शहरं
Join us  
Trending Stories
1
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
2
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
3
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
4
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
5
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
6
"उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
7
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
8
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
9
वरुथिनी एकादशी २०२६: १० हजार वर्षांच्या तपश्चर्येचे फळ केवळ एका व्रतात! जाणून घ्या 'वरुथिनी एकादशी'चे पूजा विधी
10
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
11
वयाच्या ४२ व्या प्रेग्नंट, तरी जिममध्ये हेवी वर्कआउट करतेय अभिनेत्री; नेटकऱ्यांनी दिला सल्ला
12
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
13
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
14
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
15
Tarot Card: तुमचा हा आठवडा भाग्याचा की संघर्षाचा? टॅरो कार्ड्सनुसार वाचा १२ ते १८ एप्रिलचे साप्ताहिक भविष्य!
16
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
17
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
18
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
19
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
20
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
Daily Top 2Weekly Top 5

भविष्यात जगात बांबूपासून औष्णिक उर्जा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2021 04:23 IST

निलंगा : भविष्यात भूगर्भातील खनिज संपत्ती संपुष्टात येईल. त्यामुळे सुप्त अवस्थेत जमिनीत असलेली औष्णिक ऊर्जा बाहेर न काढता जमिनीवर ...

निलंगा : भविष्यात भूगर्भातील खनिज संपत्ती संपुष्टात येईल. त्यामुळे सुप्त अवस्थेत जमिनीत असलेली औष्णिक ऊर्जा बाहेर न काढता जमिनीवर बांबू लागवडीतून संबंध विश्वाला औष्णिक ऊर्जा मिळू शकते. त्यामुळे मोठ्या प्रमाणात बांबू लागवड होणे आवश्यक आहे, असे माजी आमदार पाशा पटेल यांनी येथे सांगितले.

माजी आ. पाशा पटेल म्हणाले, नेदरलॅण्ड, फिनलॅण्ड व भारत या राष्ट्रांनी एकत्रित येऊन आसाममधील नुमालिगड येथे जगातील बांबूपासून वार्षिक ६ कोटी लिटर इथेनाॅल बनविण्याचे सुरू केलेले रिफायनरीचे काम प्रगतीपथावर आहे. २०२२ मध्ये उत्पादन सुरू होईल. जगातील ४८ देशांत बांबूचे उत्पादन घेता येते. चीन बांबूच्या उत्पादनापासून वार्षिक ३ लाख २० हजार कोटींची उलाढाल करतो. मात्र एकरी १५ टनापेक्षा जास्त उत्पादन घेण्यास चीन असमर्थ आहे. भारतात हेच उत्पादन एकरी ५० टनांपर्यंत घेता येते. त्यामुळे भारत हा जगातील एकमेव देश आहे की, येथे मोठ्या प्रमाणात बांबूचे एकरी उत्पन्न घेता येते. भविष्यात सर्व जगाला इथेनॉल पुरवठा करणारा भारत हा एकमेव देश राहील.

देशात २०१७ मध्ये बांबूची कुऱ्हाडबंदी कायद्यातून मुक्तता करण्यात आली. बांबूपासून कागद, कपडा, फर्निचर, लोणचं, तांदूळ अशा असंख्य वस्तू बनविता येतात. औष्णिक ऊर्जा निर्मितीसाठी कोळशाला आता बांबू हा सक्षम पर्याय ठरण्याची शक्यता आहे. महाराष्ट्राने जर ऊर्जा निर्मितीसाठी बांबू वापराचे धोरण स्वीकारले तर राज्यात २५ लाख हेक्‍टरवरील बांबू लागवड ही दगडी कोळशाला प्रभावी पर्याय ठरणार आहे. त्यातून शेतकऱ्यांना २५ हजार कोटींचे उत्पन्न देणारे प्रभावी पीक ठरणार आहे, असा दावाही अभ्यासकांनी केला आहे.

जागतिक तापमान वाढ कमी करण्यासाठी २०१५ च्या पॅरिस करारमध्ये टप्प्या-टप्प्याने औष्णिक ऊर्जा निर्मिती केंद्र बंद करण्याच्या सूचना केल्या आहेत. त्यामुळे आता सर्व देश विविध प्रयोग करीत आहेत. महाराष्ट्रातील विविध औष्णिक ऊर्जा प्रकल्पांना दरवर्षी सुमारे १० कोटी टन कोळशाची गरज आहे. या कोळशाला बांबू हा सक्षम पर्याय ठरणार आहे. त्यासाठी राज्यात २५ लाख एकरावर बांबू लागवड होणे आवश्यक आहे, असेही माजी आ. पाशा पटेल म्हणाले.

बांबू लागवडीनंतर तीन वर्षेे आंतरपीक...

परळीच्या औष्णिक ऊर्जा प्रकल्पात ११३० मेगावॅट वीजनिर्मिती होते. या परिसरात दोन लाख एकरावर बांबू लागवड केली तर बांबू कोळशाला प्रभावी पर्याय ठरणार आहे, असे सांगून माजी आ. पाशा पटेल म्हणाले, बांबू लागवडीनंतर सलग तीन वर्षे सावलीत येणारी आंतरपिके घेता येतात. हळद, अद्रक, बटाट्याचे एकरी चार लाखापर्यंत उत्पन्न घेता येते.

बांबू लागवडीमुळे जागतिक तापमान वाढ नियंत्रण ठेवणे शक्य आहे. बांबू आणि कोळशाचा उष्मांक दर सारखाच असून बांबू सर्वाधिक कार्बन डाय-ऑक्साईड शोषून घेणारे आहे. सर्वात झपाट्याने वाढणारे, कोणत्याही जागेत येणारे असून बांबूला कार्बन क्रेडिटही मिळणार आहे. शेतीच्या बाजूने लागवड केल्यास पिकांचे संरक्षण होऊन उत्पन्नही मिळते, असेही माजी आ. पाशा पटेल म्हणाले.