शहरं
Join us  
Trending Stories
1
Maratha Reservation: मराठा आरक्षणाबाबत सरकारचा मसुदा तयार, लवकरच निर्णय!
2
आजचे राशीभविष्य, ०२ सप्टेंबर २०२५: प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल, स्वकियांशीच खटके उडतील
3
Mumbai: हायकोर्टाने मराठा आंदोलकांना खडसावले, आज दुपारपर्यंत रस्ते मोकळे करण्याचे आदेश
4
Afghanistan Earthquake: अफगाणिस्तानमध्ये भूकंप, ८०० जणांचा मृत्यू, २५०० हून अधिक जखमी
5
Narendra Modi: दहशतवादाविरोधात दुतोंडी भूमिका नको; पंतप्रधान मोदींचे एससीओमध्ये पाकिस्तानला खडेबोल 
6
Chhagan Bhujbal: ओबीसीत वाटेकरी नकोत; नाहीतर आम्हीही मुंबईत येऊ, छगन भुजबळांचा इशारा
7
भारताने एकामागोमाग एक १५ गोल डागले; समोरचे '0'वरच पाहत राहिले
8
मुंबईकडे जाण्यासाठी रेल्वे स्थानकांवर गर्दीच-गर्दी; मराठा आंदोलकांवर रेल्वे पोलिसांचे लक्ष...
9
मोदी चीनमध्ये असताना डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा; म्हणे, भारताने टेरिफवर ऑफर दिली...
10
डोनाल्ड ट्रम्प यांची भगवा पार्टीने अंत्ययात्रा काढली, लोकांना तेराव्यालाही बोलावले
11
शक्य तितक्या लवकर मुंबईचे रस्ते सोडा...; मनोज जरांगे यांची मराठा आंदोलकांना सूचना
12
...तर आम्हीही लाखोंच्या संख्येने मुंबईत येऊ; OBC समाजाचा इशारा, मंत्री छगन भुजबळ जरांगेंवर संतापले
13
जगदीप धनखड कुठे आहेत? एका बड्या नेत्याच्या फार्महाऊसवर...; माजी आमदारांच्या पेन्शनसाठीही अर्ज...
14
अफगाणिस्तानात भूकंपामुळे हाहाकार, भारताने पुढे केला मदतीचा हात!१ हजार तंबूंसह काय काय पाठवलं?
15
PNB आणि बँक ऑफ इंडियाच्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी...; आजपासून स्वस्त झालं कर्ज!
16
WhatsApp हॅकर्सच्या निशाण्यावर? 'ही' चूक केल्यास तुमचा फोन होऊ शकतो हॅक!
17
"...तर यातून लवकर मार्ग निघू शकतो"; CM देवेंद्र फडणवीसांचा मराठा आंदोलकांना प्रामाणिक सल्ला
18
जीममध्ये पुरुष ट्रेनर महिलांना देतायेत ट्रेनिंग...! अलाहाबाद उच्च न्यायालयाने व्यक्त केली चिंता; म्हणाले...
19
"आता प्रशासन कोर्टाच्या निर्णयाचे उचित पालन करेल..."; CM देवेंद्र फडणवीसांचं रोखठोक मत
20
हॉटेलला पोहचूनही ५० मिनिटे कारमध्येच थांबले; मोदी-पुतिन यांची खास भेट, जाणून घ्या भेटीमागे काय?

राज्यात १०२ टक्के पावसाचा अंदाज

By admin | Updated: June 2, 2016 00:57 IST

जागतिक स्थरावर हवामानात मोठ्याप्रमाणात बदलत होत असून, भारतात त्याचा मोठा परिणाम होताना दिसत आहे. या वर्षी राज्यात १०२ टक्के पाऊस पडण्याचा अंदाज आहे.

कोल्हापूर : दुष्काळाच्या झळा कोल्हापुरातील ऊसपट्ट्यालाही बसत असून, शेतातील ऊस वाळला आहे, याकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी वाळलेला ऊस घेऊनच शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली. यानंतर मोर्चाने येऊन आंदोलकांनी निवासी उपजिल्हाधिकारी शंकर बर्गे यांच्या टेबलावरच हा वाळलेला ऊस ठेवत आर्थिक अरिष्टात सापडलेल्या शेतकऱ्यांचे कर्ज शासनाने माफ करावे, अशी मागणीही निवेदनाद्वारे करण्यात आली. दुपारी एकच्या सुमारास शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथदादा पाटील, जिल्हाध्यक्ष पी. जी. पाटील-वाकरेकर यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्ते जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकवटले. या ठिकाणी कार्यकर्त्यांनी वाळलेला ऊस घेऊनच निदर्शने केली. यानंतर घोषणाबाजी करत सर्व आंदोलक मोर्चाद्वारे निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांच्या दालनाकडे आले. यावेळी आंदोलकांना वाळलेला ऊस आत घेऊन जाण्याची परवानगी पोलिसांनी नाकारली. परंतु, शेतातील वाळलेला ऊस प्रशासनाला दिसावा यासाठी ऊस आम्ही घेऊन जाणारच, अशी भूमिका आंदोलकांनी घेतली. त्यामुळे निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांनीच त्यांना उसासह आत येण्यास सांगितले. आत आल्यानंतर आंदोलकांनी थेट निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांच्या टेबलावर वाळलेला ऊस ठेवून चर्चा करायला सुरुवात केली. यानंतर रघुनाथदादा पाटील यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने निवेदन सादर केले. कोल्हापूर जिल्हा हा ऊसपट्टा असल्याने दुष्काळाच्या झळा बसल्या असून, शेतकरी आर्थिक अरिष्टात सापडला आहे. संपूर्ण शेती तोट्यात गेली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकरी घेतलेली शेती कर्जे परतफेड करू शकत नाही. म्हणून शासनाने शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जे माफ करावीत. त्याचबरोबर दुष्काळामुळे जो ऊस वाळलेला आहे, त्या वाळलेल्या उसाचे पंचनामे करून एकरी ५०,००० रुपये नुकसानभरपाई देण्यात यावी. तरच पुढील वर्षी शेती करणे शक्य होणार आहे. आंदोलनात अ‍ॅड. माणिक शिंदे, दिलीप माणगावे, अ‍ॅड. अजित पाटील, आदी सहभागी झाले होते. वाळलेल्या उसासह अन्य पिकांचे पंचनामे करा : नरके जिल्ह्यातील उसासह अन्य पिके वाळली असून त्यांचे तत्काळ पंचनामे करण्याच्या सूचना संबंधित यंत्रणेला कराव्यात; तसेच जिल्ह्यात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाल्याचा अहवाल शासनाकडे पाठवावा, अशी मागणी बुधवारी आमदार चंद्रदीप नरके यांनी निवासी उपजिल्हाधिकारी शंकर बर्गे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. यावर जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करून आज, गुरुवारी याबाबत योग्य ती माहिती देऊ, असे आश्वासन निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिले. दरम्यान याविषयी आमदार नरके यांनी महसूल राज्यमंत्री संजय ठाकूर यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा करून निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांना योग्य त्या सूचना देण्यास सांगितले.