शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेचे नौदल भारताच्या साथीला! 12 कोटी डॉलर्सचे तंत्रज्ञान देणार, नौदल समुद्रात आरपार लक्ष ठेवू शकणार...
2
दहशतवाद विरोधी लढाईत भारताला पूर्ण पाठिंबा; अमेरिकेची घोषणा, ट्रम्प-मोदींमध्ये चर्चा
3
पाकिस्तानचं जितकं आहे संरक्षण बजेट, त्यापेक्षा तिप्पट आहे भारताचं एप्रिलचं GST कलेक्शन; जाणून घ्या
4
मे महिन्यात ६ ग्रहांचे गोचर: ६ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; भरघोस नफा, लक्ष्मी कृपा-भरभराट!
5
...तर बांगलादेशने ईशान्येकडील सातही राज्ये ताब्यात घ्यावीत; भारताविरोधात बांगलादेशने ओकली गरळ
6
'भारताने दहशतवाद्यांविरोधात कारवाई करावी, पण युद्धाची परिस्थिती...'; पहलगाम हल्ल्यावर जेडी व्हान्स यांनी सोडलं मौन
7
PPF मध्ये काय असतो ५ तारखेचा फंडा, एक दिवस उशिर आणि होऊ शकतं १० हजारांपर्यंतचं नुकसान; समजून घ्या गणित
8
'आम्हाला युद्ध नकोय, पण...'; पंतप्रधान मोदींचं नाव घेत बिलावल भुत्तो आता काय बोलले?
9
जातनिहाय जनगणनेसाठी कालमर्यादा हवी; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची केंद्राकडे मागणी
10
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातल्यावर सुनील शेट्टी म्हणाला, "क्रिकेट..."
11
सर्व दहशतवाद्यांचा शोध घेऊ, पहलगाम हल्ल्यानंतर अमित शहांचा मोठा इशारा; दहशतवादाविरोधात कठोर कारवाई
12
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
13
वैदिक मंत्रोच्चाराने उघडले केदारनाथ मंदिराचे दार; सर्वत्र 'बम बम भोले'चा जयजयकार
14
आजचे राशीभविष्य,२ मे २०२५: समोरून आलेल्या संधीचा फायदा उठवता येणार नाही
15
देशाची आर्थिक राजधानी, डिजिटल शर्यतीत मागे; मुंबईत फायबर टाकणे सर्वात महाग
16
सकाळी उद्घाटन केल्यास त्रास कमी होतो; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मिश्कील टिप्पणी
17
तीन महिन्यांत ३६ हजार पर्यटकांकडून नागझिरा व्याघ्र प्रकल्पाची सफारी; सिमेंट काँक्रीटच्या जंगलाला कंटाळलेल्या नागरिकांचा आता वन पर्यटनाकडे वाढता कल
18
काय म्हणावं.. प्रेम एकीशी; लग्न मात्र तिच्या मैत्रिणीशी; लग्नाचे आमिष दाखवून त्याने तिच्याशी शरीरसंबंध ठेवले
19
देशावर संकट, पण शत्रू भारताचे वाकडे करू शकणार नाहीत; भेंडवळ घटमांडणीचे भाकीत
20
दहशतवादी कुठून आले, कुठे गेले? करणार तपास; ३ डी मॅपिंगद्वारे शोध; एनआयए प्रमुख सदानंद दाते बैसरन खोऱ्यात

उदगिरातील रेल्वे रुळानजीकच्या खड्ड्यांमुळे वाहनधारक हैराण !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:43 IST

उदगीर : शहरातील समतानगर भागाच्या मार्गावर असलेल्या रेल्वे रुळावरून वाहतुकीसाठी दिवसातून किमान २० वेळा रेल्वे फाटक पडते. त्यामुळे सातत्याने ...

उदगीर : शहरातील समतानगर भागाच्या मार्गावर असलेल्या रेल्वे रुळावरून वाहतुकीसाठी दिवसातून किमान २० वेळा रेल्वे फाटक पडते. त्यामुळे सातत्याने वाहतूक ठप्प होते. दरम्यान, या रुळाच्या बाजूला गुडघाभर खड्डा पडला असून त्याचा वाहनधारकांना त्रास होत आहे. पावसाळ्यात खड्ड्यात पाणी साचत असल्याने अनेकदा अंदाज येत नाही. परिणामी, सतत किरकोळ अपघाताच्या घटना घडत आहेत. याकडे रेल्वे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.

येथील रेल्वे स्थानकाच्या ३०० मीटरच्या अंतरावर समता नगर व उदगीर शहराला जोडणाऱ्या भागावर दक्षिण- मध्य रेल्वेचे फाटक आहे. या रुळावरून दिवसातून किमान २० वेळा रेल्वे व मालवाहतुकीच्या गाड्या धावत असतात. त्यामुळे या ठिकाणी रेल्वे येण्याअगोदर किमान १५ मिनिटे फाटक बंद करण्यात येते. शहरातील समतानगर, संतोषीमातानगर, डॅम रोड, गोपाळनगर, क्रांतीनगर, नेत्रगाव, येणकी, मानकी, देवणी या भागांत जाणाऱ्या वाहनांना हा रेल्वे रूळ ओलांडून ये- जा करावी लागते.

समतानगर, गोपाळनगर, रेल्वे स्टेशनसमोरील भाग, संतोषीमातानगर, क्रांतीनगर आदी भागांत शहरातील किमान ३० टक्के वसाहत आहे. विधानसभा निवडणुकीवेळी या भागातील नागरिकांनी प्रशासनाने भुयारी मार्गाचे खुला करून द्यावा, या मागणीसाठी मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला होता. तेव्हा स्थानिक प्रशासन व दक्षिण-मध्य रेल्वेचे विभागीय अभियंता यांच्यात बैठक होऊन रेल्वे गेटच्या पलीकडे असलेला भुयारी मार्ग स्थानिक प्रशासनाने खुला करण्याचे व त्यासाठीचे अंदाजपत्रक तयार करणे आणि इतर मदत रेल्वे विभागाने पुरविण्याचे ठरले होते.

दररोज दुचाकीचे जवळपास २० अपघात...

रेल्वेच्या भुयारी मार्गाचा प्रश्न प्रलंबित असतानाच या गेटवर रेल्वेच्या रुळाच्या बाजूला गुडघाभर खड्डे निर्माण झाले आहेत. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने खड्ड्यात पाणी साचते. त्यामुळे खड्ड्याचा अंदाज येत नाही. परिणामी, दररोज किमान १५ ते २० दुचाकीस्वार पडतात. तसेच चारचाकी वाहनाचे टायर खड्ड्यात गेल्यामुळे रेल्वे गेटनजीक थांबलेल्या दुचाकीस्वारांच्या अंगावर घाण पाणी पडून संपूर्ण कपडे चिखलाने माखले जातात. रेल्वे रुळाचा व त्याच्या आजूबाजूच्या रस्त्याची डागडुजी करण्याची जबाबदारी रेल्वे खात्याची असते; परंतु मागील दोन महिन्यांपासून पडलेल्या छोट्या खड्ड्यांचे रूपांतर आता गुडघाभर खड्ड्यात झाले. याकडे रेल्वे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. रेल्वेच्या ढिसाळ कारभाराबद्दल नागरिकांतून संताप व्यक्त होत आहे. हे खड्डे लवकरात लवकर बुजवून होणारा त्रास दूर करावा, अशी मागणी होत आहे.