शहरं
Join us  
Trending Stories
1
आयटी पार्क पुण्यातून बाहेर चालले..! अजित पवारांनी हिंजवडीच्या सरपंचांनाही सुनावले खडेबोल
2
२६ जुलै हा दिवस मुंबईकर कधीच विसरू शकत नाही! २० वर्षापूर्वी काय घडलं होतं त्या दिवशी?
3
Thailand- Cambodia Conflict :'सीमेवर प्रवास टाळा', थायलंड- कंबोडिया संघर्षादरम्यान भारताच्या पर्यटकांसाठी दूतावासाने सूचना दिल्या
4
विवाहित वर्गमैत्रिणीला भेटला; पत्नीला घटस्फोट देत तिच्यासोबत लिव्ह इनमध्ये राहिला, मग जे घडलं...
5
कॉलेजला जाण्यापूर्वी हवी होती लीन बॉडी; ऑनलाईन ट्रेंड, लिक्विड डाएट बेतलं जीवावर, मुलाचा मृत्यू
6
आता सैनिकांसाठी अरबी भाषा आणि इस्लाम शिकणे अनिवार्य, इस्रायलचा मोठा निर्णय! कारण काय?
7
अरेरे! 'सैयारा' पाहून तुफान राडा; गर्लफ्रेंडसाठी थिएटरबाहेर भिडले २ तरुण, लाथा-बुक्क्यांनी मारहाण
8
Rain Update : ठाणे, रायगड, मुंबईत मुसळधार, ऑरेंज अलर्ट, पालघरसाठी रेड अलर्ट, भरती-ओहोटीबाबतही इशारा
9
५ वर्षांत १० पट वाढला TATA Sons चा नफा; समूहाच्या 'या' कंपनीनं केली सर्वाधिक कमाई, तुमच्याकडे स्टॉक आहे का?
10
'मला बुटाने मारा', सिद्धरामय्या अन् शिवकुमार यांच्या विशेष अधिकाऱ्यांमध्ये दिल्लीत हाणामारी; कारण काय?
11
शाहरुख फिटनेससाठी कोणते पदार्थ खात नाही? किती वाजता झोपतो? काय जेवतो? जाणून घ्या एका क्लिकवर
12
पहिल्यांदा नोकरी करणाऱ्यांना सरकार देणार १५ हजार रुपये; फक्त पूर्ण कराव्या लागतील 'या' २ अटी
13
"तुम्हाला आनंद देणाऱ्या गोष्टींवरदेखील खर्च करा..," राधिका गुप्ता यांनी दिला हृदयस्पर्शी सल्ला
14
आमदार रोहित पवारांच्या अडचणीत वाढ; मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीकडून मोठी कारवाई
15
महायुतीत २ मंत्र्यांमध्ये रंगलं मानापमान नाट्य; शिंदेसेनेचे मंत्री नाराज, भाजपा मंत्र्यांचा पलटवार
16
सुनील शेट्टीने 'हेरा फेरी ३'मधील परेश रावलच्या एंट्रीवर दिली प्रतिक्रिया, म्हणाली- "नजर लागते..."
17
२ मुलांना विष पाजलं, पत्नीचा गळा दाबला अन् मग पतीने...; एकाच कुटुंबातील चौघांची जीवनयात्रा संपली
18
धक्कादायक घटना! एक वर्षाच्या मुलाने नागाचा चावा घेतला, कोब्राचा मृत्यू झाला; पण मुलगाही...
19
पाकिस्तानने अमेरिकेसमोर TRF'वर सूर बदलला! म्हणाले, आम्हाला काही हरकत नाही', हुशारीही दाखवली
20
₹३० वरुन ₹३००० पार गेला हा शेअर; आता कंपनीनं मोठ्या गुंतवणुकीची केली घोषणा, तुमच्याकडे आहे का?

दहा हजार कोटींचे ‘दुष्काळ’ पॅकेज

By admin | Updated: December 17, 2015 03:25 IST

विरोधकांनी केलेल्या शेतकरी कर्जमाफीच्या मागणीला बगल देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील १४ दुष्काळग्रस्त जिल्ह्यांसाठी १० हजार ५१२ कोटी रुपयांच्या पॅकेजची घोषणा

नागपूर : विरोधकांनी केलेल्या शेतकरी कर्जमाफीच्या मागणीला बगल देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील १४ दुष्काळग्रस्त जिल्ह्यांसाठी १० हजार ५१२ कोटी रुपयांच्या पॅकेजची घोषणा बुधवारी विधानसभेत केली. त्यात कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना ७,४१२ कोटींची थेट मदत देण्यात येणार आहे. हिवाळी अधिवेशनात प्रारंभापासून विरोधकांनी कर्जमाफीच्या मुद्द्यावरून अनेकदा कामकाज बंद पाडले, तर काँग्रेसने मोठा मोर्चाही काढला. मात्र, कर्जमाफीने शेतकऱ्यांचा नव्हे तर बँकांचा फायदा होतो, याचा पुनरुच्चार करत आत्महत्या रोखण्यास हा एकमेव उपाय नाही, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. एका तालुक्यापुरता परवाना असलेला सावकार जिल्ह्यातील अन्य तालुक्यांत कर्ज देऊ शकत नाही पण अनेक सावकारांनी अशी कर्जे दिलेली आहेत. ती माफ करण्यात येतील. त्याचा फायदा ७९ हजार शेतकऱ्यांना होईल, अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली. जलयुक्त शिवार योजनेमुळे शेतीला २४ टीएमसी पाणी मिळाले. ते मोजण्याच्या शास्रीय पद्धतीवरून हे प्रमाण काढले आहे. आपल्या सरकारने गेल्यावर्षी शेतकऱ्यांना १० हजार कोटींहून अधिकची मदत केली. आघाडी सरकारला पाच वर्षांतही हे करता आले नव्हते, असा दावाही त्यांनी केला. (विशेष प्रतिनिधी)विरोधकांचा सभात्यागमुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेले पॅकेज हे शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसण्याचा प्रकार आहे. कर्जमाफी देण्याची क्षमता नसेल तर राज्य सरकारने केंद्राकडे जायला हवे, पण राज्य सरकारला कर्जमाफी द्यायचीच नाही. सरकारने शेतकऱ्यांचा विश्वासघात केला आहे, असा आरोप विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला. त्यानंतर सरकारचा निषेध करत काँग्रेस-राष्ट्रवादीच्या सदस्यांनी सभात्याग केला. जलयुक्त शिवार समितीचे अध्यक्षपद आमदारांनाजलयुक्त शिवार योजनेचे तालुकास्तरीय अध्यक्षपद स्थानिक आमदारांना दिले जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले. योजनेसाठी आमदार निधीतून आमदार जेवढा निधी देतील तेवढाच निधी शासनाकडून दिला जाईल, अशी घोषणा त्यांनी केली. दोन्ही बाजूंच्या सदस्यांनी या घोषणेचे स्वागत केले.महाराष्ट्रासह ११ राज्यांना नोटीसनवी दिल्ली : दुष्काळाशी निपटणे आणि दुष्काळ पीडित शेतकऱ्यांना पुरविण्यात आलेल्या मदतीसंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकार तसेच महाराष्ट्रासह ११ राज्यांना नोटीस बजावत सविस्तर अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. ‘स्वराज अभियान’ या स्वयंसेवी संस्थेने सर्वोच्च न्यायालयात गत १४ डिसेंबरला याचिका दाखल केली होती. या याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने ही नोटीस जारी केली. येत्या ४ जानेवारीला या प्रकरणाची पुढील सुनावणी होणार आहे.4200 कोटींची केली केंद्राकडे मागणीराज्यातील दुष्काळ निवारणासाठी केंद्र सरकारकडे ४२०० कोटी रुपयांची मदत मागण्याचा प्रस्ताव ७ नोव्हेंबरलाच पाठविण्यात आला आहे. मदतीसाठी आणखी एक पुरवणी प्रस्ताव पाठविला जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.