शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेच्या पावसाळी अधिवेशनासाठी सरकारचा भरगच्च आर्थिक अजेंडा
2
"साहेब, तुम्ही जे म्हणता तेच..."; राज ठाकरेंचा व्हिडीओ केला पोस्ट, मनसेचा नेता काय म्हणाला?
3
उत्तर महाराष्ट्रात भाजपाची ताकद वाढणार; पुढील ४८ तासांत २ माजी आमदारांचा पक्षप्रवेश होणार
4
भारताने पाकिस्तानला नकाशावरून हटवले असते; इंडोनेशियात खुलासा, अणुयुद्ध झाले असते तर काय घडलं असते?
5
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
6
‘कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरण माध्यमांतूनच कळाले’
7
पाकिस्तानमध्ये तुफान चालतोय 'सरदार जी ३', दिलजीतची सोशल मीडियावर माहिती; होतेय टीका
8
Today's Horoscope: आर्थिक बाबतीत मात्र सावध राहावे लागेल, काय सांगतेय तुमची राशी? 
9
गुंतवणुकीसाठी सुवर्णसंधी ! बाजारात ७ आयपीओ होणार खुले; योग्य कंपनी निवडल्यास होऊ शकतो फायदा
10
भाजपच्या नव्या अध्यक्षांची निवड लवकरच; प्रधान आघाडीवर, पावसाळी अधिवेशनापूर्वी प्रक्रिया होऊ शकते पूर्ण
11
राज्य सरकारला घेरण्याची विरोधी पक्षांची रणनीती; मविआचा सरकारच्या चहा पानावर बहिष्कार, जनतेला वाऱ्यावर सोडले
12
प्रशासकीय सीमा ३१ डिसेंबरला होणार ‘फ्रीझ’, जनगणना : नंतर होणार नाही नवे गाव, जिल्हा, महापालिका
13
विकले जात राहणे हेच पाकिस्तानचे नशीब
14
अधिवेशनाकडून अपेक्षा; विरोधक हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशनापूर्वीच एकवटले
15
कार्ला येथील एकवीरा मंदिरात ड्रेसकोड; ७ जुलैपासून नव्या नियमांची अंमलबजावणी
16
लुटालुटीला आरटीओची मूक संमती? अधिकृत रिक्षा स्टॅंडवर दरपत्रकच नाही; कल्याण आरटीओ क्षेत्रातील वास्तव
17
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
18
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
19
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
20
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले

उदगिरातील रेल्वे रुळानजीकच्या खड्ड्यांमुळे वाहनधारक हैराण !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:43 IST

उदगीर : शहरातील समतानगर भागाच्या मार्गावर असलेल्या रेल्वे रुळावरून वाहतुकीसाठी दिवसातून किमान २० वेळा रेल्वे फाटक पडते. त्यामुळे सातत्याने ...

उदगीर : शहरातील समतानगर भागाच्या मार्गावर असलेल्या रेल्वे रुळावरून वाहतुकीसाठी दिवसातून किमान २० वेळा रेल्वे फाटक पडते. त्यामुळे सातत्याने वाहतूक ठप्प होते. दरम्यान, या रुळाच्या बाजूला गुडघाभर खड्डा पडला असून त्याचा वाहनधारकांना त्रास होत आहे. पावसाळ्यात खड्ड्यात पाणी साचत असल्याने अनेकदा अंदाज येत नाही. परिणामी, सतत किरकोळ अपघाताच्या घटना घडत आहेत. याकडे रेल्वे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.

येथील रेल्वे स्थानकाच्या ३०० मीटरच्या अंतरावर समता नगर व उदगीर शहराला जोडणाऱ्या भागावर दक्षिण- मध्य रेल्वेचे फाटक आहे. या रुळावरून दिवसातून किमान २० वेळा रेल्वे व मालवाहतुकीच्या गाड्या धावत असतात. त्यामुळे या ठिकाणी रेल्वे येण्याअगोदर किमान १५ मिनिटे फाटक बंद करण्यात येते. शहरातील समतानगर, संतोषीमातानगर, डॅम रोड, गोपाळनगर, क्रांतीनगर, नेत्रगाव, येणकी, मानकी, देवणी या भागांत जाणाऱ्या वाहनांना हा रेल्वे रूळ ओलांडून ये- जा करावी लागते.

समतानगर, गोपाळनगर, रेल्वे स्टेशनसमोरील भाग, संतोषीमातानगर, क्रांतीनगर आदी भागांत शहरातील किमान ३० टक्के वसाहत आहे. विधानसभा निवडणुकीवेळी या भागातील नागरिकांनी प्रशासनाने भुयारी मार्गाचे खुला करून द्यावा, या मागणीसाठी मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला होता. तेव्हा स्थानिक प्रशासन व दक्षिण-मध्य रेल्वेचे विभागीय अभियंता यांच्यात बैठक होऊन रेल्वे गेटच्या पलीकडे असलेला भुयारी मार्ग स्थानिक प्रशासनाने खुला करण्याचे व त्यासाठीचे अंदाजपत्रक तयार करणे आणि इतर मदत रेल्वे विभागाने पुरविण्याचे ठरले होते.

दररोज दुचाकीचे जवळपास २० अपघात...

रेल्वेच्या भुयारी मार्गाचा प्रश्न प्रलंबित असतानाच या गेटवर रेल्वेच्या रुळाच्या बाजूला गुडघाभर खड्डे निर्माण झाले आहेत. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने खड्ड्यात पाणी साचते. त्यामुळे खड्ड्याचा अंदाज येत नाही. परिणामी, दररोज किमान १५ ते २० दुचाकीस्वार पडतात. तसेच चारचाकी वाहनाचे टायर खड्ड्यात गेल्यामुळे रेल्वे गेटनजीक थांबलेल्या दुचाकीस्वारांच्या अंगावर घाण पाणी पडून संपूर्ण कपडे चिखलाने माखले जातात. रेल्वे रुळाचा व त्याच्या आजूबाजूच्या रस्त्याची डागडुजी करण्याची जबाबदारी रेल्वे खात्याची असते; परंतु मागील दोन महिन्यांपासून पडलेल्या छोट्या खड्ड्यांचे रूपांतर आता गुडघाभर खड्ड्यात झाले. याकडे रेल्वे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. रेल्वेच्या ढिसाळ कारभाराबद्दल नागरिकांतून संताप व्यक्त होत आहे. हे खड्डे लवकरात लवकर बुजवून होणारा त्रास दूर करावा, अशी मागणी होत आहे.