शहरं
Join us  
Trending Stories
1
नोकरी शोधणाऱ्यांसाठी खुशखबर ! 'या' सरकारी संस्थांमध्ये १०० टक्के पदभरतीस मान्यता
2
Video: मान गए माही... MS Dhoni ने क्रिकेट संघटनेच्या कर्मचाऱ्यांसोबत साजरा केला वाढदिवस
3
"चालक नसल्याने नवीन बससेवा सुरु करता येणार नाही"; परिवहन विभागाच्या पत्रावर राजू शेट्टींचा संताप
4
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
5
भारतीयांचा जगात डंका ! ICCच्या CEO पदी संजोग गुप्ता यांची निवड, ठरले केवळ दुसरे भारतीय
6
OYO हॉटेलमध्ये एका तासासाठी खोली कशासाठी दिली जाते? सरकारने माहिती घेण्याची मुनगंटीवारांची मागणी
7
"डार्लिंग, काम झालं..."; माय-लेकींचं अफेअर, बॉयफ्रेंडसाठी वडिलांचा काढला काटा, झाला पर्दाफाश
8
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
9
Video: "लाज वाटू द्या, गिधाडांनो"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावले, रोहिणी खडसेंचा संताप
10
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
11
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
12
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
13
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
14
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
15
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
16
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
17
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
18
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"
19
“ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदींना दोन ओळी मराठी बोलता येत नाही”; शिंदेसेनेची टीका
20
ब्रायन लाराचा ४०० धावांचा विक्रम थोडक्यात बचावला, फलंदाज ३६७ धावांवर नाबाद असताना घडलं असं काही...  

२८ गावांतील पाणीपातळी खालावली, शेतकरी सिंचन विहिरीपासून वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2021 04:22 IST

चाकूर : शेतीत सिंचनाची सुविधा व्हावी आणि शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारावी म्हणून शासनाच्यावतीने मग्रारोहयोअंतर्गत सिंचन विहीर खोदकाम करण्यात येते. ...

चाकूर : शेतीत सिंचनाची सुविधा व्हावी आणि शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारावी म्हणून शासनाच्यावतीने मग्रारोहयोअंतर्गत सिंचन विहीर खोदकाम करण्यात येते. मात्र, तालुक्यातील २८ गावांतील पाणीपातळी खालावल्याने या गावांतील शेतकऱ्यांना २५ वर्षांपासून मग्रारोहयोअंतर्गतच्या विहिरींचा लाभ मिळेनासा झाला आहे. परिणामी, शेती उत्पादन वाढेनासे झाले आहे. विशेष म्हणजे, या गावांत पूर्वी दरवर्षी जवळपास १४० पेक्षा जास्त विहिरी मिळू शकत हाेत्या. मात्र, सध्या त्यांचा लाभ मिळत नाहीत.

तालुक्यातील पाणी पातळीचा भूजल विकास आणि भूविकास यंत्रणेकडून सर्व्हे करण्यात आला होता. त्यात तालुक्यातील बनसावरगाव, भाटसांगवी, लातूर रोड, बोळेगाव, मोहनाळ, तिवघाळ, तिवटघाळ, अजनसोंडा (खु.), आटोळा, मोहदळ, बावलगाव, वडवळ (नागनाथ), हटकरवाडी, कबनसांगवी, कडमुळी, महाळंग्रा, महाळंग्रावाडी, नागेशवाडी, मुरंबी, उजळंब, नळेगाव, लिंबाळवाडी, शिवपूर अशा २८ गावांचा समावेश असून, येथील भूजल पातळी खालावली असल्याचा अहवाल प्राप्त झाला होता. जवळपास २५ वर्षांपासून या भागातील पाणीपातळी खालावली आहे. अशा परिस्थितीत भूजल विकास यंत्रणेकडून पाणी पातळी वाढविण्यासाठी कोणते प्रयत्न करण्यात आले, हे गुलदस्त्यात आहे. अटल योजना राबविण्यात येत असल्याचे सांगण्यात येते. परंतु, प्रत्यक्षात कोणतीही योजना राबविण्यात आली नाही.

शेतक-यांचे सिंचनाचे क्षेत्र वाढावे आणि शेतक-यांची आर्थिक प्रगती व्हावी म्हणून शासनाच्यावतीने मग्रारोहयोतून गावातील लोकसंख्येच्या निकषानुसार शेतक-यांना सिंचन विहीर दिल्या जातात. परंतु, भूजल पातळी खालावली असल्याने या २८ गावांतील शेतकरी सिंचन विहिरीच्या योजनेपासून वंचित आहेत. सिंचन विहिरींचा लाभ या भागातील शेतक-यांना मिळत नाही.

भूजल पाणी पातळी वाढविण्यासाठी बनसावरगाव ग्रामपंचायतीसह अन्य ग्रामपंचायतींनी नाला सरळीकरण, नदीचे खोलीकरण, सीएनबी बंधारे, शोषखड्डे आदी कामे केली आहेत. त्यामुळे गावातील बंद पडलेले बोअर, हातपंपास पाणी येऊ लागले आहे. बोळेगाव (खु.) येथील साठवण तलावामुळे पाणीपातळी वाढण्यास मदत झाली आहे. दरम्यान, या भागातील पाणीपातळीत काही प्रमाणात वाढ झाली आहे. परंतु, भूविकास यंत्रणेकडून त्यासंदर्भातील अहवाल अद्याप मिळाला नसल्याने पाणीपातळीत वाढ झाल्याचे स्पष्ट होत नाही.

अहवाल मागविण्यात येईल...

तालुक्यातील २८ गावांतील पाणीपातळी खालावली असल्याचा अहवाल असल्याने त्या गावातील शेतक-यांना मग्रारोहयोअंतर्गत सिंचन विहीर मंजूर करता येत नाही. पाणी पातळीसंदर्भातील भूजल विभागाचा अहवाल मागवून घेऊन पाहणी करण्यात येईल. त्यानंतर योग्य ती कार्यवाही केली जाईल.

- डॉ. शिवानंद बिडवे, तहसीलदार.

खोलीकरण, शोषखड्डयांची कामे...

बनसावरगाव येथे नदीचे खोलीकरण, शोषखड्डे करण्यात आले आहेत. त्यामुळे पाणी पातळीत वाढ होण्यास मदत झाली आहे. तसेच अन्य काही ग्रामपंचायतींनी ही कामे केली आहेत. त्यामुळे या २८ गावांतील पाणीपातळीची पाहणी करण्यात यावी. भूजल पातळी वाढली असेल, तर सिंचन विहिरींना मंजुरी द्यावी.

- नीलेश भंडे, सरपंच, बनसावरगाव.

शेतक-यांची अडचण...

२५ वर्षांपासून २८ गावांतील शेतकरी मग्रारोहयोच्या सिंचन विहिरींपासून वंचित आहेत. या भागातील पाणी पातळीत निश्चित वाढ झाली आहे. प्रशासनाने सिंचन विहिरींसाठी घातलेली बंदी उठवावी आणि जास्तीत-जास्त विहिरी मंजूर कराव्यात.

- अब्दुल रहिम शेख, शेतकरी.