शहरं
Join us  
Trending Stories
1
NIA प्रमुख सदानंद दाते आता महाराष्ट्राचे नवे पोलिस महासंचालक, ३ जानेवारीला स्वीकारणार पदभार
2
नाशिक-सोलापूर-अक्कलकोट कॉरिडोरला केंद्राचा हिरवा कंदील; प्रवास वेळेत 17 तासांची बचत होणार
3
गुंतवणूकदारांची 'चांदी'! वर्षाच्या शेवटच्या दिवशी ४ लाख कोटींची कमाई; मेटल आणि रिलायन्स शेअर्समध्ये धूम
4
Municipal Election 2026: कल्याण, पनवेल, धुळ्यात भाजपाचा 'विजयारंभ'! सहा उमेदवार बनले बिनविरोध 'नगसेवक'
5
गुंतवणूक सोन्यात की शेअर बाजारात? ३ लाखांच्या सोन्यावर पुढील वर्षी किती नफा मिळेल? सोपं गणित
6
थर्टी फर्स्टचा जल्लोष पहाटेपर्यंत! हॉटेल आणि बार पहाटे ५ वाजेपर्यंत सुरू राहणार; राज्य सरकारचा मोठा निर्णय
7
नशीब असावं तर असं! राष्ट्रवादीतून भाजपात आल्या आणि २४ तासांत झाल्या नगरसेविका, धुळ्यात उज्वला भोसले बिनविरोध
8
कोट्यवधीची रोकड, सोने हिऱ्यांनी भरलेली बॅग अन् बरेच काही...; ED च्या हाती कुणाचं लागलं 'घबाड'?
9
'ऑपरेशन सिंदूर'वर लष्कर-ए-तैयबा प्रमुख हाफिज सईदचे मोठे वक्तव्य; म्हणाला- 'भारत पुढील 50 वर्षे...'
10
Happy New Year 2026 Wishes: नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Quotes, Messages, WhatsApp Status शेअर करत स्वागत करा नव्या वर्षाचं!
11
Nimesulide Banned: निमसुलाइड औषधावर सरकारनं घातली बंदी, किडनीसाठी अत्यंत धोकादायक!
12
मुंबई महापालिकेसाठी भाजपाची १३७ उमेदवारांची यादी जाहीर; किती अमराठी उमेदवारांना दिली संधी?
13
शिंदेसेनेचे स्वबळावर ७४ उमेदवार! महायुतीचे जागावाटप बारगळले; निवडणूक होणार चुरशीची
14
KDMC Election 2026: कल्याण डोंबिवलीत मतदानाआधीच तीन ठिकाणी फुललं कमळ, भाजपाचे ३ नगरसेवक बिनविरोध 
15
Solapur Municipal Corporation Election 2025 : सोलापूरात मोठी राजकीय खेळी! ठाकरेंच्या जिल्हाप्रमुखाने ऐनवेळेला भाजपाकडून भरला फॉर्म
16
धनंजय मुंडे यांना दिलासा! करुणा मुंडे यांची याचिका कोर्टाने फेटाळली, काय होतं प्रकरण?
17
भांडवलशाहीचा 'भीष्म पितामह' निवृत्त! दिवाळखोर कंपनीतून वॉरेन बफेंनी कसे उभारले अब्जावधींचे साम्राज्य?
18
अभिषेक बच्चनचं पत्नीसोबत 'न्यू इयर सेलिब्रेशन', चाहतीसोबत फोटो; ऐश्वर्याच्या सौंदर्यावर सगळेच फिदा
19
Stock Market Holiday 2026 List: NSE-BSE नं जारी केली २०२६ ची सुट्ट्यांची यादी; पाहा किती आहेत लाँग वीकेंड्स?
20
कानात ब्लूटूथ इयरफोन लावल्याने कॅन्सरचा मोठा धोका? एक्सपर्ट्सनी सांगितलं 'सत्य'
Daily Top 2Weekly Top 5

केंद्र सरकारच्या निर्बंधाला व्यापारी वैतागले, बंदमुळे आर्थिक घडी विस्कटली !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2021 04:14 IST

लोकमत न्यूज नेटवर्क उदगीर : गतवर्षीच्या पहिल्या लॉकडाऊनमध्ये सर्व व्यवहार बंद राहिल्याने मोठ्यांबराेबरच छोटे व्यापारी, उद्योग, व्यवसायांना फटका बसला. ...

