च करण्याकरिता शासनाकडे प्रस्ताव पाठविणे आवश्यक असते. परंतु नागपूर जिल्ह्याकरिता शासनाकडे असे कोणतेही प्रस्ताव पाठविण्यात न आल्यामुळे माजी आ. अ‍ॅड. आशिष जयस्वाल यांनी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती. याचिकेत उद्योग व खाण विभागाचे सचिव, महसूल व वन विभागाचे सचिव, महाराष्ट्र राज्य खनिकर्म महामंडळाचे प्रबंध संचालक आणि नागपूर जिल्हाधिकाऱ्यांना प्रतिवादी करण्यात आले होते. या याचिकेवर जिल्हाधिकारी आणि शासनाच्या वतीने वेळोवेळी शपथपत्र दाखल करण्यात आले होते आणि उच्च न्यायालयाचे लक्ष वेधण्यात आले होते. याचिका दाखल झाल्यापासून जिल्हाधिकाऱ्यांनी शासनाकडे १८३ कामांच्या मंजुरीसाठी प्रस्ताव पाठविले होते. या कामांसाठी शासनाने ६० कोटी २५ लाख ७२ हजारांचा निधी वितरित केला आहे. त्याचप्रमाणे खनिकर्म महामंडळानेही ४२ कोटी ७३ लाख ६५ हजाराचा निधी वितरित केलेला आहे. शपथपत्रांनुसार याचिकेचा हेतू पूर्णत्वास आल्याने न्यायालयाने ही याचिका निकाली काढली. न्यायालयात याचिकाकर्त्याच्या वतीने अ‍ॅड. मोहित खजांची आणि राज्य सरकारच्या वतीने मुख्य सरकारी वकील भारती डांगरे यांनी काम पाहिले. (प्रतिनिधी)