शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
3
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
4
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
5
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
6
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
7
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
8
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
9
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
10
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
11
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
12
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
13
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
14
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
15
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
16
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
17
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
18
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
19
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली
20
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार

राज्यात १०२ टक्के पावसाचा अंदाज

By admin | Updated: June 2, 2016 00:57 IST

जागतिक स्थरावर हवामानात मोठ्याप्रमाणात बदलत होत असून, भारतात त्याचा मोठा परिणाम होताना दिसत आहे. या वर्षी राज्यात १०२ टक्के पाऊस पडण्याचा अंदाज आहे.

कोल्हापूर : दुष्काळाच्या झळा कोल्हापुरातील ऊसपट्ट्यालाही बसत असून, शेतातील ऊस वाळला आहे, याकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी वाळलेला ऊस घेऊनच शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली. यानंतर मोर्चाने येऊन आंदोलकांनी निवासी उपजिल्हाधिकारी शंकर बर्गे यांच्या टेबलावरच हा वाळलेला ऊस ठेवत आर्थिक अरिष्टात सापडलेल्या शेतकऱ्यांचे कर्ज शासनाने माफ करावे, अशी मागणीही निवेदनाद्वारे करण्यात आली. दुपारी एकच्या सुमारास शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथदादा पाटील, जिल्हाध्यक्ष पी. जी. पाटील-वाकरेकर यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्ते जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकवटले. या ठिकाणी कार्यकर्त्यांनी वाळलेला ऊस घेऊनच निदर्शने केली. यानंतर घोषणाबाजी करत सर्व आंदोलक मोर्चाद्वारे निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांच्या दालनाकडे आले. यावेळी आंदोलकांना वाळलेला ऊस आत घेऊन जाण्याची परवानगी पोलिसांनी नाकारली. परंतु, शेतातील वाळलेला ऊस प्रशासनाला दिसावा यासाठी ऊस आम्ही घेऊन जाणारच, अशी भूमिका आंदोलकांनी घेतली. त्यामुळे निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांनीच त्यांना उसासह आत येण्यास सांगितले. आत आल्यानंतर आंदोलकांनी थेट निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांच्या टेबलावर वाळलेला ऊस ठेवून चर्चा करायला सुरुवात केली. यानंतर रघुनाथदादा पाटील यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने निवेदन सादर केले. कोल्हापूर जिल्हा हा ऊसपट्टा असल्याने दुष्काळाच्या झळा बसल्या असून, शेतकरी आर्थिक अरिष्टात सापडला आहे. संपूर्ण शेती तोट्यात गेली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकरी घेतलेली शेती कर्जे परतफेड करू शकत नाही. म्हणून शासनाने शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जे माफ करावीत. त्याचबरोबर दुष्काळामुळे जो ऊस वाळलेला आहे, त्या वाळलेल्या उसाचे पंचनामे करून एकरी ५०,००० रुपये नुकसानभरपाई देण्यात यावी. तरच पुढील वर्षी शेती करणे शक्य होणार आहे. आंदोलनात अ‍ॅड. माणिक शिंदे, दिलीप माणगावे, अ‍ॅड. अजित पाटील, आदी सहभागी झाले होते. वाळलेल्या उसासह अन्य पिकांचे पंचनामे करा : नरके जिल्ह्यातील उसासह अन्य पिके वाळली असून त्यांचे तत्काळ पंचनामे करण्याच्या सूचना संबंधित यंत्रणेला कराव्यात; तसेच जिल्ह्यात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाल्याचा अहवाल शासनाकडे पाठवावा, अशी मागणी बुधवारी आमदार चंद्रदीप नरके यांनी निवासी उपजिल्हाधिकारी शंकर बर्गे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. यावर जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करून आज, गुरुवारी याबाबत योग्य ती माहिती देऊ, असे आश्वासन निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिले. दरम्यान याविषयी आमदार नरके यांनी महसूल राज्यमंत्री संजय ठाकूर यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा करून निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांना योग्य त्या सूचना देण्यास सांगितले.