लोकमत न्यूज नेटवर्क

उदगीर : गतवर्षीच्या पहिल्या लॉकडाऊनमध्ये सर्व व्यवहार बंद राहिल्याने मोठ्यांबराेबरच छोटे व्यापारी, उद्योग, व्यवसायांना फटका बसला. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे पुन्हा उद्योग, व्यवसाय बंद राहिले. दरम्यान, केंद्र सरकारने धान्य साठवणुकीसाठी व्यापाऱ्यांवर मर्यादा लागू केली आहे. त्यामुळे आडत बाजार बंद आहे. त्याचा परिणाम तालुक्यातील इतर बाजारपेठांवर झाला असून, व्यापाऱ्यांचे आर्थिक गणित विस्कटले आहे.

उदगीर तालुका हा तीन राज्यांच्या सीमेवर असून, व्यापारीदृष्ट्या लातूरनंतर विकसित बाजारपेठ म्हणून त्याकडे पाहिले जाते. उदगीरात जवळपास ४० दाल मिल, १५ फुटाणा मिल व सोयाबीनवर प्रक्रिया करणारे दोन मोठे कारखाने आहेत. या कारखान्यांना लागणारा कच्चा माल शेतीपूरक असल्यामुळे येथील बाजारपेठेत येणाऱ्या शेतकऱ्यांच्या शेतमालावर कारखाने अवलंबून आहेत. येथील मोंढ्यात दररोज कोट्यवधींची उलाढाल असते. तसेच कापड, किराणा, बी-बियाणे, खते, सराफा बाजारातही मोठी उलाढाल असते.

कोरोनामुळे प्रशासनाने व्यापाऱ्यांवर निर्बंध लागू केले. त्याचा फटका छोट्या व मध्यम व्यापाऱ्यांना बसला आहे. दुकानभाडे, कामगारांचे पगार, बँकेचे कर्ज, वीजबिल हे व्यवसाय सुरु असला अथवा नसला तरी भरावेच लागते. निर्बंधांमुळे व्यापारी अडचणीत आहेत. साधारणत: ग्रामीण भागातील ग्राहक सकाळी शेतीची कामे उरकून दुपारी येतो. मात्र, दुपारी ४ वाजता बाजारपेठ बंद होत असल्याने या ग्राहकाला काही ठराविक वस्तू घेता येत नाहीत. त्यामुळे ग्राहकांनी येणे कमी केले आहे. केवळ किराणा मार्केटमध्ये थोडेफार व्यवहार होतात.

दि. १ जुलैपासून केंद्र सरकारने व्यापाऱ्यांना शेतीमालाच्या धान्य साठवण्यावर मर्यादा आणली आहे. त्यामुळे मोंढ्यातील व्यापाऱ्यांना फटका बसणार आहे. यामुळे व्यापाऱ्यांनी बंद सुरु केल्याने मोंढ्यात उलाढाल नाही. त्यामुळे येथील व्यापारी आणि बाहेरील इतर बाजारपेठेतील व्यापारी शासनाच्या वेळेच्या बंधनामुळे वैतागले आहेत. ग्राहक नसल्याने आर्थिक गणित विस्कटले आहे.

केंद्राने नवीन आदेश मागे घ्यावा...

केंद्र सरकारने नवा आदेश काढून व्यापाऱ्यांना अडचणीत आणले आहे. शेतमालाचे सर्व दर शासनाने जाहीर केलेल्या हमीदराच्या जवळपास असतानाही नवा कायदा लागू करून शासन अप्रत्यक्षपणे शेतकऱ्यांचे नुकसान करत आहे. सध्या हंगाम नाही. परंतु, जेव्हा हंगाम सुरू होईल तेव्हा त्याचा फटका शेतकऱ्यांनाच बसेल. नवीन आदेश मागे घेण्यात यावा म्हणून आम्ही बंदमध्ये सहभागी आहोत.

- सुदर्शन मुंढे, अध्यक्ष, उदगीर दाल मिल असोसिएशन.

शासनाच्या नियमाचा फटका कपडा बाजाराला बसला आहे. आमचा व्यवहार २० टक्क्यांवर आला आहे. अशा परिस्थितीत कामगारांचा पगार, वीजबिल, बँकेचे कर्ज व घर खर्च निघणे अवघड झाले आहे. काही व्यापाऱ्यांनी दुकाने कायमची बंद केली आहेत. कोरोनाच्या नावाखाली वेळेचे बंधन लागू करुन सरकार नेमके काय साध्य करणार आहे, हेच आम्हाला कळत नाही. जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या पाहता सरकारने व्यापाऱ्यांवर लागू केलेले निर्बंध मागे घ्यावेत.

- गणेश मुक्कावार, कापड व्यापारी.