शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
4
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
5
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
6
Food : हिमालयीन चव आणि मुंबईचा थाट! आशियातील सर्वोत्तम ५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची 'दोन' रत्न; एक तर आहे मुंबईतच!
7
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
8
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
9
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
10
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
11
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
12
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
13
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
14
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
15
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
16
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
17
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
18
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
19
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
20
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
Daily Top 2Weekly Top 5

समायोजनासाठी शिक्षिकेचे हेलपाटे

By admin | Updated: October 6, 2014 00:14 IST

दत्ता थोरे , लातूर लातूर जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांमध्ये असलेली निर्दयी वृत्ती कशी असते याचा प्रत्यक्ष एका शिक्षिकेला येतो आहे. आपले झालेले बेकायदेशीर समायोजन रद्द करावे म्हणून

दत्ता थोरे , लातूरलातूर जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांमध्ये असलेली निर्दयी वृत्ती कशी असते याचा प्रत्यक्ष एका शिक्षिकेला येतो आहे. आपले झालेले बेकायदेशीर समायोजन रद्द करावे म्हणून जि. प. तील कर्मचारी दाद लागू देत नसल्याने उपायुक्तांकडून आदेश आणले. मात्र जिल्ह्यातील एका बड्या आमदाराच्या पुतणीला दुसरीकडे जावे लागेल म्हणून उपायुक्तांच्या त्या आदेशाला जि. प. कर्मचाऱ्यांनी चक्क केराची टोपली दाखवून टोलवाटोलवी सुरू केली आहे. त्यामुळे ‘एक महिन्यात न्याय’ या तत्वाला हरताळ लागतो आहे. महानंदा बळीराम तांदळे एमआयडीसीतील कन्या प्रशालेत कलाशिक्षिका होत्या. इथे बदली होऊन एक वर्षे झाले तोच त्यांची १४ आॅगस्टला कानडी बोरगाव लमाणतांडा (ता. लातूर) येथे बदली झाली. त्यांनी आपल्यापेक्षा अनेकांच्या सेवा दहा दहा वर्षे जास्तीच्या असताना त्यांना मान्यताप्रात्प संघटनेच्या पदाधिकारी नसतानाही कालावधी पूर्ण होऊनही आहे त्या ठिकाणी सेवेत ठेवण्यात आले आहे. मात्र आपली बदली एका वर्षात करण्यात आल्याची तक्रार त्यांनी केली. ही तक्रारी घेऊन गेल्यानंतर बीओंनी माझ्या हातात काही नाही, तुम्ही सीईओंना भेटा.. सीईओंकडे गेल्यावर तुम्ही शिक्षण विभागात भेटा असा सल्ला मिळाला. त्यामुळे त्यांनी थेट औरंगाबादचे उपायुक्त कार्यालय गाठून आपल्यावरील अन्यायाला वाचा फोडली. त्यांनी तातडीने यांची बदली रद्द करा, असे आदेश जिल्हा परिषदेला दिले. मात्र हे व्हीआयपी पत्र येऊन महिना लोटला तरी जिल्हा परिषदेचे कर्मचारी मूग गिळून गप्प आहेत. याला कारण एका बड्या आमदाराची पुतणी आहे. आठ वर्षे सेवा होऊनही त्या शाळेत तशाच असताना वर्षे पूर्ण झालेल्या शिक्षिकेची बदली कशी ? यावर हा संघर्ष चालू आहे.सुरूवातीला उपायुक्तांचे पत्रच सापडत नसलेल्या अधिकाऱ्यांना संलग्न पत्र दाखविल्यावर आता पत्र मिळूनही कारवाई करता येईनाशी झाली आहे. न्याय मागितला तर तुम्ही कोर्टात जा असा सल्ला देत असल्याचा आरोप शिक्षिका तांदळे यांनी ‘लोकमत’शी बोलताना केला. पण न्यायालयात जा म्हणणारे तसे पत्रही देत नसल्याने कुणी वाली नसलेल्यांना न्याय मिळणार आहे काय? असा सवालही त्यांनी केला आहे.