शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

गणेशोत्सवामुळे ट्रॅव्हल्सची भाडेवाढ; मुंबईसाठी द्यावे लागतात अधिकचे पैसे !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2021 04:26 IST

अहमदपूर : गणेशोत्सवामुळे इतर शहरांकडे जाण्याला नागरिकांची पसंती असते. अनेक नागरिक पर्यटनासाठी व आपल्या गावी जाण्यासाठी बाहेर पडतात. याचाच ...

अहमदपूर : गणेशोत्सवामुळे इतर शहरांकडे जाण्याला नागरिकांची पसंती असते. अनेक नागरिक पर्यटनासाठी व आपल्या गावी जाण्यासाठी बाहेर पडतात. याचाच फायदा सध्या खासगी ट्रॅव्हल्सवाले घेताना दिसत आहेत. सुटीच्या पार्श्वभूमीवर खासगी ट्रॅव्हल्सच्या भाड्यात वाढ झाली असून, एसटी व खासगी ट्रॅव्हल्सच्या भाड्याची तुलना करता दोघांमध्ये फारशी तफावत दिसून येत नाही. त्यामुळे लोक खासगी ट्रॅव्हल्सलाच प्राधान्य देत आहेत.

गणेशोत्सवानिमित्त गावी जाण्यासाठी नागरिकांची लगबग सुरू आहे. ऐन सणासुदीत अचानक भाडेवाढ करण्याचा निर्णय खासगी बस वाहतूकदारांनी घेतला आहे. परिणामी प्रवास करताना प्रवाशांच्या खिशाला कात्री लागत आहे. मोठ्या प्रमाणात नागरिक खासगी बसमधून प्रवास करताना दिसून येत आहे.

प्रवाशांना फटका...

गणेशोत्सव, महालक्ष्मी या सणासाठी नागरिक मोठ्या प्रमाणात आपल्या गावाकडे येतात. खासगी वाहनधारकांनी मोठ्या प्रमाणात तिकिटामध्ये भाडेवाढ केल्यामुळे प्रवाशांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. - राजेश चिलकरवार

अहमदपूर तालुक्यातील बरीच कुटुंबे उदरनिर्वाहासाठी मुंबई, पुणे शहरांत कामास आहेत. त्यांना सणासुदीच्या काळात मुंबई, पुण्याकडून गावाकडे परत येताना व जाताना अचानकपणे तिकिटामध्ये वाढ केली जात असल्यामुळे आर्थिक त्रास सहन करावा लागत आहे. - कृष्णा मुंडे

अहमदपूर - मुंबई आधीचे दर ७०० आताचे दर ९००

अहमदपूर- नागपूर आधीचे दर ७०० आताचे दर १०००

अहमदपूर - पूणे आधीचे दर ७०० आताचे दर ९००

अहमदपूर- औरंगाबाद आधीचे दर ६०० आताचे दर ८००

दोन वर्षांनंतर बरे दिवस...

कोरोनामुळे बसेस काही दिवस बंदच होत्या. त्यामुळे आर्थिक अडचणींचा सामना करावा लागला. सतत डिझेलचे भाव वाढत असल्याने नाइलाजास्त तिकिटांचे दर वाढवावे लागले आहेत. सणासुदीत ट्रॅव्हल्सला नागरिकांची पसंती असते. इतर वेळेत बसेस रिकाम्याच धावतात. परिणामी, खर्च वाढल्याने दरवाढ करण्यात आली आहे. - रमेश देशमुख, ट्रॅव्हल्स मालक

गेल्या दीड वर्षांपासून कोरोनामुळे ट्रॅव्हल्स व्यवसाय संकटात आला आहे. आता परिस्थिती पूर्वपदावर येत असली तरी डिझेलचे भाव सतत वाढत आहेत. सणासुदीत प्रवाशांची गर्दी असते. नुकसान भरून काढण्यासाठी पर्याय नसल्याने दरवाढ केली जात आहे. वाढत्या महागाईमुळे खर्च भागविणे अवघड झाले आहे. त्यामुळे नागरिकांनी सहकार्य करणे गरजेचे आहे. - ट्रॅव्हल्स मालक