शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: मोठी बातमी! एकनाथ शिंदेंकडून पुण्यात 'जय महाराष्ट्र' पाठोपाठ 'जय गुजरात'चा नारा; आधीच मराठी-हिंदी वाद...
2
“‘लाडकी बहीण’साठी आम्ही ४१० कोटींचा निधी देतो, पण अजितदादांनी कबूल केले की...”: संजय शिरसाट
3
"राज ठाकरेंचं मराठीवर नाही तर राजकारणावर प्रेम", काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याची टीका
4
धुळे हादरले! मित्रांनी घरातून नेलं, गाडीत बसवले अन् कन्नड घाटात नेऊन घातल्या गोळ्या
5
सूडाची भावना! उधार दिलेले पैसे मागितले म्हणून थेट पेटवून दिलं घर; थरकाप उडवणारा Video
6
कर्जमुक्त होणार ही ज्वेलरी कंपनी, शेअरमध्ये १६ टक्क्यांची तुफान तेजी; गुंतवणूकदार सुखावले, तुमच्याकडे आहे का?
7
'पाकिस्तानात ९ नाही, २१ दहशतवादी अड्डे...', ऑपरेशन सिंदूरबाबत उपसेनाप्रमुखांचा मोठा खुलासा
8
“कुठलीही ताकद ठाकरे ब्रँड संपवू शकणार नाही, दोघे भाऊ एकत्र येत असतील तर...”: सुप्रिया सुळे
9
UIDAI चा मोठा निर्णय! 'या' चुका केल्यास तुमचं आधार कार्ड रद्द होईल, आताच तपासा!
10
मराठ्यांचा इतिहास लोकांपर्यंत पुरेसा पोहचला नाही, इंग्रजांसह स्वकीयही जबाबदार- मुख्यमंत्री फडणवीस
11
"मी मराठी शिकणार नाही, काय करायचं ते करा.…’’, प्रसिद्ध व्यावसायिकाने राज ठाकरेंना डिवचले  
12
“कोकणच्या हिताचे चांगले काम करा, टीकेत अडकून राहू नका”; भास्कर जाधवांचा योगेश कदमांना सल्ला
13
Maharashtran Rains: दक्षिण मध्य महाराष्ट्रातील अनेक भागात मुसळधार पावसाची शक्यता 
14
तेजीनंतर पुन्हा सोन्या-चांदीच्या दरात घसरण, तरीही चांदी १.१० लाखांच्या पार; खरेदीपूर्वी पाहा नवे दर
15
PM मोदींना त्रिनिदादमध्ये सोहरीच्या पानावर वाढलं गेलं जेवण; भारताशी कनेक्शन अन् फायदे काय?
16
प्राडाला मोठा झटका! कोल्हापुरी चप्पलवरून थेट कोर्टात खेचले, वाचा काय घडले?
17
IND vs ENG: बॅटने कहर केल्यानंतर आता बॉलने इतिहास रचण्याची संधी, जाडेजाच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष!
18
तब्बल ५ लाख २१ हजार ३५४ विद्यार्थ्यांनी घेतला ‘ST पास थेट शाळेत’ योजनेचा लाभ: प्रताप सरनाईक
19
चीनच्या डावपेचात अडकला भारत? EV तयार करणाऱ्या कंपन्यांनी हात वर केले, आता पुढे काय?
20
श्रेया, भाऊ कोहिनूर हिरे पण 'तो' भंगारवाला? शरद उपाध्येंची ६ वर्षांपूर्वीची 'ती' पोस्ट व्हायरल

साखरा पाटी येथे आठ महिन्यांत दहा अपघात; ९ जणांचा बळी !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2021 04:25 IST

लातूर ते बार्शी हा महामार्ग दळणवळणासाठी महत्त्वाचा आहे. या मार्गावर रात्रं-दिन माेठ्या प्रमाणावर वाहनांची वर्दळ असते. मात्र, मुरुड ते ...

लातूर ते बार्शी हा महामार्ग दळणवळणासाठी महत्त्वाचा आहे. या मार्गावर रात्रं-दिन माेठ्या प्रमाणावर वाहनांची वर्दळ असते. मात्र, मुरुड ते लातूरदरम्यानच्या मार्गावर साखरा पाटीचे वळण हे अधिक गंभीर आणि धाेकादायक असल्याचे समाेर आले आहे. गत अनेक दिवसांपासून याच वळावर माेठे भीषण अपघात घडल्याची नाेंद संबंधित पाेलीस ठाण्यात आहे. अपघात हाेताे, पाेलीस घटनास्थळी दाखल हाेतात आणि पंचानामा केला जाताे. मात्र, पुढे कारणांचा शाेध घेतला जात नाही. अनेकदा एकाच ठिकाणी अपघात का हाेतात, याबाबत काेणाही यंत्रणेला प्रश्न पडला नाही. जिल्ह्यातील प्रमुख मार्गावर हाेणाऱ्या अपघातात आता साखरा पाटीचे वळण हे अधिक धाेकादायक ठरले आहे. दर महिन्याला सरासरी दाेन अपघाताच्या घटना घडत आहेत. या अपघातात किमान दाेन ते पाचजण मृत्यू झाल्याची नाेंद आहे. दाेन दिवसांपूर्वी बारा नंबर पाटी येथून पेट्राेल पंपाकडे निघालेल्या ट्रकचालकाचा वळण रस्त्यावर ताबा सुटला आणि विरुद्ध दिशेला हा ट्रक घुसला. मुरुडकडून लातूरच्या दिशेने येणाऱ्या स्कूटीला ट्रकने उडविले. ही घटना सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास घडली. या अपघातात दुचाकीवरील दाेघेही ठार झाले.

रुंदीकरणाची गरज...

मुरुड ते लातूरदरम्यान साखरा पाटी येथील वळण रस्त्याचे रुंदीकरण करण्याची गरज आहे. शिवाय, साइडपटट्या भराव्या लागणार आहेत. वर्षभरात जवळपास २५ ते ३० अपघात झाल्यानंतरही संबंधित यंत्रणा जाग्यावरून हलायला तयार नाही. परिणामी, हाेणाऱ्या अपघातात वाहनधारकांचा नाहक बळी जात आहे. साखरा पाटी ब्लॅक स्पाॅट ठरला आहे. अतिशय धाेकादायक वळण असल्याने अपघात वाढले आहेत.