शहरं
Join us  
Trending Stories
1
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
2
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
3
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
4
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
5
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
6
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
7
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
8
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
9
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
10
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
11
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
12
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
13
शिंदेंची साथ सोडून अजित पवारांकडे...हेमलता पाटील यांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली
14
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
15
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
16
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
17
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
18
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...
19
आता Zepto वर १० मिनिटांत मिळणार प्लॉट? 'या' रिअल इस्टेट कंपनीसोबत केला मोठा करार
20
'वरण भात म्हणजे गरिबांचं जेवण', विवेक अग्निहोत्रींच्या वक्तव्यावर मराठी अभिनेत्रीचा संताप

विद्युत डीपी जळाल्याने तीन तांड्यांचा पाणीपुरवठा बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2021 04:18 IST

जळकोट : तालुक्यातील तीन तांड्यांना पाणीपुरवठा करणाऱ्या योजनेची विद्युत डीपी जळाल्याने तांड्यातील नागरिकांवर जलसंकट आले आहे. परिणामी, तेथील नागरिकांना ...

जळकोट : तालुक्यातील तीन तांड्यांना पाणीपुरवठा करणाऱ्या योजनेची विद्युत डीपी जळाल्याने तांड्यातील नागरिकांवर जलसंकट आले आहे. परिणामी, तेथील नागरिकांना ४- ५ किमीपर्यंत पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. ऐन उन्हाळ्यात पायांना चटके सोसत नागरिक घागरभर पाण्यासाठी वणवण फिरत असल्याचे दिसून येत आहे.

जळकोट तालुक्यात वाडी- तांड्यांची संख्या अधिक आहे. तालुक्यातील थावरू तांडा, मेघा तांडा आणि रावजी तांडा या तीन तांड्यांना पाणीपुरवठा करणाऱ्या पाणी याेजनांची विद्युत डीपी जळाली आहे. परिणामी, तेथील नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. थावरू तांड्याची लोकसंख्या २००, मेघा तांड्याची २००, तर रावजी तांड्याची लोकसंख्या ४०० च्या जवळपास आहे. या तिन्ही तांड्यांवर जवळपास ४ ते ५ हजार पशुधनाची संख्या आहे. मात्र, गेल्या २० दिवसांपासून पाणीपुरवठा बंद असल्याने तेथील नागरिकांना पिण्यासाठी व पशुधनासाठी फिरावे लागत आहे. त्यामुळे तेथील नागरिकांचे हाल होत आहेत.

विशेष म्हणजे, या तांड्यांवरील नागरिक स्नानासाठी दोन किमी अंतरावर असलेल्या नदीवर जात आहेत. महिलांना मात्र त्रास सहन करावा लागत आहे. या तांड्यांना वीजपुरवठा करणाऱ्या दोन्ही विद्युत डीपी बंद पडल्या आहेत. १५ दिवस उलटले तरी नवीन डीपी बसविण्यात आल्या नाहीत. त्यामुळे तेथील नागरिकांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांकडे सातत्याने अर्ज, विनंत्या केल्या. परंतु, आश्वासनांशिवाय काहीच पदरात पडत नाही. विशेष म्हणजे, राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी बैठकीस महावितरणच्या अधिकाऱ्यांना सूचना करूनही अद्यापही नवीन डीपी बसविण्यात आला नाही. त्यामुळे नागरिकांतून संताप व्यक्त होत आहे.

घागरभर पाणी मिळेना...

तांड्यास पाणीपुरवठा करणाऱ्या विद्युत डीपी जळाल्या आहेत. त्या दुरुस्त करण्यात याव्यात, अशी वारंवार महावितरणच्या अधिकाऱ्यांकडे मागणी केली. मात्र, अद्यापही दुर्लक्ष होत आहे. घागरभर पाणी मिळविण्यासाठी नागरिकांना भटकंती करावी लागत आहे. त्यामुळे तत्काळ नवीन डीपी बसविण्यात यावी, अशी मागणी सरपंच शिरीष चव्हाण यांच्यासह नागरिकांनी केली आहे.

डीपी नसल्याने समस्या...

नवीन डीपी बसविण्यासाठी अद्यापही मंजुरी मिळालेली नाही. ती मिळाल्यानंतर तत्काळ बसविण्यात येईल. गावातील इतर किरकोळ कामे पूर्ण करण्यात आली आहेत. डीपी कमी असल्यामुळे विलंब होत आहे. डीपीसाठी पाठपुरावा करण्यात येत आहे, असे नळगीर येथील साहाय्यक अभियंता तरटे यांनी सांगितले.