शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
2
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
3
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
4
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
5
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
6
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
7
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
8
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
9
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
10
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
11
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
12
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
13
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
14
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
15
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
16
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
17
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
18
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
19
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
20
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका

समायोजनासाठी शिक्षिकेचे हेलपाटे

By admin | Updated: October 6, 2014 00:14 IST

दत्ता थोरे , लातूर लातूर जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांमध्ये असलेली निर्दयी वृत्ती कशी असते याचा प्रत्यक्ष एका शिक्षिकेला येतो आहे. आपले झालेले बेकायदेशीर समायोजन रद्द करावे म्हणून

दत्ता थोरे , लातूरलातूर जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांमध्ये असलेली निर्दयी वृत्ती कशी असते याचा प्रत्यक्ष एका शिक्षिकेला येतो आहे. आपले झालेले बेकायदेशीर समायोजन रद्द करावे म्हणून जि. प. तील कर्मचारी दाद लागू देत नसल्याने उपायुक्तांकडून आदेश आणले. मात्र जिल्ह्यातील एका बड्या आमदाराच्या पुतणीला दुसरीकडे जावे लागेल म्हणून उपायुक्तांच्या त्या आदेशाला जि. प. कर्मचाऱ्यांनी चक्क केराची टोपली दाखवून टोलवाटोलवी सुरू केली आहे. त्यामुळे ‘एक महिन्यात न्याय’ या तत्वाला हरताळ लागतो आहे. महानंदा बळीराम तांदळे एमआयडीसीतील कन्या प्रशालेत कलाशिक्षिका होत्या. इथे बदली होऊन एक वर्षे झाले तोच त्यांची १४ आॅगस्टला कानडी बोरगाव लमाणतांडा (ता. लातूर) येथे बदली झाली. त्यांनी आपल्यापेक्षा अनेकांच्या सेवा दहा दहा वर्षे जास्तीच्या असताना त्यांना मान्यताप्रात्प संघटनेच्या पदाधिकारी नसतानाही कालावधी पूर्ण होऊनही आहे त्या ठिकाणी सेवेत ठेवण्यात आले आहे. मात्र आपली बदली एका वर्षात करण्यात आल्याची तक्रार त्यांनी केली. ही तक्रारी घेऊन गेल्यानंतर बीओंनी माझ्या हातात काही नाही, तुम्ही सीईओंना भेटा.. सीईओंकडे गेल्यावर तुम्ही शिक्षण विभागात भेटा असा सल्ला मिळाला. त्यामुळे त्यांनी थेट औरंगाबादचे उपायुक्त कार्यालय गाठून आपल्यावरील अन्यायाला वाचा फोडली. त्यांनी तातडीने यांची बदली रद्द करा, असे आदेश जिल्हा परिषदेला दिले. मात्र हे व्हीआयपी पत्र येऊन महिना लोटला तरी जिल्हा परिषदेचे कर्मचारी मूग गिळून गप्प आहेत. याला कारण एका बड्या आमदाराची पुतणी आहे. आठ वर्षे सेवा होऊनही त्या शाळेत तशाच असताना वर्षे पूर्ण झालेल्या शिक्षिकेची बदली कशी ? यावर हा संघर्ष चालू आहे.सुरूवातीला उपायुक्तांचे पत्रच सापडत नसलेल्या अधिकाऱ्यांना संलग्न पत्र दाखविल्यावर आता पत्र मिळूनही कारवाई करता येईनाशी झाली आहे. न्याय मागितला तर तुम्ही कोर्टात जा असा सल्ला देत असल्याचा आरोप शिक्षिका तांदळे यांनी ‘लोकमत’शी बोलताना केला. पण न्यायालयात जा म्हणणारे तसे पत्रही देत नसल्याने कुणी वाली नसलेल्यांना न्याय मिळणार आहे काय? असा सवालही त्यांनी केला आहे.