शहरं
Join us  
Trending Stories
1
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं, गौरीकुंडजवळ अपघात; सात जणांचा मृत्यू झाल्याची शक्यता
2
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
3
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
4
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
5
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
6
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
7
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
8
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
9
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
10
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
11
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
12
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
13
अग्रलेख: ‘ती’च्यावर गर्भाशय काढण्याची वेळ का येते?
14
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
15
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन
16
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
17
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
18
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
19
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
20
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा

उदगीर कृषी उत्पन्न बाजार समितीत सोयाबीनचा दर ४ हजार ३२५ रुपयांवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2021 04:17 IST

उदगीर : केंद्र सरकारने आयात खाद्यतेलाच्या किंमती नियंत्रणात ठेवण्याच्या उद्देशाने मागील महिन्यात आयात शुल्कात १० टक्के कपात केली होती. ...

उदगीर : केंद्र सरकारने आयात खाद्यतेलाच्या किंमती नियंत्रणात ठेवण्याच्या उद्देशाने मागील महिन्यात आयात शुल्कात १० टक्के कपात केली होती. त्यामुळे गत महिन्यात सोयाबीनच्या दरात घसरण झाली होती. परंतु, तेलाला मागणी चांगली असल्याने सोयाबीनचे दर वाढले आहेत. शनिवारी ४ हजार ३२५ रुपये प्रति क्विंटल असा दर मिळाला. दरम्यान, खाद्यतेलाचे दरही वाढल्याने सर्वसामान्य ग्राहक हैराण झाले आहेत.

केंद्र शासनाने यंदा सोयाबीनला ३ हजार ८८० रुपये हमीभाव जाहीर केला आहे. गेल्या वर्षीच्या हमीभावाच्या तुलनेत १७० रुपयांची वाढ करण्यात आली. सोयाबीनवर प्रक्रिया करणा-या उद्योजकांकडून वाढती मागणी असल्याने सोयाबीनचे दर गेल्या महिन्यात ४ हजार २५० रुपये प्रति क्विंटलपर्यंत पोहोचले होते. आता टप्प्या- टप्प्याने त्यात आणखीन वाढत होऊन ४ हजार ५५० रुपये प्रति क्विंटलपर्यंत पोहोचले.

शासनाने वाढत्या खाद्यतेलाच्या किंमती नियंत्रणात ठेवण्याच्या उद्देशाने खाद्य तेलावरील आयात शुल्क दहा टक्के कपात केली. परंतु खाद्य तेलाला चांगली मागणी असल्याने सोयाबीनच्या दरात दिवसेंदिवस वाढ होत असल्याने शनिवारी उदगीरच्या मार्केट यार्डात सोयाबीनला आतापर्यंतचा सर्वोच्च ४ हजार ३२५ रुपये प्रति क्विंटल असा दर मिळाला.

दोन- अडीच महिन्यांपासून कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्केट यार्डात नवीन सोयाबीनची आवक सुरु झाली आहे. सुरुवातीला परतीच्या पावसाने सोयाबीनचे नुकसान झाल्याने डागी मालाची आवक झाली होती. परंतु, मागील महिन्यापासून चांगल्या प्रतीच्या सोयाबीनची आवक वाढली आहे. आवक मोठ्या प्रमाणात होऊनही सोयाबीनवर प्रक्रिया करणाऱ्या स्थानिक व बाहेरील कारखानदारांकडून चांगली मागणी होती. त्यातच सोयाबीनच्या तेलालाही उठाव असल्याने कारखानदार व साठा करणाऱ्या व्यापाऱ्यांनी जोरदार खरेदी केली. बाजारात खाद्यतेलाच्या किंमती वाढत असल्याने सामान्य ग्राहकांत नाराजीचे सूर उमटत आहेत. त्यामुळे शासनाने आंतरराष्ट्रीय बाजारातून आयात होणाऱ्या खाद्यतेलाच्या किंमतीवरील शुल्कात १० टक्के कपात केल्याने खाद्य तेलाच्या किमती काही दिवस कमी झाल्या होत्या. परंतु, मागणी वाढत असल्याने सोयाबीनचे दर पुन्हा वाढू लागले आहेत. मागील महिन्यात चार हजारापर्यंत खाली आलेले दर टप्या-टप्प्याने वाढून शनिवारी उदगीर बाजार समितीत सर्वाधिक ४ हजार ३२५ रुपये प्रति क्विंटल दराने सोयबीनची विक्री झाली. सर्वसाधारण भाव ४ हजार २९० प्रति क्विंटल असा मिळाला. त्यामुळे शेतकऱ्यांत समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रतिकुल घडणाऱ्या घडामोडी आणि देशांतर्गत बाजारपेठेतील वाढती मागणी कमी झाली आहे. वाढत्या खाद्य तेलाच्या किंमती नियंत्रणात ठेवण्याच्या उद्देशाने ३७ टक्के असलेले आयात शुल्क २७ टक्क्यांपर्यंत कमी करण्यात आले. परंतु, मागणी चांगली असल्याने सोयाबीनचे दर वाढले आहेत. सध्या कोणतेही खाद्य तेल १४० रुपये प्रति किलोच्या खाली उपलब्ध नाही. त्यामुळे आता सोयाबीन विक्रीची ही योग्य वेळ आहे. कारण सोया पेंडीला मागणी नाही. केवळ तेलाच्या आधारावर दर ठरत आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात खाद्य तेलाचे दर घसल्यास सोयाबीनला फटका बसू शकतो.

- बालाजी बच्चेवार, व्यापारी.