शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

येरोळ परिसरातील सोयाबीनवर हळद्या रोग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2021 04:26 IST

येरोळ : येरोळ व परिसरातील सोयाबीनवर सध्या हळद या रोगाचा प्रादुर्भाव दिसत असून, या रोगामुळे अनेक शेतकऱ्यांचे नुकसान होत ...

येरोळ : येरोळ व परिसरातील सोयाबीनवर सध्या हळद या रोगाचा प्रादुर्भाव दिसत असून, या रोगामुळे अनेक शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. येरोळ व परिसरात ३० टक्के सोयाबीनमध्ये घट येणार हे निश्चित असल्याचे शेतकरी सांगत आहेत. सध्या अनेक शेतकऱ्यांच्या सोयाबीन पिकावर बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. शासन आणि विमा कंपनीने संयुक्तपणे पंचनामा करून शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी येरोळ परिसरातून शेतकरी करीत आहेत.

बसेस सुरू करण्याची नागरिकांची मागणी

लातूर : कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने शहरी भागातील बसेस सुरू करण्यात आल्या आहेत. त्याच धर्तीवर ग्रामीण भागात बसेस सुरू करण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे. मुक्कामी बसेस बंद असल्याने विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिकांची गैरसोय होत आहे. त्यातच डिझेलचे दर वाढल्याने एसटी महामंडळाला अडचणींचा सामना करावा लागत असून, उत्पन्नही घटले आहे. दरम्यान, प्रवाशांच्या प्रतिसादानुसार बसेस सुरू केल्या जात असल्याचे लातूर महामंडळाच्या वतीने सांगण्यात आले. ग्रामीण भागातील नागरिकांची गैरसोय दूर करण्यासाठी बसेस सुरू करण्याची मागणी होत आहे.

पिकांचे पंचनामे करून मदत द्या

लातूर : जिल्ह्यात मागील काही दिवसांपूर्वी झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतात पाणी साचल्याने पिके पिवळी पडत असून, उत्पादनात घट होणार आहे. दरम्यान, खरिपाच्या मध्यंतरी पावसाने उघडीप दिली होती. आता समाधानकारक पाऊस झाला असला तरी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. दरम्यान, प्रशासनाने तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत करावी, अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांमधून होत आहे.

जिल्ह्यातील प्रकल्पांत मुबलक पाणीसाठा

लातूर : जिल्ह्यात समाधानकारक पावसामुळे लघु, मध्यम साठवण तलावात मुबलक प्रमाणात पाणीसाठा झाला आहे. रेणा प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरला असून, रबी हंगामातील पिकांना या पाण्यामुळे मदत होणार आहे. मसलगा, व्हटी, तिरू, देवर्जन, रेणा आदी प्रकल्पांत मुबलक प्रमाणात पाणीसाठा झाल्याने शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त होत आहे. दरम्यान, जिल्ह्यातील काही प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी मोठ्या पावसाची प्रतीक्षा आहे. आतापर्यंत जिल्ह्यात ५५० मिमीहून अधिक पाऊस झाला असल्याचे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले.