साठेनगर येथे सामाजिक उपक्रमाचे आयोजन
लातूर : शहरातील साठेनगर येथील बुद्धविहारामध्ये अन्नधान्य आणि संसार उपयोगी साहित्याचे वितरण तसेच कोरोना प्रतिबंधात्मक जाणीवजागृती करण्यात आली. यावेळी मनपा आयुक्त अमन मित्तल, प्रा.डॉ. श्रीकांत गायकवाड, प्रा.डॉ.सुधीर मस्के, रुपेश गायकवाड, बाळासाहेब कांबळे, डॉ.महेश गंगावणे, नितीन कांबळे, अनसूया मस्के, शिवाजी चिंचकर, मीराताई मस्के, सुनील मांदळे, रवी शिरसाठ, विजयकुमार गायकवाड, अतुल कांबळे, गोविंद झाकडे, लखन कांबळे, दीपक शिरसाठ, सुरेश वाघमारे, शिवाजी कांबळे, धोंडूबाई साकळे, पद्मीनबाई शिरसाठ, लक्ष्मीबाई कांबळे, पारूबाई सोरते आदींची उपस्थिती होती. सूत्रसंचालन सुनील मांदले यांनी तर आभार विजयकुमार गायकवाड यांनी मानले.
हरंगुळ खु. जि.प. शाळेची पाहणी
लातूर : जिल्हा परिषद प्रशाला हरंगूळ खुर्द येथे जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी यू.व्ही. साळुंके, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी शाम गोडभरले यांनी भेट देऊन शाळेची पाहणी केली. बाला उपक्रमाची प्रभावीपणे अंमलबजावणी केली जात असून, हरंगुळ खु. येथील शाळेने उपक्रमाची तयारी केली आहे. याबाबत सुरु असलेल्या कामाची उपमुख्य कार्यकारी अधिकारी साळुंके आणि गटविकास अधिकारी शाम गोडभरले यांनी पाहणी केली तसेच राबवित असलेल्या कामाची माहिती घेतली. यावेळी जिल्हा परिषद शाळेतील मुख्याध्यापक, शिक्षक, कर्मचारी उपस्थित होते.
आस्था कौशल्य केंद्रात प्रशिक्षणार्थ्यांना प्रमाणपत्र वितरण
लातूर : आस्था कौशल्य विकास केंद्राच्या माध्यमातून प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेअंतर्गत डोमेस्टिक डेटा एन्ट्री ऑपरेटर प्रशिक्षण पूर्ण केलेल्या ६० प्रशिक्षणार्थ्यांना प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले. अध्यक्षस्थानी केंद्राचे संचालक किरण भावठाणकर यांची उपस्थिती होती. यावेळी किरण भावठाणकर, केंद्रप्रमुख अण्णासाहेब साठे, राहुल गायकवाड, अजय कांबळे, प्रशिक्षक प्रा. सुचेता साठे, सुयोग जोगदंड, सुकेश सोनकांबळे आदींची उपस्थिती होती.
खरीप पीपक विमा भरण्यास २३ जुलैपर्यंत मुदतवाढ
लातूर : शासनाने खरीप हंगाम २०२१ मध्ये प्रधानमंत्री पीक विमा योजनेत शेतकऱ्यांनी सहभाग घेण्याची अंतिम मुदत २३ जुलै पर्यंत वाढविली आहे. ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा योजनेत सहभाग नोंदवलेला नाही अशा शेतकऱ्यांनी आपले सरकार सेवा केंद्र सीएससी बँक शाखेमध्ये विमा हप्ता भरुन आपले पीक विमा संरक्षित करावे. अधिक माहितीसाठी कृषी विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी दत्तात्रय गावसाने यांनी केले आहे.
दयानंद कला महाविद्यालयात कार्यशाळा
लातूर : येथील दयानंद कला महाविद्यालयात फॅशन डिझाईन विभागाच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी इकोफ्रेंडली आर्टिकल्स या विषयावर ऑनलाईन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. घरामध्ये व परिसरामध्ये असणाऱ्या टाकाऊ वस्तूपासून टिकाऊ वस्तू कशा बनविल्या पाहिजेत या बाबतचे कौशल्य आणि साहित्य इत्यादींची माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली. कार्यशाळेत प्रा. हर्षा जैन यांनी मार्गदर्शन केले.
यावेळी प्रा. पी.के . देशमुख, प्रा. डी. एस. निलावार, प्रा. पी. व्ही. बिराजदार,, प्रा. आर. जे. नाईक, प्रा. एस. टी. हालदार आणि प्रा. के. एस. बजाज आदींची उपस्थिती होती.