शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरे 'शिवतीर्थ'हून निघाले, कार थांबवली, काच खाली केली अन् म्हणाले, "मातोश्री'वर चाललोय...!"
2
महाराष्ट्रात विधानसभेची ‘मॅच’ कुणी ‘फिक्स’ केली?; राहुल गांधींचा आरोप, CM फडणवीस म्हणाले...
3
Video: मोठा अपघात टळला! केदारनाथकडे जात असतानाच हेलिकॉप्टरमध्ये बिघाड, 'महामार्गा'वर एमर्जन्सी लँडिंग
4
Video: ५ दिवसांपूर्वीच झाला साखरपुडा; दुकानात बोलता बोलता युवकाला आला हार्ट अटॅक
5
राहुल गांधींच्या लेखाने राजकीय भूंकप, विधानसभा निवडणूक फिक्सिंगची चौकशी का करत नाही?: सपकाळ
6
राज्यातील महाराष्ट्रविरोधी सरकार घालवायला ठाकरे बंधू एकत्र येत असतील तर स्वागत: वडेट्टीवार
7
१३ जूनला फोकसमध्ये असतील अदानींच्या 'या' कंपनीचे शेअर्स, तुमचीही गुंतवणूक आहे का?
8
"मी गावचा माणूस, मला इंग्रजी समजत नाही"; शिक्षणमंत्र्यांनी विद्यार्थिनीसमोर पकडले कान
9
तुम्हाला गुंतवणूकीचा ६०:४० चा नियम माहितीये? पैसे कमावण्याची आहे सोपी पद्धत, जाणून घ्या कसं?
10
Raja Raghuvanshi : सस्पेन्स वाढला! राजा आणि सोनमचं मेघालयमध्ये झालं भांडण? भावाला आल्या धमक्या
11
Fact Check: पाकिस्तानचा क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीचं निधन? व्हायरल व्हिडीओमागील सत्य समोर!
12
३० लाखांच्या होम लोनवर वाचतील ४.६३ लाख; आपली कर्जाची रक्कम टाका आणि पाहा किती होईल बचत?
13
Astrology: राहू दशा सुरु झाली हे कसं ओळखावं? राहूमुळे कोणकोणती हानी होते? वाचा!
14
'सुनील तटकरेंनी राजीनामा द्यायला पाहिजे, त्यांनी दिला तर मी नक्की देईन', आमदार महेंद्र थोरवेंचा घणाघात
15
स्कूटरवरून आले, सामान हॉटेलमध्ये ठेवलं अन्...; राजा आणि सोनम बेपत्ता होण्यापूर्वीच्या CCTV व्हिडीओमध्ये काय?
16
“२ तास गोंधळ, मतमोजणी हायजॅक, मोदींचा वाराणसीत जवळपास पराभवच झाला होता”; कुणाचा दावा?
17
एकटं राहायला आवडतं? उषा नाडकर्णी म्हणाल्या, "आमच्या इमारतीत राज ठाकरेंची मावशी..."
18
म्युच्युअल फंड गुंतवणूकदाराचा अचानक मृत्यू झाला तर पैशांचं काय होतं? पाहा महत्त्वाची माहिती आणि प्रक्रिया
19
Astrology: पत्रिका मंगळाची असेल तर सगळेच अमंगल होते का? काय आहे त्यावर उपाय? वाचा!
20
Rahul Gandhi: महाराष्ट्र विधानसभेत 'मॅच फिक्सिंग', राहुल गांधींचा आरोप; भाजपचा पलटवार!

जिल्ह्यात दोन वर्षांत ८१ विद्यार्थी प्रस्तावांना मिळाले सानुग्रह अनुदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2020 04:17 IST

शालेय विद्यार्थ्यांचा पाण्यात बुडून, चक्कर येऊन, सर्पदंश, विजेचा शाॅक लागून व इतर कारणांमुळे मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबियास राजीव गांधी ...

शालेय विद्यार्थ्यांचा पाण्यात बुडून, चक्कर येऊन, सर्पदंश, विजेचा शाॅक लागून व इतर कारणांमुळे मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबियास राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजनेअंतर्गत ७५ हजार रुपये दिले जातात. ही योजना शिक्षण विभागाच्या वतीने राबविली जाते. त्यानुसार जिल्ह्यात मागील दोन वर्षांत ८१ विद्यार्थ्यांचा विविध कारणांमुळे मृत्यू झाला आहे. यात पाण्यात बुडून ९, विजेचा शाॅक लागून ३, अपघात ६, चक्कर येऊन १ तर अन्य कारणांमुळे ६२ विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे. शिक्षण विभागाने सर्व मयत विद्यार्थ्यांचे प्रस्ताव मंजूर करण्यात आले आहेत. यामध्ये २०१७-१८ व २०१८-२०१९ या वर्षाचा समावेश आहे.

२०१७-१८ मध्ये ६० तर २०१८-१९ मध्ये २१ प्रस्ताव

२०१७-१८ या शैक्षणिक वर्षात प्राथमिक शिक्षण विभागाकडे ६० प्रस्ताव राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजनेसाठी दाखल झाले होते. तर २०१८-१९ या वर्षात २१ प्रकरणे दाखल झाली होती. यामध्ये औसा, लातूर, जळकोट, देवणी, निलंगा, कासार बालकुंदा, किल्लारी, उदगीर, वांजरवाडा, गंगापूर, कासारशिरसी, टाका आदी ठिकाणच्या प्रस्तावांचा समावेश आहे.

विविध कारणांमुळे मृत्यू झालेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांना आर्थिक साह्य करण्यासाठी राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजना राबविली जाते. त्या अंतर्गत दोन वर्षांत ८१ प्रस्ताव मंजूर करण्यात आले आहेत. अनुदान संबंधितांच्या बँक खात्यावर वर्ग करण्यात आले आहे.

- भगवान फुलारी,

प्र. शिक्षणाधिकारी

शालेय विद्यार्थ्यांचा पाण्यात बुडून, चक्कर येऊन, सर्पदंश, विजेचा धक्का लागून तसेच इतर कारणांमुळे मृत्यू झाल्यास कुटुंबियांना मदतीसाठी सदरील योजना राबविली जाते. शिक्षण विभागाच्या वतीने प्राप्त प्रस्तावांवर तात्काळ कारवाई करण्यात आली. त्यामुळे सर्व प्रस्ताव मंजूर झाले. शाळास्तरावरही या योजनेची माहिती पोहोचविली जात असल्याचे शिक्षण विभागाच्या वतीने सांगण्यात आले.