शहरं
Join us  
Trending Stories
1
"हिंदी कुठल्याही भाषेची शत्रू नाही..."; भाषावादावर पुन्हा एकदा अमित शाह स्पष्ट बोलले
2
"राज्यात मराठीच सक्तीची, पण..."; त्रिभाषा सूत्रावरून भाजपाने स्पष्ट केली भूमिका
3
कुठल्याही वादापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज ठाकरेंचे संकेत; ६ जुलैला ठाकरे बंधू एकत्र येणार?
4
रिलायन्स-एअरटेलचा नवा रेकॉर्ड, सेन्सेक्स १००० अंकांनी वधारला, ‘या’ शेअर्सनी घेतली मोठी उसळी!
5
मुख्यमंत्री फडणवीसांनी समज देऊ म्हणताच लोणीकर म्हणाले, "मी हजारवेळा माफी मागेल, पण..."
6
जगन्नाथ रथयात्रा: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
7
आयजीच्या जिवावर बायजी उदार...! ज्या रेअर मेटलवर चीनने बंदी आणलीय ते तो म्यानमारमधून आयात करतो
8
गृहकर्ज स्वस्त झाल्यानंतरही मुंबईत घर घेणं महाग! पण देशातील 'हे' शहर आहे बजेट फ्रेंडली; किती पडतो हप्ता?
9
'आता बांबू, शेण आणि सेंद्रिय कचऱ्यावर चालणार गाड्या', नितीन गडकरींनी सांगितली सरकारची योजना
10
जाम घाबरलेला रोहित शर्मा; किंग कोहलीच्या रुपात देवच पावला! टीम इंडियाच्या ड्रेसिंग रुममधील खास किस्सा
11
'पाणी सोडणार नाही, जे करायचे ते करा...', युद्धाची धमकी देणाऱ्या भुट्टोला भारताचे एका ओळीत उत्तर
12
'रोमान्स' पडला महागात! ४ मुलांच्या आईसोबत पकडलेल्या प्रियकराला गावकऱ्यांनी दिली धक्कादायक शिक्षा
13
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
14
गुजरातमध्ये आपला झटका! एक आमदार वाढत नाही तोच दुसरा सोडून गेला; मकवाना यांचा राजीनामा
15
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!
16
दुचाकी वाहनांवर टोल आकारण्याचा कोणताही प्रस्ताव नाही; नितीन गडकरी यांचे स्पष्टीकरण
17
संयुक्त निवेदनावर स्वाक्षरीस नकार, राजनाथ सिंहांनी चीन, पाकिस्तानचा तो कुटील डाव पाडला हाणून, अशी आहे Inside story 
18
नौसेनेतील अधिकाऱ्याला पैशांची होती गरज, पाकिस्तानच्या आयएसआय एजंटने संपर्क साधला, देशासोबत गद्दारी केली
19
MNS Morcha: मोर्चाला कोण येणार नाही हेही मला बघायचंय; राज ठाकरेंची हिंदी सक्तीविरोधात भव्य मोर्चाची घोषणा
20
११ लाख देऊन आजीने घेतला फेसबुकवरुन भाऊ, पुढे जे घडलं ते धक्कादायक...!

तिरू प्रकल्प शंभर टक्के भरला, सिंचनाचा प्रश्न संपुष्टात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2021 04:25 IST

हाळी हंडरगुळी : सततच्या जोरदार पावसामुळे उदगीर तालुक्यातील हाळी हंडरगुळी परिसरातील तिरू मध्यम प्रकल्प पूर्णपणे भरला आहे. त्यामुळे हाळी ...

हाळी हंडरगुळी : सततच्या जोरदार पावसामुळे उदगीर तालुक्यातील हाळी हंडरगुळी परिसरातील तिरू मध्यम प्रकल्प पूर्णपणे भरला आहे. त्यामुळे हाळी हंडरगुळीसह परिसरातील गावांच्या पाणीप्रश्नाबरोबर सिंचनाचाही प्रश्न संपुष्टात आला आहे. प्रकल्प पूर्णपणे भरल्याने शेतकऱ्यांसह नागरिकांच्या आशा उंचावल्या आहेत.

यंदाच्या पावसाळ्याच्या प्रारंभी झालेल्या पावसामुळे खरिपाच्या वेळेवर पेरण्या झाल्या होत्या. त्यानंतर पिकांपुरता पाऊस झाला होता. त्यामुळे पिकेही बहरली होती. मात्र, पिण्याच्या पाण्याची भीती व्यक्त होत हाेती. त्यातच जवळपास तीन आठवड्यांपेक्षा अधिक काळ पावसाने ताण दिला. परिणामी, बहरलेली पिके कोमेजून जात होती. ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची सुविधा आहे, ते शेतकरी पीक जगविण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करीत होते. दरम्यान, वातावरणात बदल होऊन पाऊस सुरू झाला आणि पिकांना जीवदान मिळाले. मात्र, प्रकल्प भरण्यासाठी मोठ्या पावसाची गरज होती.

गत आठवड्यापासून सतत संततधार पाऊस झाला. याशिवाय, मागील दोन-तीन दिवसांत मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आशा उंचावल्या. गेल्या आठवड्यापर्यंत तिरू मध्यम प्रकल्पात ४२ टक्के पाणीसाठा होता. सप्टेंबर महिना सुरू झाला असतानाही प्रकल्प भरला नसल्याने आगामी काळात पाणीटंचाईची भीती जाणवत होती. मात्र, दोन दिवसांत झालेल्या पावसाने तिरू प्रकल्प पूर्णपणे भरला.

तिरू नदीचे पात्र हे उदगीर, चाकूर व जळकोट या तीन तालुक्यात विस्तारले आहे. या नदीवरच हाळी गावाजवळ असलेल्या चिमाचीवाडी येथे १९७६ साली तिरू मध्यम प्रकल्प पूर्णत्वास आला. या प्रकल्पाची साठवण क्षमता २३.३२ दलघमी एवढी आहे. २०११ साली तत्कालीन आ. चंद्रशेखर भोसले यांच्या पुढाकाराने प्रकल्पाची उंची एका मीटरने वाढविल्याने पाणीसाठ्यात वाढ होत आहे.

प्रकल्पाचे पाणलोट क्षेत्र २६९.६७ चौ.किमी एवढे आहे. त्यामुळे २६५४.६० हेक्टर जमिनीला त्याचा लाभ होतो. प्रकल्पाअंतर्गत २६२५.०२ हेक्टर जमीन वहिताखाली येते. त्याचा फायदा हाळी हंडरगुळीसह चिमाचीवाडी, मोरतळवाडी, आडोळवाडी, सुकणी, वाढवणा बु., वाढवणा खु., लांबी, बेळसांगवी आदी गावांतील शेतकऱ्यांना होतो. शिवाय, पिण्याच्या पाण्यासाठी हा प्रकल्प आधार आहे. या प्रकल्पावरून ५२ खेडी पाणीयोजना कार्यान्वित आहे.

चार दरवाजे उघडले होते...

मंगळवारी सायंकाळी प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरल्याने रात्री चार दरवाजे उघडले होते. पण पाऊस थांबल्याने बुधवारी एकच दरवाजा उघडला गेला, असे अभियंता नईम मोमीन यांनी सांगितले.

दोन वर्षांनंतर तिरू मध्यम प्रकल्प शंभर टक्के भरल्याने पिण्याच्या पाण्यासह शेतीच्या पाण्याचा प्रश्न मिटणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांतून समाधान व्यक्त होत आहे, असे चिमाचीवाडीचे सरपंच नाथराव बंडे यांनी सांगितले.