शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Railway Accident: ठाण्याजवळ रेल्वे दुर्घटना! धावत्या ट्रेनमधून ट्रॅकवर पडले प्रवासी, पाच जणांचा मृत्यू; बचावकार्य सुरू
2
नक्षलवाद्यांनी पेरलेल्या IED चा भीषण स्फोट; ASP आकाश राव शहीद, अनेक जवान जखमी
3
"सोनम धाब्यावर आली, घाबरलेली, रडत म्हणाली..."; साहिलने सांगितलं रात्री १ वाजता काय घडलं?
4
हनिमूनसाठी कौशलेंद्र-अंकिता सिक्कीमला गेले अन् नको ते घडलं; दोन आठवड्यांपासून थांगपत्ता नाही
5
Sonam Raghuvanshi : "सोनमला फाशी झालीच पाहिजे"; राजाच्या हत्येनंतर आईचा आक्रोश, घरात कशी वागायची सून?
6
सोनम, सुपारी अन् सरेंडर, समोर आला लव्ह ट्रँगल...! कोण आहे राज कुशवाह? याच्यामुळेच तर झाला नसेल राजाचा 'मर्डर'?
7
दारावर लटकून प्रवास, समोरच्या ट्रेनमधील प्रवाशांना धडक अन्...; मुंब्रामधील रेल्वे दुर्घटनेचे कारण समोर
8
"मी सिनेइंडस्ट्रीतला नाही...", मुंबई सोडून गावाला का स्थायिक झाले नाना पाटेकर?, बिग बींना सांगितलेलं कारण
9
"आम्ही कधीच चांगले मित्र नव्हतो, पण...", सोनाली बेंद्रेचा सलमान खानविषयी खुलासा, म्हणाली...
10
Vat Purnima 2025: आयुष्यात एकदा तरी 'या' पाच पुरातन वटवृक्षाला आवर्जून फेऱ्या मारा; मिळेल सिद्धी-संपत्ती!
11
'आम्ही कोणत्याही पक्षाशी...' ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेवर आदित्य ठाकरे स्पष्टच बोलले!
12
Mumbai Local: नव्या लोकलचे दरवाजे आपोआप बंद होणार, मुंबई रेल्वे अपघातानंतर प्रशासनाला जाग!
13
Raja Raghuvanshi : सोनम बेवफा! ११ मे ला लग्न, २० ला हनिमून, २३ ला हत्या; १७ दिवसांनी कोणाला केला पहिला फोन?
14
Vat Purnima 2025: सावित्रीने सत्यवानाचे प्राण वाचवले, तेव्हा यमाशी कसा झाला होता अखेरचा संवाद? वाचा!
15
अहिल्यानगर : एमपीएल क्रिकेट सामना बघून परताना गाडीचा भीषण अपघात; जळगावमधील दोन ठार, ११ जखमी
16
मुलाचा जन्म, पण उपचारादरम्यान मातेचा मृत्यू; छत्रपती संभाजीनगरात पुण्याच्या घटनेची पुनरावृत्ती
17
"मला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला", २५ वर्ष लहान अभिनेत्रीने मिथुन चक्रवर्तींवर केलेला आरोप
18
पोलिस मेघालय-मध्य प्रदेशात शोधत राहिले; 'बेवफा' सोनम प्रियकरासोबत युपीत सापडली...
19
Vat Purnima 2025: वडाची पूजा झाल्यावर 'हा' श्लोक म्हणायला विसरू नका, तरच पूर्ण होईल व्रत!
20
Vat Purnima 2025: केवळ सौभाग्यासाठी नाही, तर दीर्घायुष्यासाठी करा वटवृक्षाची पुजा!

येरोळ परिसरातील सोयाबीनवर हळद्या रोग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2021 04:26 IST

येरोळ : येरोळ व परिसरातील सोयाबीनवर सध्या हळद या रोगाचा प्रादुर्भाव दिसत असून, या रोगामुळे अनेक शेतकऱ्यांचे नुकसान होत ...

येरोळ : येरोळ व परिसरातील सोयाबीनवर सध्या हळद या रोगाचा प्रादुर्भाव दिसत असून, या रोगामुळे अनेक शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. येरोळ व परिसरात ३० टक्के सोयाबीनमध्ये घट येणार हे निश्चित असल्याचे शेतकरी सांगत आहेत. सध्या अनेक शेतकऱ्यांच्या सोयाबीन पिकावर बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. शासन आणि विमा कंपनीने संयुक्तपणे पंचनामा करून शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी येरोळ परिसरातून शेतकरी करीत आहेत.

बसेस सुरू करण्याची नागरिकांची मागणी

लातूर : कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने शहरी भागातील बसेस सुरू करण्यात आल्या आहेत. त्याच धर्तीवर ग्रामीण भागात बसेस सुरू करण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे. मुक्कामी बसेस बंद असल्याने विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिकांची गैरसोय होत आहे. त्यातच डिझेलचे दर वाढल्याने एसटी महामंडळाला अडचणींचा सामना करावा लागत असून, उत्पन्नही घटले आहे. दरम्यान, प्रवाशांच्या प्रतिसादानुसार बसेस सुरू केल्या जात असल्याचे लातूर महामंडळाच्या वतीने सांगण्यात आले. ग्रामीण भागातील नागरिकांची गैरसोय दूर करण्यासाठी बसेस सुरू करण्याची मागणी होत आहे.

पिकांचे पंचनामे करून मदत द्या

लातूर : जिल्ह्यात मागील काही दिवसांपूर्वी झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतात पाणी साचल्याने पिके पिवळी पडत असून, उत्पादनात घट होणार आहे. दरम्यान, खरिपाच्या मध्यंतरी पावसाने उघडीप दिली होती. आता समाधानकारक पाऊस झाला असला तरी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. दरम्यान, प्रशासनाने तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत करावी, अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांमधून होत आहे.

जिल्ह्यातील प्रकल्पांत मुबलक पाणीसाठा

लातूर : जिल्ह्यात समाधानकारक पावसामुळे लघु, मध्यम साठवण तलावात मुबलक प्रमाणात पाणीसाठा झाला आहे. रेणा प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरला असून, रबी हंगामातील पिकांना या पाण्यामुळे मदत होणार आहे. मसलगा, व्हटी, तिरू, देवर्जन, रेणा आदी प्रकल्पांत मुबलक प्रमाणात पाणीसाठा झाल्याने शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त होत आहे. दरम्यान, जिल्ह्यातील काही प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी मोठ्या पावसाची प्रतीक्षा आहे. आतापर्यंत जिल्ह्यात ५५० मिमीहून अधिक पाऊस झाला असल्याचे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले.