शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपतिपदासाठी भाजपची जोरदार तयारी, संघनिष्ठ व्यक्तीवर भर; ९ सप्टेंबरला होणार मतदान
2
आजचे राशीभविष्य, १७ ऑगस्ट २०२५: अचानक धनलाभ, मान-सन्मान; सरकारी कामात यश, शुभ दिवस
3
परवडणाऱ्या घरांची संख्या वाढवण्यासाठी बिल्डरांना सवलती, तरीही किमती चढ्याच: मुख्यमंत्री
4
उंच इमारतीच्या बांधकामाबाबतचे सुरक्षा नियम राज्यासाठीही बंधनकारक; हायकोर्टाचे निर्देश
5
भारतावर दुय्यम शुल्क लावणार नाही; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे संकेत
6
राहुल गांधी यांची आजपासून 'व्होट अधिकार यात्रा'; गैरप्रकारांविरोधात जनता जागृत झाल्याचा दावा
7
जिद्द असावी तर अशी! मुंबई, ठाण्यात थरांचा विश्वविक्रम; कुरघोडीच्या राजकारणात गोविंदांचा विजय
8
अंतराळवीर शुभांशू शुक्ला ऐतिहासिक यात्रा पूर्ण करून आज भारतात; PM मोदी यांना भेटणार
9
'फाळणीला जिना, काँग्रेस, माउंटबॅटन हे जबाबदार'; 'एनसीईआरटी'च्या मॉड्युलमधून मोठा दावा
10
वाहनांवरील दंडात सूट; अभय योजना लवकरच ! परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा वृत्ताला दुजोरा
11
राज्यात 'पाऊस हंडी'; ५ दिवस अतिवृष्टीचे! पूर परिस्थितीत आपत्तीपासून सतर्क राहण्याचे आवाहन
12
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
13
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
14
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
15
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
16
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
17
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
18
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
19
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
20
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं

बीडमध्ये प्रसादातून १०० जणांना विषबाधा

By admin | Updated: April 5, 2015 01:45 IST

तालुक्यातील नांदूरघाट येथे शनिवारी हनुमान जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात प्रसादातून १०० जणांना विषबाधा झाली.

केज (जि़ बीड) : तालुक्यातील नांदूरघाट येथे शनिवारी हनुमान जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात प्रसादातून १०० जणांना विषबाधा झाली. १७ बालकांचा समावेश असून, रुग्णांवर नांदूरघाट, नेकनूर, बीड, अंबाजोगाई येथील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. कार्यक्रमात गावकऱ्यांच्या वतीने हरभरा दाळ, साखर, गुळ प्रसाद म्हणून देण्यात आला. त्यानंतर गावातील एकाने खवा आणला. त्याचेही वाटप झाले. मात्र, खवा खाल्ल्यानंतर अनेकांना मळमळ, उलट्या, पोटदुखी, जुलाब याचा त्रास सुरु झाला. भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष संतोष हंगे यांनी तरुणांच्या मदतीने रुग्णांना खासगी जीपमधून जिल्हा रुग्णालयात हलविले. ३८ रुग्णांवर जिल्हा रुग्णालयात अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. महानंदा मुंडे, डॉ. राम देशपांडे यांनी उपचार केले. नांदुरघाट येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात सात जणांवर उपचार करण्यात आले. तर काही रुग्णांना राजेगाव, नेकनूर, चौसाळा, चिंचोलीमाळी प्राथमिक आरोग्य केंद्रात हलविण्यात आले. अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयातही काही रुग्णांवर उपचार सुरू आहेत.दोन बालके अत्यवस्थ : नांदुरघाट येथील अथर्व संतोष सातपुते व अभिषेक मनोज सातपुते ही चार वर्षांची दोन बालके अत्यवस्थ आहेत. त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सुरूवातीला ते उपचाराला प्रतिसाद देत नव्हते. मात्र आता चिंतेचे कारण नाही, असे डॉक्टरांनी सांगितले.